हार्दिक पांड्या आणि जस्मिन वालिया यांच्यात ब्रेकअपच्या चर्चांना उधाण

  50

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि ब्रिटीश गायिका तेसच टीव्ही स्टार जस्मिन वालिया यांच्यात ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना सध्या सोशल मीडियावर उधाण आले आहे. गेल्या एक वर्षांपासून त्यांच्यातील अफेअरच्या चर्चा सुरू होत्या, मात्र आता दोघांनीही एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिक आणि जस्मिन यांनी आपापल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एकमेकांचे नाव काढून टाकले आहे. यापूर्वी ते एकमेकांना फॉलो करत होते, मात्र आता ते करत नसल्याचे दिसून आले आहे. या कृतीमुळे त्यांच्यातील संबंध संपुष्टात आल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, या संदर्भात दोघांकडूनही अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.


अफेअरच्या चर्चांना कशी सुरुवात झाली?


हार्दिक पांड्या आणि जस्मिन वालिया यांच्यातील अफेअरच्या चर्चांना साधारण एक वर्षापूर्वी सुरुवात झाली होती. हार्दिकने ग्रीसमध्ये सुट्ट्या घालवताना एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्याचे पार्श्वभूमी जस्मिनने तीन दिवसांपूर्वी पोस्ट केलेल्या फोटोशी जुळत होती. यामुळे त्यांच्यात जवळीक वाढल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यावेळीही त्यांच्या नात्याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती, केवळ तर्कवितर्क लावले जात होते.


एक वर्षातच अनफॉलो का केले?


हार्दिक आणि जस्मिन यांच्या अफेअरच्या चर्चांना एक वर्ष पूर्ण होत असतानाच त्यांनी एकमेकांना अनफॉलो केल्यामुळे ब्रेकअपच्या चर्चांना वेग आला आहे. हा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला आहे की, एका वर्षातच असे काय घडले की त्यांना एकमेकांना अनफॉलो करावे लागले? या प्रश्नाचे उत्तर केवळ हार्दिक किंवा जस्मिनच देऊ शकतात.


हार्दिक पांड्या हा सध्या भारतीय क्रिकेटमधील एक महत्त्वाचा खेळाडू असून, तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतो. दुसरीकडे, जस्मिन वालिया ही एक ब्रिटिश गायिका आणि टीव्ही व्यक्तिमत्त्व असून, ती तिच्या इंग्रजी, पंजाबी आणि हिंदी गाण्यांसाठी ओळखली जाते.


या ब्रेकअपच्या चर्चांमागे सत्य काय आहे, हे येणारा काळच सांगेल.

Comments
Add Comment

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल