लाडक्या बहिणींचे आरोग्य चांगले रहावे'; ५ कोटींचा निधी देण्याची उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

  75

ठाणे : नगरविकास विभागाकडून ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागास पाच कोटींचा निधी देण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी ठाण्यात केली. ठाणे महापालिका सार्वजनिक आरोग्य विभाग, रोटरी क्लब आणि आदित्य बिर्ला कॅपीटल फाऊंडेशनच्या वतीने उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियान राबविण्यात येत आहे.

या अभियानाचा शुभारंभ ठाण्यातील लोकमान्य नगर भागातील पालिकेच्या कोरस आरोग्य केंद्र येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. ठाणे महापालिकेचे अतिरिक्त संदिप माळवी, उपायुक्त उमेश बिरारी, मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील, रोटरी क्लबचे डॉ. कारखानीस यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते. या उपक्रमादरम्यान शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

या अभियानात महिलांच्या गर्भाशय मुखाचा कर्करोग तपासणी, ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी एचपीव्ही लस, मधुमेह आणि हिमोग्बोलीनची तपासणी, स्त्रीयांचे निरोगी राहणीमान आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत संवाद शिबीर यांचा अंतर्भाव आहे. यासाठी इथे सोनोग्राफीची अद्ययावत मशीन, मॅमोग्राफीची गाडी सज्ज ठेवण्यात आली आहे. त्या माध्यमातून नामवंत डॉक्टरांची मदत घेऊन हे अभियान राबविण्यात येईल. पुढील तीन महिन्यांत पाच लाख महिलांची विनामूल्य वैद्यकीय तपासणी या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी जाहीर केले.

गर्भाशयाचा कर्करोग हा जगातील दुसरा सर्वसाधारण आढळणारा आजार असून त्यांचे निदान लवकर झाले तरच त्यावर उपाय करणे शक्य होते. आपल्या कुटुंबातील महिला भगिनी या कायम कुटुंबाकडे लक्ष देताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे या शिबिराकडे दुर्लक्ष न करता जास्तीत जास्त महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन शिंदे यांनी याप्रसंगी केले.

माझ्या लाडक्या बहिणींसाठी हे अभियान सुरू करण्यात आले असून, पुढील तीन महिन्यांत पाच लाख महिलांची विनामूल्य वैद्यकीय तपासणी या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येईल, असे यावेळी जाहीर केले.

तीन कोटी महिलांची तपासणी

लाडक्या बहिणींचा आरोग्य चांगले राहावे, हे आमच्या सगळ्यांची भावना आहे. आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवित असताना लाडक्या बहिणी आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. स्वत:साठी वेळ काढत नाही. यामुळेच मुख्यमंत्री असताना माता सुरक्षित घर सुरक्षित हे अभियान राबविले होते. यात जवळपास तीन कोटी महिलांची तपासणी करण्यात आली होती आणि त्याचा फायदाही झाला. निदान झाल्यानंतर महिलांना पुढचे उपचार करण्यात आल्याने अनेक महिलांचा आजार बरा झाला.
Comments
Add Comment

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन

प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार मुंबई :

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल

वसई विरार मनपाच्या माजी आयुक्तांनंतर आणखी एका बड्या अधिकाऱ्यावर ED ची धाड

मुंबई : वसई विरारचे महापालिकेचे महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार यांच्यावर ED नं काही दिवसांपूर्वीच धाड टाकली

हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांनी बनवले फेक इन्स्टाग्राम अकाउंट

मुंबई : मुंबईतील धारावी परिसरात एप्रिल महिन्यात एका वीस वर्षीय तरुणाने एका व्यक्तीला धारदार हत्याराने वार करत

टेस्ला मुंबईत पहिले चार्जिंग स्टेशन सुरू करणार!

मुंबई : अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन उत्पादक टेस्लाने घोषणा केली आहे की, त्यांचे भारतातील पहिले चार्जिंग स्टेशन