तीन मुलांसह आई वडिलांनी विष पिऊन केली आत्महत्या

अहमदाबाद : अहमदाबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर अली आहे . तीन मुलांसह आई वडिलांनी विष पिऊन आत्महत्या केली आहे . ही सामूहिक आत्महत्येची घटना आहे असं पोलिसांनी म्हटलं आहे. विपुल वाघेला (३२), त्यांची पत्नी सोनल (२६) आणि त्यांची मुले करीना (११), मयूर (८) आणि राजकुमारी (५) अशी या मृतांची नावे आहेत .


विपुल वाघेला आणि त्याचं संपूर्ण कुटुंब आज सकाळी त्यांच्या अहमदाबादमधील घरात मृतावस्थेत आढळलं. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली . पोलिसांनी या पाचही जणांना रुग्णालयात नेलं . पण तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत . या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. तसंच शवविच्छेदनासाठी हे मृतदेह पाठवण्यात आले आहेत. आर्थिक अडचणीमुळे हे घडल्याचं बोललं जातं आहे .



गेल्या काही दिवसांपासून वाघेला कुटुंबाला आर्थिक अडचणी जाणवत होत्या. बंगोडारा या ठिकाणी ते भाडे तत्त्वावर असलेल्या घरात राहात होते. विपुल वाघेला रिक्षा चालक होते आणि त्यांच्या घरात कमाई करणारे ते एकटेच होते. विपुलने कर्ज काढून रिक्षा विकत घेतली होती. आर्थिक अडचणी भासत असल्याने विपुल आणि त्याची पत्नी कायमच तणावात असायचे. बहुदा याच कारणामुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचललं असावं. असं त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे .

Comments
Add Comment

World's Most Expensive Mango : जळगावातील सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याने पिकवला जगातील महागडा आंबा

जळगाव : जळगाव जिल्ह्यात अनेक वर्षे पोलीस सेवेत कार्यरत राहून स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून

Monsoon 2026 : अखेर तारीख ठरली! 'या' तारखेपासून महाराष्ट्रात दाखल होणार मान्सून

मुंबई : राज्यासह संपूर्ण देशात सध्या प्रचंड उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. मे महिन्याच्या अखेरीस तापमानाचा पारा

Jalgaon : जळगाव जिल्ह्यात २ पोलीस अधिकारी तर १ कर्मचारी तडकाफडकी निलंबित

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील बोदवड पोलीस ठाण्याचे (Bodwad Police Station) दोन अधिकारी व एका पोलीस कर्मचाऱ्यावर तडकाफडकी निलंबनाची

Pune Metro News : पुणेकरांनो लक्ष द्या! मेट्रो कामामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल; कात्रजमधील पीएमपी बसथांबा हलवला

पुणे : पुणे शहरात मेट्रो प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून भविष्यातील वाहतूक व्यवस्था अधिक जलद, सुरक्षित

CM Devendra Fadnavis : कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर; 'मुंबई टेक वीक'ची देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घोषणा

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे भविष्यातील परिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. जीवनाच्या प्रत्येक

Accident News: कपडे खरेदीसाठी निघाले अन् वाटेतच घात झाला ! पती, पत्नीसह चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

वर्धा : नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील (Nagpur-Hyderabad National Highway) हिंगणघाट नजीक आज  भीषण अपघात घडला आहे.