इको-सेन्सिटीव्ह झोन रद्द करण्यासाठी आग्रही

  60

शेकाप नेते जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलनाचा इशारा

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यांत इको सेन्सिटीव्ह झोन टाकण्यात आल्याचा मसुदा तहसील कार्यालयाकडून जारी करण्यात आला असून, रायगड जिल्ह्यातील तब्बल ४३७ गावे ही इको सेन्सिटीव्ह झोनमध्ये येत असल्याचे केंद्र सरकारच्या मसुद्यामध्ये आहेत. त्यात रोहा तालुक्यातील ११९ गावे वन व पर्यावरण विभागाने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे संवेदनशील म्हणून घोषित केली आहेत. यावर हरकती घेत इको सेन्सिटीव्ह झोन रद्द करण्यात यावा, अशी मागणी शेकापने केली आहे. शेकापच्या वतीने रोहा तहसीलदार किशोर देशमुख, प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, रोहा तालुका वन उपविभागीय अधिकारी डॉ. शैलेंद्रकुमार जाधव यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात वेळ पडल्यास शेतकऱ्यांसाठी शेकापने पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

रोहा तालुका हा औद्योगिक एमआयडीसी असलेला तालुका आहे, तसेच मुंबई व नवी मुंबई, पनवेल महापालिकेच्या जवळ असलेला तालुका आहे. रोहा तालुक्यालगतचे अलिबाग, पेण तालुके एमएमआरडी क्षेत्रात आहेत. रोहा तालुक्यामध्ये नागोठणे परिसरात रिलायन्स इंडस्ट्रीज, महाराष्ट्र सिमलेस, महालक्ष्मी सिमलेस, सुप्रिल पेट्रोकेमिकल, जिंदाल ड्रिलिंग, विभोर स्टील हे कारखाने आहेत, तर धाटाव एमआयडीसी क्षेत्रामध्ये ५० रासायनिक कारखाने आहेत. तसेच रोहा तालुका हा भात उत्पादक शेतकऱ्यांचा तालुका आहे. रोह्याचा पोहा हा देशभरामध्ये जातो, तसेच शेतीपुरक व्यवसाय म्हणून वीटभट्टी, कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्धव्यवसाय, भाजीपाला शेतीचे व्यवसाय केले जातात.

पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित केल्यास शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होणार आहे. शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतीमध्ये कोणतेही पूरक व्यवसाय व कुटीर उद्योग करता येणार नाहीत. स्वतःची मालकीची जमीन असूनदेखील कुक्कुटपालन, वीट व्यवसाय, दुग्धव्यवसाय, शेळीपालन, मत्स्यशेती व्यवसायदेखील शेतकऱ्यांना करता येणार नाहीत व जमिनी विकसित करता येणार नाहीत, तसेच शेतघरे, गुरांचे मोठे, स्वयंरोजगाराचे लघु व कुटिर उद्योग करता येणार नाहीत. त्यामुळे रोहे तालुक्यातील ११९ गावांतील शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार असल्याच प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Comments
Add Comment

कोकणात पुढील 4 दिवस विजांसह मुसळधार पावसाचा इशारा

राज्यभरात सध्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून कोकणात पुढील ४ दिवस विजांसह मुसळधार पावसाचा इशारा

नागालँडचे राज्यपाल ला. गणेशन यांचे निधन

चेन्नई: नागालँडचे राज्यपाल ला. गणेशन (L.A. Ganesan) यांचे शुक्रवारी (१५ ऑगस्ट, २०२५) रात्री चेन्नई येथील रुग्णालयात निधन

Health: हे वाचल्यानंतर तुम्ही दररोज पोळीला तूप लावून खाल

मुंबई: भारतीय जेवणात पोळीला तूप लावून खाणे ही जुनी परंपरा आहे. अनेक वर्षांपासून ही पद्धत चालत आलेली आहे, पण केवळ

प्रत्येक वेळेस थोडीच रिटायरमेंट घेणार?' रोहित शर्माने निवृत्तीवर दिले मजेशीर उत्तर, पंतने शेअर केला व्हिडिओ

मुंबई: भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त, भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने

Accident news: स्वातंत्र्यदिनी मोठा बस अपघात! १० जणांचा जागीच मृत्यू, ३५ प्रवासी जखमी

बर्दवान: देशात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना पश्चिम बंगालच्या पूर्व बर्दवान जिल्ह्यातून

Independence Day 2025: विकासाच्या वाटचालीत मोदी सरकारला साथ द्या: मंत्री मंगलप्रभात लोढा

गोंदिया:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाने मागील ११ वर्षांत जलद गतीने प्रगती साधली असून भारत