भारताने विकसित केली मलेरिया प्रतिबंधक लस


नवी दिल्ली : भारताने मलेरिया प्रतिबंधक लस विकसित केली आहे. या लसचे नाव एडफाल्सीवॅक्स असे ठेवण्यात आले आहे. ही लस मलेरियाला प्रतिबंध करेल आणि मलेरियाच्या प्रार्दुभावाला आळा घालण्यासही मदत करेल. यामुळे भारतातून लवकरच मलेरिया या आजाराने उच्चाटन करणे शक्य होईल, असा विश्वास संशोधक व्यक्त करत आहेत.


आयसीएमआरने मलेरिया प्रतिबंधक लस विकसित केल्याचे जाहीर केले आहे. डासांमुळे भारतात दरवर्षी अनेकजण आजारी पडतात. यातील काही जणांचा मृत्यू होतो. पण मलेरियाला प्रतिबंधक लसमुळे ही परिस्थिती बदलण्यास मदत होणार आहे. भारतात डेंग्यू आणि चिकनगुनिया या आजारांना प्रतिबंध करण्यासाठीही लस विकसित करण्याचे काम सुरू आहे.


भारताने विकसित केलेली मलेरिया प्रतिबंधक लस अर्थात एडफाल्सीवॅक्स परजीवी प्लास्मोडियम फाल्सीपेरमवर कमालीची प्रभावी ठरली आहे. लस घेतलेल्या व्यक्तीच्या शरीरात मलेरियाशी संबंधित परजीवी सक्रीय होऊ शकत नाही. यामुळे संबंधित व्यक्तीला मलेरिया होत नाही तसेच त्याच्या शरीरातून मलेरियाचे कोणत्याही प्रकारे संक्रमण होण्याची शक्यता मावळते.


मलेरिया प्रतिबंधक लसची प्रगती कोणत्या टप्प्यावर ?


भारताच्या मलेरिया प्रतिबंधक लसने प्री क्लीनिकल व्हॅलिडेशन हा टप्पा पूर्ण केला आहे. लवकरच ही लस वाजवी दरात बाजारात उपलब्ध होणार असल्याचे वृत्त आहे. भारत निवडक देशांना ही लस परवडणाऱ्या दरात उपलब्ध करुन देणार आहे. लस देऊन भारत जगाभरातून मलेरियाचे उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.


Comments
Add Comment

भारत-चीन संबंधांमध्ये सकारात्मक बदल; लष्करप्रमुखांनी दिली महत्वाची माहिती

नवी दिल्ली : भारत-चीन सीमावर्ती तणावाबाबत गेले काही महिने सकारात्मक घडामोडी घडत असल्याचे लष्करप्रमुख जनरल

फाशीच्या शिक्षेवर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांची प्रतिक्रिया

ढाका - बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना युनुस सरकारने स्थापने केलेल्या आंतरराष्ट्रीय गुन्हे

बिहारमध्ये नव्या सरकारच्या हालचालींना वेग; २२ नोव्हेंबरपूर्वी शपथविधीची शक्यता

पटना : बिहारमध्ये नवं सरकार येत्या २२ नोव्हेंबरपूर्वी स्थापन होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री आणि एलजेपीचे

Mumbai CNG Cut : मुंबईत CNGचा मोठा तुटवडा, रिक्षा-टॅक्सी वाहतूक ठप्प; मुंबईकरांचे प्रवास नियोजन कोलमडण्याची शक्यता

वडाळ्यातील गेल पाईपलाईन बिघाडामुळे मुंबईत सीएनजी टंचाई मुंबई : वडाळा परिसरातील गेल गॅसच्या मुख्य

लाल किल्ला स्फोट प्रकरणाचा कट रचणाऱ्या दहशतवाद्याला अटक! कोण आहे आमिर रशीद अली?

दिल्ली: दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेला मोठे यश

केएफसी आणि मॅकडोनाल्डसारखे फूड ब्रॅण्ड रेल्वेस्थानकांवर उघडणार

रेल्वेने त्यांच्या केटरिंग धोरणात केला मोठा बदल नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने त्यांच्या केटरिंग धोरणात एक मोठा