मुंबईच्या तलावांमध्ये ८२ टक्के पाणीसाठा


मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये एकूण ८२ टक्के पाणीसाठा झाला आहे. प्रमुख तलावांमधील एकत्रित पाणी क्षमता १४,४७,३६३ दशलक्ष लिटर आहे. सध्या सर्व तलावांचा एकत्रित उपयुक्त पाणीसाठा ११,८७,८२९ दशलक्ष लिटर आहे. भांडुप कॉम्प्लेक्समधील हायड्रॉलिक इंजिनिअर विभागाच्या आकडेवारीनुसार, २० जुलै २०२४ रोजी सर्व तलावांचा एकत्रित उपयुक्त पाणीसाठा ४०.९६ टक्के होता तो यंदा २० जुलै २०२५ रोजी ८२ टक्क्यांच्या घरात पोहोचला आहे.






  1. अप्पर वैतरणा तलावाची क्षमता २,२७,०४७ दशलक्ष लिटर आहे, या तलावात सध्या १,७२,५१७ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.

  2. मोडकसागर तलावाची क्षमता १,२८,९२५ दशलक्ष लिटर आहे, या तलावात सध्या १,२८,२८३ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.

  3. तानसा तलावाची क्षमता १,४५,०८० दशलक्ष लिटर आहे, या तलावात सध्या १,३२,६४४ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.

  4. मध्य वैतरणा तलावाची क्षमता १,९३,५३० दशलक्ष लिटर आहे, या तलावात सध्या १,८१,८०१ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.

  5. भातसा तलावाची क्षमता ७,१७,०३७ दशलक्ष लिटर आहे, या तलावात सध्या ५,५३,६४६ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.

  6. विहार तलावाची क्षमता २७,६९८ दशलक्ष लिटर आहे, या तलावात सध्या १४,५९१ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.

  7. तुळशी तलावाची क्षमता ८०४६ दशलक्ष लिटर आहे, या तलावात सध्या ४३४६ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.


Comments
Add Comment

...म्हणून रोहित आर्यशी बोलले नव्हते माजी मंत्री दीपक केसरकर

मुंबई: मागील आठवड्यात पवईच्या आर.ए. स्टुडिओमध्ये ओलीस ठेवलेल्या मुलांच्या घटनेनंतर सर्वत्रच भीतीदायक वातावरण

मुन्नारला पर्यटनासाठी गेलेल्या महिलेचा टॅक्सीचालकांनी केला छळ! दोन अधिकारी निलंबित

मुंबई: मुंबईहून मुन्नारला पर्यटनासाठी गेलेल्या महिलेचा टॅक्सीचालकांनी छळ केल्याची घटना समोर येत आहे. संबंधित

मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना २६ जानेवारीपर्यंत लागू करण्याच्या दृष्टीने आराखडा तयार करा

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या सूचना मुंबई  : मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना २६ जानेवारी २०२६

भारतातील अस्वच्छ शहरांमध्ये मुंबईचा समावेश, दिल्लीलाही टाकले मागे

मुंबई: स्वच्छता सर्वेक्षण २०२४-२५ च्या अहवालात स्वच्छतेच्या आधारावर भारतातील शहरांचे क्रमांक जाहीर करण्यात

Chhagan Bhujbal : राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी 'हृदय शस्त्रक्रिया'; प्रकृती स्थिर, काही दिवस सक्तीची विश्रांती

मुंबई : महाराष्ट्राचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर मुंबईतील एशियन

ठाणे ते बोरिवली प्रवास होणार अवघ्या १५ मिनिटांत; दुहेरी बोगदा प्रकल्पाचे काम वेगात

मुंबई : देशातील सर्वात मोठा आणि सर्वात लांब शहरी बोगदा रस्ते मार्ग म्हणजे ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प