हार्दिक पांड्या आणि जस्मिन वालिया यांच्यात ब्रेकअपच्या चर्चांना उधाण

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि ब्रिटीश गायिका तेसच टीव्ही स्टार जस्मिन वालिया यांच्यात ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना सध्या सोशल मीडियावर उधाण आले आहे. गेल्या एक वर्षांपासून त्यांच्यातील अफेअरच्या चर्चा सुरू होत्या, मात्र आता दोघांनीही एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिक आणि जस्मिन यांनी आपापल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एकमेकांचे नाव काढून टाकले आहे. यापूर्वी ते एकमेकांना फॉलो करत होते, मात्र आता ते करत नसल्याचे दिसून आले आहे. या कृतीमुळे त्यांच्यातील संबंध संपुष्टात आल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, या संदर्भात दोघांकडूनही अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.


अफेअरच्या चर्चांना कशी सुरुवात झाली?


हार्दिक पांड्या आणि जस्मिन वालिया यांच्यातील अफेअरच्या चर्चांना साधारण एक वर्षापूर्वी सुरुवात झाली होती. हार्दिकने ग्रीसमध्ये सुट्ट्या घालवताना एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्याचे पार्श्वभूमी जस्मिनने तीन दिवसांपूर्वी पोस्ट केलेल्या फोटोशी जुळत होती. यामुळे त्यांच्यात जवळीक वाढल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यावेळीही त्यांच्या नात्याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती, केवळ तर्कवितर्क लावले जात होते.


एक वर्षातच अनफॉलो का केले?


हार्दिक आणि जस्मिन यांच्या अफेअरच्या चर्चांना एक वर्ष पूर्ण होत असतानाच त्यांनी एकमेकांना अनफॉलो केल्यामुळे ब्रेकअपच्या चर्चांना वेग आला आहे. हा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला आहे की, एका वर्षातच असे काय घडले की त्यांना एकमेकांना अनफॉलो करावे लागले? या प्रश्नाचे उत्तर केवळ हार्दिक किंवा जस्मिनच देऊ शकतात.


हार्दिक पांड्या हा सध्या भारतीय क्रिकेटमधील एक महत्त्वाचा खेळाडू असून, तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतो. दुसरीकडे, जस्मिन वालिया ही एक ब्रिटिश गायिका आणि टीव्ही व्यक्तिमत्त्व असून, ती तिच्या इंग्रजी, पंजाबी आणि हिंदी गाण्यांसाठी ओळखली जाते.


या ब्रेकअपच्या चर्चांमागे सत्य काय आहे, हे येणारा काळच सांगेल.

Comments
Add Comment

राष्ट्रीय खोखोपटू सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेत प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती

मुंबई : राष्ट्रीय खोखोपटू तथा क्रीडा प्रसारक श्री. सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना

WPL 2026 Final: बंगळूरची विजयी घोडदौड दिल्ली थांबवू शकणार का?

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. रॉयल चॅलेंजर्स

IND vs PAK : "आयसीसीचे मुख्यालय भारतात असते तर बॉम्बने उडवले असते..."; पाकिस्तानी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान

रविवारी (१ फेब्रुवारी) पाकिस्तान सरकारने जाहीर केले की त्यांचा संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी मैदानात उतरेल,

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीची स्थगिती कायम, रोहित पवारांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली  : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांना सर्वोच्च न्यायालयाने जोरदार

IND vs PAK : पाकिस्तान नेहमीप्रमाणे "यू-टर्न" घेईल; सुनील गावस्कर यांची पाकिस्तानवर टीका

मुंबई: टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तान सरकारने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.

जोकोविचला नमवत कार्लोसची ऑस्ट्रेलियन ओपनला गवसणी

मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपन २०२६च्या पुरुष एकेरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या युवा खेळाडू कार्लोस