मध्य प्रदेशात 'रील'च्या नादात २० वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर

मध्य प्रदेश: सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या प्रयत्नात लोक कसे आपला जीव धोक्यात घालत आहेत, याचे एक भीषण उदाहरण मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यात समोर आले आहे. परेवा खोह या पर्यटनस्थळी आयुष यादव (वय २०) नावाच्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाला. चप्पल काढण्याच्या प्रयत्नात त्याचा तोल गेला आणि तो नदीच्या प्रवाहात वाहून गेला. ही हृदयद्रावक घटना शनिवारी (१९ जुलै) घडली असून, त्याचा थरकाप उडवणारा व्हिडिओही समोर आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, लखनादौन येथील रहिवासी असलेला आयुष यादव आपल्या मित्रांसोबत परेवा खोह येथे फिरण्यासाठी गेला होता. हे पर्यटनस्थळ आदेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत असून, आदेगावपासून ७ किमी अंतरावर आहे. मित्रांसोबत मजा करत असताना, रील्स बनवण्याची कल्पना डोक्यात आली. याच प्रयत्नात आयुषची चप्पल नदीत पडली.





व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे, आयुष एका दगडावर बसून काठीच्या मदतीने नदीतील चप्पल काढण्याचा प्रयत्न करत होता. त्याचे मित्रही त्याला मदत करत होते. मात्र, अचानक त्याचा पाय घसरला आणि तो नदीच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला. मित्रांनी त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु नदीचा प्रवाह खूपच तीव्र असल्याने ते अयशस्वी ठरले.


या घटनेने घाबरलेल्या मित्रांनी तात्काळ पोलीस आणि आयुषच्या कुटुंबीयांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि गावकऱ्यांच्या मदतीने आयुषचा शोध सुरू केला. रविवारी सायंकाळी त्याचा मृतदेह नदीत सापडला, अशी माहिती आदेगाव पोलीस स्टेशनच्या प्रभारी पूजा चौकसे यांनी दिली.


परेवा खोह हे एक लोकप्रिय पर्यटनस्थळ असले तरी, नदीच्या प्रवाहामुळे येथे धोकादायक परिस्थिती निर्माण होते. या घटनेने पुन्हा एकदा रील्स बनवण्याच्या वेडापायी होणाऱ्या दुर्घटनेवर प्रकाश टाकला आहे. पालकांनी २० वर्षे जपलेल्या मुलाचा अशा अकाली मृत्यूमुळे यादव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Comments
Add Comment

Indian Mango : नेपाळने भारतीय आंब्यावर बंदी घातली? केंद्र सरकारचा मोठा खुलासा; अफवांवर विश्वास ठेवू नका

नेपाळने भारतीय आंब्याच्या (Indian Mango) आयातीवर बंदी घातल्याची किंवा आयात स्थगित केल्याची चर्चा काही माध्यमांमध्ये

India Breaks Silence On Gulf Conflict : भारताकडून आखाती प्रदेशात जहाजांवरील हल्ल्यांचा निषेध, हल्ले तात्काळ थांबवण्याचे आवाहन

नवी दिल्ली : मध्य पूर्वेत पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. दरम्यान, आखाती प्रदेशात भारतीय खलाशांना घेऊन जाणाऱ्या

INDIAN RAILWAY : प्रवासी सुरक्षा सर्वोच्च प्राधान्य; भारतीय रेल्वेकडून देशव्यापी अग्निसुरक्षा ऑडिटला सुरुवात

Navi Delhi : प्रवाशांची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी भारतीय रेल्वेने आता एका महत्त्वपूर्ण मोहिमेचे हाती घेतले आहे.

Guru Randhawa : धक्कादायक! गुरू रंधावाच्या जिमबाहेर गोळीबार, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा दावा; दिल्ली पोलिसांचा तपास सुरू

नवी दिल्ली : पंजाबी आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक  गुरु रंधावा (Guru Randhawa) यांच्या जिमबाहेर गोळीबार झाल्याची घटना

Central Government : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी पूर्ण माफ

नवी दिल्ली: पश्चिम आशियातील वाढता संघर्ष, जागतिक ऊर्जा बाजारातील अस्थिरता आणि कच्च्या तेलाच्या (crude oil) वाढत्या

Indian Navy : नौदलाला मिळणार प्रगत जीएनएसएस जॅमर, संरक्षण मंत्रालयाकडून ४४९ कोटी रुपयांचा करार

नवी दिल्ली : भारतीय नौदलासाठी २० 'एन्हान्सड कॅपेबिलिटी ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम' जॅमर्स खरेदी