हार्दिक पांड्या आणि जस्मिन वालिया यांच्यात ब्रेकअपच्या चर्चांना उधाण

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि ब्रिटीश गायिका तेसच टीव्ही स्टार जस्मिन वालिया यांच्यात ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना सध्या सोशल मीडियावर उधाण आले आहे. गेल्या एक वर्षांपासून त्यांच्यातील अफेअरच्या चर्चा सुरू होत्या, मात्र आता दोघांनीही एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिक आणि जस्मिन यांनी आपापल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एकमेकांचे नाव काढून टाकले आहे. यापूर्वी ते एकमेकांना फॉलो करत होते, मात्र आता ते करत नसल्याचे दिसून आले आहे. या कृतीमुळे त्यांच्यातील संबंध संपुष्टात आल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, या संदर्भात दोघांकडूनही अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.


अफेअरच्या चर्चांना कशी सुरुवात झाली?


हार्दिक पांड्या आणि जस्मिन वालिया यांच्यातील अफेअरच्या चर्चांना साधारण एक वर्षापूर्वी सुरुवात झाली होती. हार्दिकने ग्रीसमध्ये सुट्ट्या घालवताना एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्याचे पार्श्वभूमी जस्मिनने तीन दिवसांपूर्वी पोस्ट केलेल्या फोटोशी जुळत होती. यामुळे त्यांच्यात जवळीक वाढल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यावेळीही त्यांच्या नात्याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती, केवळ तर्कवितर्क लावले जात होते.


एक वर्षातच अनफॉलो का केले?


हार्दिक आणि जस्मिन यांच्या अफेअरच्या चर्चांना एक वर्ष पूर्ण होत असतानाच त्यांनी एकमेकांना अनफॉलो केल्यामुळे ब्रेकअपच्या चर्चांना वेग आला आहे. हा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला आहे की, एका वर्षातच असे काय घडले की त्यांना एकमेकांना अनफॉलो करावे लागले? या प्रश्नाचे उत्तर केवळ हार्दिक किंवा जस्मिनच देऊ शकतात.


हार्दिक पांड्या हा सध्या भारतीय क्रिकेटमधील एक महत्त्वाचा खेळाडू असून, तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतो. दुसरीकडे, जस्मिन वालिया ही एक ब्रिटिश गायिका आणि टीव्ही व्यक्तिमत्त्व असून, ती तिच्या इंग्रजी, पंजाबी आणि हिंदी गाण्यांसाठी ओळखली जाते.


या ब्रेकअपच्या चर्चांमागे सत्य काय आहे, हे येणारा काळच सांगेल.

Comments
Add Comment

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे