निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये ३६.८६ लाख मतदार गायब

  60

मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेत ९० टक्के मतदारांचा सहभाग


पाटणा : बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या विशेष मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेत राज्यातील ९०.१२ टक्के मतदारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. यामध्ये ३६.८६ लाख मतदार गहाळ, मृत किंवा कायमस्वरूपी स्थलांतरित असल्याचेही आढळले आहे.


या विशेष पुनरीक्षणाची सुरुवात २५ जून रोजी झाली होती. आयोगाने २४ जून रोजी आदेश जारी केल्यानंतर लगेचच बिहारमध्ये ही प्रक्रिया सुरू झाली. राज्यातील ७.८ कोटी नोंदणीकृत मतदारांना मतदार यादीत नावाची पुष्टी करण्यासाठी फॉर्म भरून देण्याचे आवाहन करण्यात आले होते.


आयोगाच्या माहितीनुसार, ७.११ कोटी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ६.८५ कोटी अर्ज डिजिटल स्वरूपात प्रक्रियेत आणण्यात आले आहेत. ६९७८ मतदार (०.०१ टक्के) ‘शोधता न येणारे’ असल्याचेही नोंदवले गेले आहे.



गहाळ, मृत, कायमस्वरूपी स्थलांतरितांबाबत आयोगाचा खुलासा


पुढील टप्पा - मसुदा यादी व हरकती  १ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान मसुदा यादीवर हरकती व दावे सादर करता येतील. निवडणूक नोंदणी अधिकारी २५ सप्टेंबरपर्यंत या हरकतींचा निपटारा करतील. ३० सप्टेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित केली जाईल.


२५ जुलैपूर्वी हरकती नोंदविण्याचे आवाहन
बीएलओ यांनी सांगितले की, ते २५ जुलैच्या काही दिवस आधीच काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, हरकती अथवा दावे २५ जुलैपूर्वी नोंदवण्याचे आवाहन केले आहे.


राजकीय पक्षांना यादी मोफत  प्रिंट व डिजिटल स्वरूपात अंतिम मतदार यादी सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना मोफत दिली जाणार असून, ती निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरही उपलब्ध असेल.

Comments
Add Comment

निवडणूक आयोगाची उद्या दिल्लीत पत्रकार परिषद, नेमकी कशासाठी?

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोग उद्या, रविवारी (१७ ऑगस्ट) दुपारी ३ वाजता नॅशनल मिडिया सेंटर नवी दिल्ली येथे

FASTag वार्षिक पासला प्रचंड प्रतिसाद, पहिल्याच दिवशी १.४ लाख पासची बुकिंग

नवी दिल्ली: राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या FASTag वार्षिक पासला पहिल्याच दिवशी

नागालँडचे राज्यपाल ला. गणेशन यांचे निधन

चेन्नई: नागालँडचे राज्यपाल ला. गणेशन (L.A. Ganesan) यांचे शुक्रवारी (१५ ऑगस्ट, २०२५) रात्री चेन्नई येथील रुग्णालयात निधन

Accident news: स्वातंत्र्यदिनी मोठा बस अपघात! १० जणांचा जागीच मृत्यू, ३५ प्रवासी जखमी

बर्दवान: देशात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना पश्चिम बंगालच्या पूर्व बर्दवान जिल्ह्यातून

दिल्ली : हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळून ५ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दिल्लीतील निजामुद्दीन भागात असलेल्या हुमायूं मकबऱ्यामध्ये भिंत कोसळल्याची

IIT Hyderabad AI Driverless Bus : भारताचा टेक्नॉलॉजी चमत्कार! IIT हैदराबादमध्ये ड्रायव्हरविना बस, १० हजार प्रवाशांनी घेतला भन्नाट अनुभव

हैदराबाद : हैदराबादच्या भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT Hyderabad) ने तंत्रज्ञानाच्या नव्या पर्वाची सुरुवात करत देशातील