डोंबिवलीत उघड्या चेंबरमध्ये पडून ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

ठाणे : डोंबिवलीत एमआयडीसीच्या उघड्या चेंबरमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झालाय . हि घटना कल्याण शीळ रोड टाटा पॉवर जवळ घडली आहे. बाबू चव्हाण (वय ६० ) असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे .


कल्याण पूर्वेकडील टाटा नाका गांधीनगर परिसरामध्ये एमआयडीसीचे उघडे चेंबर होते. मयत चव्हाण रस्त्याने चालत असताना पाय घसरून ते थेट उघड्या असलेल्या चेंबरमध्ये पडले . त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना तातडीने चेंबरच्या बाहेर काढून उपचारासाठी डोंबिवली मधील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. एमआयडीसीच्या निष्काळजीपणामुळे बाबू चव्हाण यांचा जीव गेला असल्याचा दावा तेथे उपस्थित नागरिकांनी केला .


या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी हॉस्पिटल परिसरामध्ये गर्दी केली होती. वारंवार एमआयडीसीकडे तक्रार करून देखील एमआयडीसीने याकडे दुर्लक्ष केले . त्यांच्या या गलथान कारभारामुळे नागरिकांना अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे . संतप्त नागरिकांनी आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका या ठिकाणी मांडली आहे.


चव्हाण यांच्या मृत्यूसाठी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपचे माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी केली आहे.

Comments
Add Comment

EL Nino effects to Kharif : यंदाच्या खरीप हंगामावर ‘एल-निनो’चे सावट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

- पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला फटका बसण्याची शक्यता मुंबई : यंदाच्या खरीप हंगामावर ‘एल-निनो’चे

मुंबईत ‘सायप्रस ट्रेड सेंटर’ उभारणार

राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांची घोषणा; बिझनेस फोरममध्ये भारत-सायप्रस दरम्यान सहा सामंजस्य

Mangrove Park in Gorai : गोराईत राज्याच्या पहिल्या 'कांदळवन पार्क'चे २८ मे रोजी उद्घाटन; निसर्गप्रेमींना मिळणार विरंगुळ्याचे नवे ठिकाण

मुंबई : अनेक दिवसांच्या आणि वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मुंबईकरांना निसर्गाच्या सान्निध्यात विरंगुळा

कौशल्य विकासासाठी महाराष्ट्र आणि दक्षिण कोरियामध्ये करार

राज्यातील युवकांना मिळणार जागतिक दर्जाच्या संधी; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या मुंबई :

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्र्यातील दगडफेक प्रकरण तापलं! गरिब नगरमधून १६ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुंबई : मुंबईतील वांद्रे परिसरातील गरिब नगर येथे झालेल्या दगडफेक प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत १६ जणांना

मराठा तरुणांच्या उद्योग उभारणीला फडणवीस सरकारकडून बळ

अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी १५० कोटींचा निधी वितरित मुंबई : फडणवीस सरकारने मराठा समाजातील तरुण उद्योजकांना