इको-सेन्सिटीव्ह झोन रद्द करण्यासाठी आग्रही

शेकाप नेते जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलनाचा इशारा


अलिबाग : रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यांत इको सेन्सिटीव्ह झोन टाकण्यात आल्याचा मसुदा तहसील कार्यालयाकडून जारी करण्यात आला असून, रायगड जिल्ह्यातील तब्बल ४३७ गावे ही इको सेन्सिटीव्ह झोनमध्ये येत असल्याचे केंद्र सरकारच्या मसुद्यामध्ये आहेत. त्यात रोहा तालुक्यातील ११९ गावे वन व पर्यावरण विभागाने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे संवेदनशील म्हणून घोषित केली आहेत. यावर हरकती घेत इको सेन्सिटीव्ह झोन रद्द करण्यात यावा, अशी मागणी शेकापने केली आहे. शेकापच्या वतीने रोहा तहसीलदार किशोर देशमुख, प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, रोहा तालुका वन उपविभागीय अधिकारी डॉ. शैलेंद्रकुमार जाधव यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात वेळ पडल्यास शेतकऱ्यांसाठी शेकापने पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.


रोहा तालुका हा औद्योगिक एमआयडीसी असलेला तालुका आहे, तसेच मुंबई व नवी मुंबई, पनवेल महापालिकेच्या जवळ असलेला तालुका आहे. रोहा तालुक्यालगतचे अलिबाग, पेण तालुके एमएमआरडी क्षेत्रात आहेत. रोहा तालुक्यामध्ये नागोठणे परिसरात रिलायन्स इंडस्ट्रीज, महाराष्ट्र सिमलेस, महालक्ष्मी सिमलेस, सुप्रिल पेट्रोकेमिकल, जिंदाल ड्रिलिंग, विभोर स्टील हे कारखाने आहेत, तर धाटाव एमआयडीसी क्षेत्रामध्ये ५० रासायनिक कारखाने आहेत. तसेच रोहा तालुका हा भात उत्पादक शेतकऱ्यांचा तालुका आहे. रोह्याचा पोहा हा देशभरामध्ये जातो, तसेच शेतीपुरक व्यवसाय म्हणून वीटभट्टी, कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्धव्यवसाय, भाजीपाला शेतीचे व्यवसाय केले जातात.


पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित केल्यास शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होणार आहे. शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतीमध्ये कोणतेही पूरक व्यवसाय व कुटीर उद्योग करता येणार नाहीत. स्वतःची मालकीची जमीन असूनदेखील कुक्कुटपालन, वीट व्यवसाय, दुग्धव्यवसाय, शेळीपालन, मत्स्यशेती व्यवसायदेखील शेतकऱ्यांना करता येणार नाहीत व जमिनी विकसित करता येणार नाहीत, तसेच शेतघरे, गुरांचे मोठे, स्वयंरोजगाराचे लघु व कुटिर उद्योग करता येणार नाहीत. त्यामुळे रोहे तालुक्यातील ११९ गावांतील शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार असल्याच प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Comments
Add Comment

Dhurandhar 2 ; Virushka : वीरूष्काला पडली धुरंधर २ ची भुरळ; इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत.....

मुंबई : धुरंधर या चित्रपटाने सर्वानाच भुरळ पाडली आहे. पहिल्या भागाने जोरदार कमाई करत. भारतीयांच्या लोकांच्या

देवेंद्र फडणवीसांच्या एका कॉलनं बदलला निर्णय, प्राजक्त तनपुरेंनी राहुरी पोटनिवडणुकीतून घेतली माघार

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत दिवंगत

Nagpur Crime : नागपूर हादरलं! पैशांसाठी १४ वर्षीय मित्राची निघृण हत्या

नागपूर : नागपूर शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शहराला हादरवून सोडणाऱ्या १४ वर्षीय मुलाच्या अपहरण आणि

Gautami patil : गौतमी पाटीलच्या 'या' नवीन गाण्यानं घातला धूमाकूळ

मुंबई : आपल्या मनमोहक अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारी महाराष्ट्राची लाडकी नृत्यागंणा गौतमी पाटील ( Gautami Patil ) चा

Gautami Patil : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर गौतमी पाटीलनं दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

नाशिक : नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरातचे दिवसेंदिवस अनेक काळे कारनामे समोर येत असून महिला लैंगिक शोषण, आर्थिक

Bigg Boss Marathi 6 : पहिला फायनलिस्ट कोण ठरणार ? तिकीट टू फिनालेची उत्सुकता वाढली

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन आता शेवटच्या टप्प्यात पोहचलं असून ११ जानेवारी २०२५ रोजी सुरु झालेल्या बिग बॉस मराठी