नाशिक जि.प.मध्ये अधिकाऱ्यांकडून महिला कर्मचाऱ्यांवर लैंगिक छळ, पोलिसांनी केली चौकशी

नाशिक: जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्याकडून महिला कर्मचाऱ्यांवरील लैंगिक छळ प्रकरणाची शहर पोलिसांच्या महिला सुरक्षा विभागाने दखल घेतली आहे. सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेला भेट देवून माहिती घेण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे.


गेल्या दोन आठवड्यापासून जिल्हा परिषदेतील लैंगिक छळ प्रकरणाची चर्चा होत असून, त्याचे पडसाद विधीमंडळाच्या अधिवेशनात उमटले. ग्रामविकास मंत्र्यांनी एका अधिकाऱ्याला निलंबीत तर एकाला सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश दिले. या प्रकरणातील एक अधिकारी चौकशी होण्यापुर्वीच रजेवर निघून गेला आहे. राज्यभर या प्रकरणाची चर्चा होत असून, अजुन काही अधिकाऱ्यांच्या विरोधातही अशा स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.


त्या पार्श्वभूमीवर महिला सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेत जावून चौकशीचा प्रयत्न केला. मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी रजेवर असल्याने त्यांच्या चौकशीला मर्यादा पडल्या. या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशाखा समिती अध्यक्षांशी या अधिकाऱ्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. मिळालेल्या माहितीवरून गृह विभागानेच या संदर्भातील आदेश पोलीस यंत्रणेला दिल्याचे समजते.

Comments
Add Comment

दुबईत एअर शो दरम्यान LCA तेजस विमान कोसळले, विंग कमांडर नमांश स्यालचा मृत्यू

दुबई : दुबई एअर शो दरम्यान शुक्रवार २१ नोव्हेंबर २०२५ रोजी भारताचे एलसीए तेजस विमान कोसळले. या अपघातात विंग

टीम इंडियासमोर मालिका वाचवण्याचे आव्हान

गुवाहाटी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना

IND vs BAN: भारताचा सुपर ओव्हरमध्ये पराभव, हिरो बनण्याच्या प्रयत्नात झिरो झाला कॅप्टन

दोहा : भारताचा (भारत अ) आशिया कप रायझिंग कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभव झाला. हा सामना जिंकून

कांदिवलीच्या चारकोप परिसरात बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार, चौघांना अटक

मुंबई : मुंबई, ठाणे, पुणे पट्ट्यात बांधकाम व्यवसायातून कोट्यवधींची नियमित उलाढाल होते. यामुळेच झटपट पैसा

मंत्री मंगलप्रभात लोढांना आमदार अस्लम शेखांनी दिली धमकी

मुंबई : मुंबईच्या सुरक्षेसंदर्भात सातत्याने रोहिंगे आणि घुसखोर बांग्लादेशींचा मुद्दा उचलून धरणारे मुंबई

निवडणूक होण्याआधीच नेत्यांच्या नातलगांचा बिनविरोध विजय, राजकीय पाठबळावर अनेकांची बिनविरोध निवड

मुंबई : महाराष्ट्रात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल,