आदित्य ठाकरेंवर मार्मिक टिप्पणी करणारी पोस्टर झळकली


पुणे : आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत बोलताना ठरवून उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. याला उत्तर म्हणून पुण्यातील शिवसैनिकांनी आदित्य ठाकरेंवर मार्मिक टिप्पणी करणारी पोस्टर ठिकठिकाणी लावली आहेत.





पुण्यातील प्रमुख चौकांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेल्या पोस्टर्समध्ये शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद (नाना) भानगिरे यांनी आदित्यला एका कार्टून पात्राच्या भूमिकेत दाखवले आहे. पोस्टरवर आदित्य ठाकरे यांना कार्टून पात्राच्या रुपात दाखवले आहे. "ही बॅटरी लवकरच संपेल... ती घराणेशाहीवर चालते" असे वाक्य या पोस्टरवर छापले आहे. दुसऱ्या पोस्टरमध्ये मिठी नदी घोटाळ्याचा संदर्भ दिसत आहे. या पोस्टरवर आता मोजत राहा, बघा किती जण तुरुंगात जातात.


आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत आणि प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे यांच्यावर जाहीर टीका केली होती. यानंतर काही दिवसांतच हे घडले आहे. शिंदे यांचे थेट नाव न घेता, ठाकरे यांनी त्यांना "देशद्रोही," "कृतघ्न" आणि "निर्लज्ज" व्यक्ती म्हटले होते. याला उत्तर म्हणूनच शिवसैनिकांनी पोस्टरबाजी केली आहे.


Comments
Add Comment

मुंबईसह महानगरात महायुतीच्या सभांचा धडाका

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह देशभरातून स्टार प्रचारक येणार मुंबई : मिनी

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

परवा घसरण काल वाढ पुन्हा घसरण सोन्याचांदीत नक्की चाललंय काय? एक दिवसात सोने ३.५३% व चांदीत ७% घसरण वाचा,आजचे दर विश्लेषणासह

मोहित सोमण: आज सोन्याच्या दरात घसरण व चांदीच्या दरात बदल झालेला नाही. सोन्यातील अस्थिरता कायम असताना चांदीतही

ठाकरे गटाच्या ३५ उमेदवारांचे अर्ज धोक्यात, भाजपचा स्कॅन सह्यांवर आक्षेप

जळगाव : जळगाव महापालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात ठाकरे गट आणि भाजप-शिंदे गट यांच्यात कायदेशीर संघर्ष तीव्र

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.