या अभियानाचा शुभारंभ ठाण्यातील लोकमान्य नगर भागातील पालिकेच्या कोरस आरोग्य केंद्र येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. ठाणे महापालिकेचे अतिरिक्त संदिप माळवी, उपायुक्त उमेश बिरारी, मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील, रोटरी क्लबचे डॉ. कारखानीस यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते. या उपक्रमादरम्यान शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
या अभियानात महिलांच्या गर्भाशय मुखाचा कर्करोग तपासणी, ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी एचपीव्ही लस, मधुमेह आणि हिमोग्बोलीनची तपासणी, स्त्रीयांचे निरोगी राहणीमान आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत संवाद शिबीर यांचा अंतर्भाव आहे. यासाठी इथे सोनोग्राफीची अद्ययावत मशीन, मॅमोग्राफीची गाडी सज्ज ठेवण्यात आली आहे. त्या माध्यमातून नामवंत डॉक्टरांची मदत घेऊन हे अभियान राबविण्यात येईल. पुढील तीन महिन्यांत पाच लाख महिलांची विनामूल्य वैद्यकीय तपासणी या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी जाहीर केले.
गर्भाशयाचा कर्करोग हा जगातील दुसरा सर्वसाधारण आढळणारा आजार असून त्यांचे निदान लवकर झाले तरच त्यावर उपाय करणे शक्य होते. आपल्या कुटुंबातील महिला भगिनी या कायम कुटुंबाकडे लक्ष देताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे या शिबिराकडे दुर्लक्ष न करता जास्तीत जास्त महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन शिंदे यांनी याप्रसंगी केले.
माझ्या लाडक्या बहिणींसाठी हे अभियान सुरू करण्यात आले असून, पुढील तीन महिन्यांत पाच लाख महिलांची विनामूल्य वैद्यकीय तपासणी या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येईल, असे यावेळी जाहीर केले.
तीन कोटी महिलांची तपासणी
लाडक्या बहिणींचा आरोग्य चांगले राहावे, हे आमच्या सगळ्यांची भावना आहे. आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवित असताना लाडक्या बहिणी आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. स्वत:साठी वेळ काढत नाही. यामुळेच मुख्यमंत्री असताना माता सुरक्षित घर सुरक्षित हे अभियान राबविले होते. यात जवळपास तीन कोटी महिलांची तपासणी करण्यात आली होती आणि त्याचा फायदाही झाला. निदान झाल्यानंतर महिलांना पुढचे उपचार करण्यात आल्याने अनेक महिलांचा आजार बरा झाला.