भारत व युएस बोलणीला पूर्णविराम ! 'राष्ट्रहित प्रथम'

प्रतिनिधी: भारतीय गुंतवणूकदार, शेअर बाजार, भागभांडवलदार, व्यापारी यांच्यासाठी चांगली व वाईट अशी संमिश्र अपडेट समोर आली आहे.अमेरिका भारत चर्चेचा तात्पुरता 'पूर्णविराम' लाग ला आहे. प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, भारत राष्ट्रहितापेक्षा संवेदनशील व्यापारी कराराला मान्यता देऊ शकत नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. काल पाचव्या चर्चेची फेरीचा अंतिम फेरी पार पडली. युएस भारत टेरिफ करारात कुठलाही ठोस निर्णय झाला नाही. भारताच्या शिष्टमंडळाने ट्रम्प प्रशासनाला युएसमध्ये वारंवार भेटी दिल्या आहेत. मात्र काही संवेदनशील मुद्यावरू न चर्चेचे घोडे आडले. भारतानेही टेरिफबाबत आक्रमक भूमिका घेत 'चर्चा मिडियातून होऊ शकत नाही ती बैठकीच्या पातळीवर झाली पाहिजे.'

राष्ट्रहित, घरगुती व्यापाऱ्यांच्या हिताचे रक्षण ही पहिली प्राथमिकता असल्याने यावर तडजोड होणार नाही असे भारतीय शिष्टमंडळाने युएसला कळवले आहे. भारतीय बाजारात युएसला 'कुठल्या ही अटींशिवाय भारत करार करू शकतो ' अशा स्पष्ट शब्दात कळवले असल्याची माहिती पुढे आली आहे. भारत व युएस द्वीपक्षीय कराराचा (Indian US Bilateral Trade Agreements B TA) अखेर स्थगित झाले आहे. भारताचे वाणिज्य मंत्रालयाचे विशेष सचिव राजीव अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय शिष्टमंडळ युएसशी चर्चा करत होते. मात्र ते दोन्ही बाजूने निष्फळ ठरले असले तरी राजीव अग्रवाल यांनी कणखर भूमिका घेतली आहे.

याविषयी एका कार्यक्रमादरम्यान फेरीच्या समाप्तीनंतर शनिवारी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिलेल्या ठाम वक्तव्यावरून हे स्पष्ट होते की भारताला राष्ट्रीय हितसंबंधांशी जुळणारा व्यापार करार अंतिम करण्यासाठी घाई किंवा जबरदस्ती केली जाणार नाही. असोचॅम (असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया) ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना मंत्री पियुष गोयल म्हणाले आहेत की,'जर भारताला चांगला व्यापार करार मिळाला तर आम्ही तो पुढे करू. जर झाला नाही तर आम्ही करणार नाही. भारत नेहमीच राष्ट्रहित प्रथम ठेव तो.'

का भारताला करार स्थगित करावा लागत आहे?

जागतिक दबाव कायम असला तरीही राष्ट्रीय हिताला सरकार अधिक महत्त्व देत आहे. अमेरिकेने कराराच्या व टेरिफचा सवलती बदल्यात अशा सेक्टरमध्ये प्रवेश मागितला जिथे प्रवेश देणे अ संभव व आत्मघातकी ठरले असते. युएसने शेतकी, डिजिटल व्यापार, बौद्धिक संपदा हक्क (Intellectual property rights)आणि वैद्यकीय उपकरणे यासारख्या क्षेत्रांमध्ये विस्तृत बाजारपेठ प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करत असताना भारत युएसलग आपल्या आयटी सेवा उद्योग,कापड आणि फार्मा (औषधनिर्माण उद्योगांसाठी) अधिकाधिक प्रवेश मिळवण्यावर बोलणी करत होते‌. तर शेती आणि दुग्धशाळेसारख्या संवेदनशील क्षेत्रांना संभाव्य क्षेत्रात अमेरिकेची गुंतवणूक देशांतर्गत शेतकरी व व्यापारांच्या मूळावर आली असती‌.

वॉशिंग्टनच्या दबाव झुगारून, ज्यामध्ये प्रसारमाध्यमांतून दबाव टाकण्याच्या युएसचा वृत्तीत सार्वजनिक मुदती जाहीर करणे आणि कदाचित माध्यमांद्वारे दबाव टाकणे समाविष्ट आहे.प्रतिक्रियात्म क मार्ग टाळण्याचा आणि त्याऐवजी अधिकृत माध्यमांना चिकटून राहण्याचा भारताचा निर्णय आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये स्वायत्तता आणि प्रतिष्ठा राखण्याच्या त्याच्या इच्छेशी सुसंगत आहे असे सर कारने म्हटले होते.

अशा सेक्टरमध्ये प्रवेश मागितला जिथे प्रवेश देणे असंभव व आत्मघातकी ठरले असते. युएसने शेतकी, डिजिटल व्यापार, बौद्धिक संपदा हक्क (Intellectual property rights)आणि वैद्यकीय उपकरणे यासारख्या क्षेत्रांमध्ये विस्तृत बाजारपेठ प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करत असताना भारत युएसलग आपल्या आयटी सेवा उद्योग,कापड आणि फार्मा (औषधनिर्माण उद्योगांसाठी) अधिका धिक प्रवेश मिळवण्यावर बोलणी करत होते‌. तर शेती आणि दुग्धशाळेसारख्या संवेदनशील क्षेत्रांना संभाव्य क्षेत्रात अमेरिकेची गुंतवणूक देशांतर्गत शेतकरी व व्यापारांच्या मूळावर आली असती‌. यामुळेच भारताने हा करार नाकारला.
Comments
Add Comment

कधी होणार जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक ?

मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची घोषणा करण्यासाठी राज्य

ठाकरे बंधूंच्या तोंडी जिहाद्यांची भाषा - मंत्री नितेश राणेंचा घणाघात; राष्ट्रभक्त हिंदूंनी जागरूक राहून मतदान करण्याचे आवाहन

मुंबई : 'ठाकरे बंधूंची भाषा आणि जिहाद्यांच्या भाषेत आता काहीच फरक उरलेला नाही. 'व्होट जिहाद'च्या माध्यमातून हिंदू

BMC Election 2026 : घराबाहेर पडताय? मग आधी हे वाचा! मुंबईतील सायन, कांदिवली आणि मालाडमध्ये वाहतुकीत मोठे फेरबदल; पाहा पर्यायी मार्ग

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या बहुप्रतिक्षित निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान पार पडणार आहे. या

मराठमोळ्या बँक ऑफ महाराष्ट्राचा मजबूत तिमाही निकाल जाहीर! नफ्यात २६.५१% वाढ इतरही आकडेवारी मजबूत

मोहित सोमण: बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) बँकेने आपल्या तिमाही निकालाची घोषणा केली आहे. बँकेला इयर ऑन इयर बेसिसवर (YoY)

डिसेंबर महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांक महागाईत किरकोळ वाढ 'ही' आहे आकडेवारी

मोहित सोमण: केंद्र सरकारच्या नव्या आकडेवारीनुसार यंदाच्या ग्राहक किंमत निर्देशांक (Consumer Price Index) महागाईत इयर ऑन इयर

Meta Layoff: मेटाकडून 'या' विभागात १०% कर्मचारी कपात जाहीर १५०० जणांना नारळ मिळणार

मुंबई: आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डेटा सेंटर प्रकल्पाकडे लक्ष दिल्याने मेटा (Meta) कंपनीने १५०० कर्मचाऱ्यांना नारळ