हार्दिक पांड्या आणि जस्मिन वालिया यांच्यात ब्रेकअपच्या चर्चांना उधाण

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि ब्रिटीश गायिका तेसच टीव्ही स्टार जस्मिन वालिया यांच्यात ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना सध्या सोशल मीडियावर उधाण आले आहे. गेल्या एक वर्षांपासून त्यांच्यातील अफेअरच्या चर्चा सुरू होत्या, मात्र आता दोघांनीही एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिक आणि जस्मिन यांनी आपापल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एकमेकांचे नाव काढून टाकले आहे. यापूर्वी ते एकमेकांना फॉलो करत होते, मात्र आता ते करत नसल्याचे दिसून आले आहे. या कृतीमुळे त्यांच्यातील संबंध संपुष्टात आल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, या संदर्भात दोघांकडूनही अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.


अफेअरच्या चर्चांना कशी सुरुवात झाली?


हार्दिक पांड्या आणि जस्मिन वालिया यांच्यातील अफेअरच्या चर्चांना साधारण एक वर्षापूर्वी सुरुवात झाली होती. हार्दिकने ग्रीसमध्ये सुट्ट्या घालवताना एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्याचे पार्श्वभूमी जस्मिनने तीन दिवसांपूर्वी पोस्ट केलेल्या फोटोशी जुळत होती. यामुळे त्यांच्यात जवळीक वाढल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यावेळीही त्यांच्या नात्याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती, केवळ तर्कवितर्क लावले जात होते.


एक वर्षातच अनफॉलो का केले?


हार्दिक आणि जस्मिन यांच्या अफेअरच्या चर्चांना एक वर्ष पूर्ण होत असतानाच त्यांनी एकमेकांना अनफॉलो केल्यामुळे ब्रेकअपच्या चर्चांना वेग आला आहे. हा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला आहे की, एका वर्षातच असे काय घडले की त्यांना एकमेकांना अनफॉलो करावे लागले? या प्रश्नाचे उत्तर केवळ हार्दिक किंवा जस्मिनच देऊ शकतात.


हार्दिक पांड्या हा सध्या भारतीय क्रिकेटमधील एक महत्त्वाचा खेळाडू असून, तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतो. दुसरीकडे, जस्मिन वालिया ही एक ब्रिटिश गायिका आणि टीव्ही व्यक्तिमत्त्व असून, ती तिच्या इंग्रजी, पंजाबी आणि हिंदी गाण्यांसाठी ओळखली जाते.


या ब्रेकअपच्या चर्चांमागे सत्य काय आहे, हे येणारा काळच सांगेल.

Comments
Add Comment

Indian Deaf Cricket Team : कौतुकास्पद! भारतीय कर्णबधिर संघाच्या नावावर पहिला आशिया कप टी-२० स्पर्धेचे जेतेपद

सूर्यकुमार यादवची सेना सध्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकात व्यस्त आहे. संपूर्ण देश संघाच्या विजयासाठी प्रार्थना

टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंगच्या वडिलांचं निधन

मुंबई: टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंग याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रिंकु सिंग गेल्या दोन दिवसांपासून

IND vs ZIM : भारताचा दणदणीत विजय; २२ वर्षाचा नाबाद ९७ ठोकणारा युवा खेळाडून कोण?, जाणून घ्या...

मुंबई: वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारतीय संघाने सुपर ८ फेरीमध्ये झिम्बाब्वे संघाचा पराभव केला आहे. भारताने ७२ धावांनी

भारताचा विजय, पुढील फेरीची आशा कायम; दक्षिण आफ्रिका सेमी फायनलमध्ये आणि झिम्बाब्वेचे आव्हान संपले

चेन्नई : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये सुपर एट फेरीचे आजचे दोन्ही सामने सुपरहिट झाले. दक्षिण

भारताने झिम्बाब्वे विरूद्धच्या सामन्यात उभारला धावांचा डोंगर

चेन्नई : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये झिम्बाब्वे विरूद्धच्या सुपर एट फेरीतील सामन्यात भारताने

दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय

अहमदाबाद : वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ अंतर्गत सुपर ८ फेरीचा