निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये ३६.८६ लाख मतदार गायब

मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेत ९० टक्के मतदारांचा सहभाग


पाटणा : बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या विशेष मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेत राज्यातील ९०.१२ टक्के मतदारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. यामध्ये ३६.८६ लाख मतदार गहाळ, मृत किंवा कायमस्वरूपी स्थलांतरित असल्याचेही आढळले आहे.


या विशेष पुनरीक्षणाची सुरुवात २५ जून रोजी झाली होती. आयोगाने २४ जून रोजी आदेश जारी केल्यानंतर लगेचच बिहारमध्ये ही प्रक्रिया सुरू झाली. राज्यातील ७.८ कोटी नोंदणीकृत मतदारांना मतदार यादीत नावाची पुष्टी करण्यासाठी फॉर्म भरून देण्याचे आवाहन करण्यात आले होते.


आयोगाच्या माहितीनुसार, ७.११ कोटी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ६.८५ कोटी अर्ज डिजिटल स्वरूपात प्रक्रियेत आणण्यात आले आहेत. ६९७८ मतदार (०.०१ टक्के) ‘शोधता न येणारे’ असल्याचेही नोंदवले गेले आहे.



गहाळ, मृत, कायमस्वरूपी स्थलांतरितांबाबत आयोगाचा खुलासा


पुढील टप्पा - मसुदा यादी व हरकती  १ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान मसुदा यादीवर हरकती व दावे सादर करता येतील. निवडणूक नोंदणी अधिकारी २५ सप्टेंबरपर्यंत या हरकतींचा निपटारा करतील. ३० सप्टेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित केली जाईल.


२५ जुलैपूर्वी हरकती नोंदविण्याचे आवाहन
बीएलओ यांनी सांगितले की, ते २५ जुलैच्या काही दिवस आधीच काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, हरकती अथवा दावे २५ जुलैपूर्वी नोंदवण्याचे आवाहन केले आहे.


राजकीय पक्षांना यादी मोफत  प्रिंट व डिजिटल स्वरूपात अंतिम मतदार यादी सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना मोफत दिली जाणार असून, ती निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरही उपलब्ध असेल.

Comments
Add Comment

University in Afghanistan : पाकिस्तानचा अफगाणिस्तान विद्यापीठावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू

काबुल : अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष पुन्हा तीव्र झाला आहे. तालिबान सरकारने दावा केला की

Gujarat : क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या बहिणीचा महापालिकेत पराभव; भाजपने बालेकिल्ला राखला

Gujarat Local Body Election Results 2026: : गुजरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपने आपला गड राखला आहे. मंगळवारी

पाकिस्तानला फुटणार घाम ! रशियाने भारताला दिली मोठी गुड न्यूज, लवकरच...

नवी दिल्ली : भारतासाठी मोठी आनंदाची बातमी मात्र पाकिस्तानला घाम फोडणारी अशी बातमी समोर आली आहे. ऑपरेशन सिंदूर

Crime : नॉनव्हेज जेवणाचा वाद विकोपाला, वैतागलेल्या पत्नीने धारदार शस्त्र घेऊन केलं थेट असं काही की...

तेलंगणा Telangana : तेलंगणातील कामारेड्डी परिसरात मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. छोट्याशा कौटुंबिक वादाचं रूपांतर

Massive fire in Bengaluru : बेंगळुरूमध्ये भीषण आग! नंदिनी लेआउटमध्ये PG इमारतीत अडकलेल्या ५० तरुणींचा थरारक बचाव

बेंगळुरू शहरातील नंदिनी लेआउट परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी उशिरा रात्री लागलेल्या भीषण

गुड न्यूज ! सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण, सोन्याचे आजचे दर किती ?

नवी दिल्ली : सध्या लग्नसराई सुरु आहे, पण सोन्याचे वाढते दर पाहता एन लग्नसराईत सोने खरेदी करावी की नाही असा प्रश्न