भारताने विकसित केली मलेरिया प्रतिबंधक लस


नवी दिल्ली : भारताने मलेरिया प्रतिबंधक लस विकसित केली आहे. या लसचे नाव एडफाल्सीवॅक्स असे ठेवण्यात आले आहे. ही लस मलेरियाला प्रतिबंध करेल आणि मलेरियाच्या प्रार्दुभावाला आळा घालण्यासही मदत करेल. यामुळे भारतातून लवकरच मलेरिया या आजाराने उच्चाटन करणे शक्य होईल, असा विश्वास संशोधक व्यक्त करत आहेत.


आयसीएमआरने मलेरिया प्रतिबंधक लस विकसित केल्याचे जाहीर केले आहे. डासांमुळे भारतात दरवर्षी अनेकजण आजारी पडतात. यातील काही जणांचा मृत्यू होतो. पण मलेरियाला प्रतिबंधक लसमुळे ही परिस्थिती बदलण्यास मदत होणार आहे. भारतात डेंग्यू आणि चिकनगुनिया या आजारांना प्रतिबंध करण्यासाठीही लस विकसित करण्याचे काम सुरू आहे.


भारताने विकसित केलेली मलेरिया प्रतिबंधक लस अर्थात एडफाल्सीवॅक्स परजीवी प्लास्मोडियम फाल्सीपेरमवर कमालीची प्रभावी ठरली आहे. लस घेतलेल्या व्यक्तीच्या शरीरात मलेरियाशी संबंधित परजीवी सक्रीय होऊ शकत नाही. यामुळे संबंधित व्यक्तीला मलेरिया होत नाही तसेच त्याच्या शरीरातून मलेरियाचे कोणत्याही प्रकारे संक्रमण होण्याची शक्यता मावळते.


मलेरिया प्रतिबंधक लसची प्रगती कोणत्या टप्प्यावर ?


भारताच्या मलेरिया प्रतिबंधक लसने प्री क्लीनिकल व्हॅलिडेशन हा टप्पा पूर्ण केला आहे. लवकरच ही लस वाजवी दरात बाजारात उपलब्ध होणार असल्याचे वृत्त आहे. भारत निवडक देशांना ही लस परवडणाऱ्या दरात उपलब्ध करुन देणार आहे. लस देऊन भारत जगाभरातून मलेरियाचे उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.


Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव