भविष्यातील नोकऱ्यांसाठी आत्ताच अभ्यास करा: नितेश राणे

  55

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा गुणगौरव


सिंधुदुर्ग : देशाची पुढील २५ वर्षांतील प्रगती कोणत्या क्षेत्रात होणार आहे, याचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करून त्यानुसार शिक्षण घ्यावे आणि आपल्या भविष्यातील नोकऱ्या व उद्योग उभे करण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कुडाळ येथे आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात केले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने मराठा समाज सभागृहात हा विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपचे बंड्या सावंत, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जिल्हा संयोजक विनीत परब, कॉमर्स अकॅडमी संचालक सीताराम प्रभूदेसाई, शहर मंत्री दिग्विजय पवार, कार्यक्रम प्रमुख आर्या सावंत, सह शहर मंत्री अलविना फर्नांडिस आदी उपस्थित होते.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्याचे कौतुक


या कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, या व्यासपीठावरून अनेक कार्यकर्ते, नेते, चांगले नोकरदार आणि उद्योजक घडले आहेत. त्यामुळे हे व्यासपीठ विद्यार्थ्यांना घडवणारे आहे. विद्यार्थ्यांनी प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. विशेषतः पुढील काळात कोणत्या नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत, याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी आताच करून त्यानुसार शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे. सध्या एआय शिक्षण पद्धतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे कारण या क्षेत्रात भविष्यकाळात अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर या क्षेत्रात स्पर्धाही वाढणार आहे, याचाही विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे.

विद्यार्थीच देशाचे भविष्य आहेत


राणे पुढे म्हणाले की, अशा कार्यक्रमांकडे मी एक गुंतवणूक म्हणून पाहतो कारण हे विद्यार्थीच देशाचे भविष्य आहेत. भारत हा सर्वात तरुण देश म्हणून भविष्यात उदयास येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी जे उद्योग उभे केले जाणार आहेत त्या उद्योगांमध्ये या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना प्राथमिकता दिली जाईल. यासाठी विविध कौशल्य प्रशिक्षणे देण्याचा शासनाचा मानस आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणत्या क्षेत्रात वाढ होत आहे, याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा. मुंबईला जाण्याऐवजी आपल्या जिल्ह्यात आई-वडिलांसोबत राहून व्यवसाय आणि नोकऱ्या करणे अधिक चांगले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
Comments
Add Comment

बैलपोळाच्या दिवशी नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गवसला

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील एक युवक बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी पेढी नदीवर गेला असता, अचानक पाय

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली

छत्रपती संभाजीनगरला २४x७ शाश्वत पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा; २६ द.ल.ली. जलशुद्धीकरण केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुढील २५-३० वर्षे शहराच्या अपेक्षित

महाराष्ट्रात गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा मान; घरबसल्या दर्शनासाठी विशेष पोर्टल सुरू

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव, घरगुती गणेशोत्सव, महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला आता राज्याने प्रथमच महाराष्ट्र

Ajit Pawar: मतचोरीच्या आरोपांवर अजितदादांचा जोरदार हल्लाबोल, म्हणाले "फेक नरेटीव्ह...

मुंबई: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मतदानावरून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले,  त्यानंतर देशभरात वातावरण

महाराष्ट्रातील १ कोटी बहीणींना लखपती दीदी करणार

मुंबई : लखपती दीदींसाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रात