डोंबिवलीत उघड्या चेंबरमध्ये पडून ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

ठाणे : डोंबिवलीत एमआयडीसीच्या उघड्या चेंबरमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झालाय . हि घटना कल्याण शीळ रोड टाटा पॉवर जवळ घडली आहे. बाबू चव्हाण (वय ६० ) असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे .


कल्याण पूर्वेकडील टाटा नाका गांधीनगर परिसरामध्ये एमआयडीसीचे उघडे चेंबर होते. मयत चव्हाण रस्त्याने चालत असताना पाय घसरून ते थेट उघड्या असलेल्या चेंबरमध्ये पडले . त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना तातडीने चेंबरच्या बाहेर काढून उपचारासाठी डोंबिवली मधील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. एमआयडीसीच्या निष्काळजीपणामुळे बाबू चव्हाण यांचा जीव गेला असल्याचा दावा तेथे उपस्थित नागरिकांनी केला .


या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी हॉस्पिटल परिसरामध्ये गर्दी केली होती. वारंवार एमआयडीसीकडे तक्रार करून देखील एमआयडीसीने याकडे दुर्लक्ष केले . त्यांच्या या गलथान कारभारामुळे नागरिकांना अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे . संतप्त नागरिकांनी आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका या ठिकाणी मांडली आहे.


चव्हाण यांच्या मृत्यूसाठी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपचे माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी केली आहे.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.