इको-सेन्सिटीव्ह झोन रद्द करण्यासाठी आग्रही

शेकाप नेते जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलनाचा इशारा


अलिबाग : रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यांत इको सेन्सिटीव्ह झोन टाकण्यात आल्याचा मसुदा तहसील कार्यालयाकडून जारी करण्यात आला असून, रायगड जिल्ह्यातील तब्बल ४३७ गावे ही इको सेन्सिटीव्ह झोनमध्ये येत असल्याचे केंद्र सरकारच्या मसुद्यामध्ये आहेत. त्यात रोहा तालुक्यातील ११९ गावे वन व पर्यावरण विभागाने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे संवेदनशील म्हणून घोषित केली आहेत. यावर हरकती घेत इको सेन्सिटीव्ह झोन रद्द करण्यात यावा, अशी मागणी शेकापने केली आहे. शेकापच्या वतीने रोहा तहसीलदार किशोर देशमुख, प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, रोहा तालुका वन उपविभागीय अधिकारी डॉ. शैलेंद्रकुमार जाधव यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात वेळ पडल्यास शेतकऱ्यांसाठी शेकापने पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.


रोहा तालुका हा औद्योगिक एमआयडीसी असलेला तालुका आहे, तसेच मुंबई व नवी मुंबई, पनवेल महापालिकेच्या जवळ असलेला तालुका आहे. रोहा तालुक्यालगतचे अलिबाग, पेण तालुके एमएमआरडी क्षेत्रात आहेत. रोहा तालुक्यामध्ये नागोठणे परिसरात रिलायन्स इंडस्ट्रीज, महाराष्ट्र सिमलेस, महालक्ष्मी सिमलेस, सुप्रिल पेट्रोकेमिकल, जिंदाल ड्रिलिंग, विभोर स्टील हे कारखाने आहेत, तर धाटाव एमआयडीसी क्षेत्रामध्ये ५० रासायनिक कारखाने आहेत. तसेच रोहा तालुका हा भात उत्पादक शेतकऱ्यांचा तालुका आहे. रोह्याचा पोहा हा देशभरामध्ये जातो, तसेच शेतीपुरक व्यवसाय म्हणून वीटभट्टी, कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्धव्यवसाय, भाजीपाला शेतीचे व्यवसाय केले जातात.


पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित केल्यास शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होणार आहे. शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतीमध्ये कोणतेही पूरक व्यवसाय व कुटीर उद्योग करता येणार नाहीत. स्वतःची मालकीची जमीन असूनदेखील कुक्कुटपालन, वीट व्यवसाय, दुग्धव्यवसाय, शेळीपालन, मत्स्यशेती व्यवसायदेखील शेतकऱ्यांना करता येणार नाहीत व जमिनी विकसित करता येणार नाहीत, तसेच शेतघरे, गुरांचे मोठे, स्वयंरोजगाराचे लघु व कुटिर उद्योग करता येणार नाहीत. त्यामुळे रोहे तालुक्यातील ११९ गावांतील शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार असल्याच प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Comments
Add Comment

उल्हासनगरमध्ये गुंडांनी केला पत्रकारावर हल्ला! पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये गुंडांनी पत्रकारावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प

श्रीवर्धन येथे किनाऱ्यालगत आढळली बोया, मेरिटाईम बोर्डच्या अधिकाऱ्यांनी केला तात्काळ तपास

रायगड: श्रीवर्धन येथील खालचा जीवनाबंदर कोळीवाडा परिसरात पाण्याच्या लाटांसोबत सकाळी आठ वाजताच्या दरम्यान एक

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

तुळशी विवाह २०२५: जाणून घ्या या परंपरेचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व!

मुंबई : हिंदू धर्मात तुळशी विवाह हा केवळ धार्मिक सोहळा नाही तर तो घरगुती जीवनातील समृद्धी, आरोग्य आणि कुटुंबातील

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कोटींचे ड्रग्स तयार करणाऱ्या कारखान्यावर टाकली धाड, मुंबई पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी!

मुंबई: मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील रशीद कंपाऊंडमध्ये ड्रग्स कारखान्यावर छाप टाकत लाखोंचा माल जप्त करण्यात

सतीश शाह यांच्या निधनापूर्वी नक्की काय घडलं ? मॅनेजरने सांगितलं सत्य

मुंबई : हिंदी मालिका आणि सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते सतीश शाह यांचे काल शनिवारी २५ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या