डोंबिवलीत उघड्या चेंबरमध्ये पडून ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

ठाणे : डोंबिवलीत एमआयडीसीच्या उघड्या चेंबरमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झालाय . हि घटना कल्याण शीळ रोड टाटा पॉवर जवळ घडली आहे. बाबू चव्हाण (वय ६० ) असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे .


कल्याण पूर्वेकडील टाटा नाका गांधीनगर परिसरामध्ये एमआयडीसीचे उघडे चेंबर होते. मयत चव्हाण रस्त्याने चालत असताना पाय घसरून ते थेट उघड्या असलेल्या चेंबरमध्ये पडले . त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना तातडीने चेंबरच्या बाहेर काढून उपचारासाठी डोंबिवली मधील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. एमआयडीसीच्या निष्काळजीपणामुळे बाबू चव्हाण यांचा जीव गेला असल्याचा दावा तेथे उपस्थित नागरिकांनी केला .


या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी हॉस्पिटल परिसरामध्ये गर्दी केली होती. वारंवार एमआयडीसीकडे तक्रार करून देखील एमआयडीसीने याकडे दुर्लक्ष केले . त्यांच्या या गलथान कारभारामुळे नागरिकांना अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे . संतप्त नागरिकांनी आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका या ठिकाणी मांडली आहे.


चव्हाण यांच्या मृत्यूसाठी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपचे माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी केली आहे.

Comments
Add Comment

अरबी शिकवणाऱ्या व्यक्तीवर अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

मुंबई: अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन केल्याच्या गंभीर आरोपाखाली मुंबई पोलिसांनी शिवडी येथील एका धार्मिक संस्थेतून

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर सोयी-सुविधांची कमतरता नको!

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचे निर्देश मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा

डिसेंबर २०२८ नंतर सिग्नल फ्री आणि वाहतूक कोंडीशिवाय होणार प्रवास, महापालिकेच्या या प्रकल्पाची वाढतेय गती

मुंबई (खास प्रतिनिधी) : दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंडदरम्‍यान नवीन जोडमार्ग स्‍थापित होत आहे. पश्चिमेकडील

मुंबईत चार नवीन कबूतर खाने, पण बाकीचे बंद म्हणजे बंदच....

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील विद्यमान कबुतरखाने उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये बंद करण्यात आले आहेत. दरम्यान,

पवईतील एन्काऊंटरवर एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा काय म्हणाले ?

मुंबई : पवईतील स्टुडिओत घडलेल्या ओलीस नाट्य आणि त्यानंतर झालेले आरोपी रोहित आर्य याच्या एन्काऊंटरवर अनेक प्रश्न

'वाचाळवीर' राऊतांना सक्तीची विश्रांती? महापालिका निवडणुकीपूर्वी ‘राजकीय ब्रेक’

प्रकृतीच्या कारणामुळे संजय राऊत दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार; राजकीय वर्तुळात अनेक