लाडक्या बहिणींचे आरोग्य चांगले रहावे'; ५ कोटींचा निधी देण्याची उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

ठाणे : नगरविकास विभागाकडून ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागास पाच कोटींचा निधी देण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी ठाण्यात केली. ठाणे महापालिका सार्वजनिक आरोग्य विभाग, रोटरी क्लब आणि आदित्य बिर्ला कॅपीटल फाऊंडेशनच्या वतीने उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियान राबविण्यात येत आहे.

या अभियानाचा शुभारंभ ठाण्यातील लोकमान्य नगर भागातील पालिकेच्या कोरस आरोग्य केंद्र येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. ठाणे महापालिकेचे अतिरिक्त संदिप माळवी, उपायुक्त उमेश बिरारी, मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील, रोटरी क्लबचे डॉ. कारखानीस यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते. या उपक्रमादरम्यान शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

या अभियानात महिलांच्या गर्भाशय मुखाचा कर्करोग तपासणी, ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी एचपीव्ही लस, मधुमेह आणि हिमोग्बोलीनची तपासणी, स्त्रीयांचे निरोगी राहणीमान आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत संवाद शिबीर यांचा अंतर्भाव आहे. यासाठी इथे सोनोग्राफीची अद्ययावत मशीन, मॅमोग्राफीची गाडी सज्ज ठेवण्यात आली आहे. त्या माध्यमातून नामवंत डॉक्टरांची मदत घेऊन हे अभियान राबविण्यात येईल. पुढील तीन महिन्यांत पाच लाख महिलांची विनामूल्य वैद्यकीय तपासणी या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी जाहीर केले.

गर्भाशयाचा कर्करोग हा जगातील दुसरा सर्वसाधारण आढळणारा आजार असून त्यांचे निदान लवकर झाले तरच त्यावर उपाय करणे शक्य होते. आपल्या कुटुंबातील महिला भगिनी या कायम कुटुंबाकडे लक्ष देताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे या शिबिराकडे दुर्लक्ष न करता जास्तीत जास्त महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन शिंदे यांनी याप्रसंगी केले.

माझ्या लाडक्या बहिणींसाठी हे अभियान सुरू करण्यात आले असून, पुढील तीन महिन्यांत पाच लाख महिलांची विनामूल्य वैद्यकीय तपासणी या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येईल, असे यावेळी जाहीर केले.

तीन कोटी महिलांची तपासणी

लाडक्या बहिणींचा आरोग्य चांगले राहावे, हे आमच्या सगळ्यांची भावना आहे. आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवित असताना लाडक्या बहिणी आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. स्वत:साठी वेळ काढत नाही. यामुळेच मुख्यमंत्री असताना माता सुरक्षित घर सुरक्षित हे अभियान राबविले होते. यात जवळपास तीन कोटी महिलांची तपासणी करण्यात आली होती आणि त्याचा फायदाही झाला. निदान झाल्यानंतर महिलांना पुढचे उपचार करण्यात आल्याने अनेक महिलांचा आजार बरा झाला.
Comments
Add Comment

किया इंडियाने कारची वॉरंटी ७ वर्षांपर्यंत वाढवली

मुंबई:किया इंडिया मास प्रीमियम कारमेकरने आपला एक्‍स्‍टेण्‍डेड वॉरंटी प्रोग्राम वेईकल डिलिव्‍हरीच्‍या

मराठा सेवा संघाच्या नकुल भोईरची हत्या, पत्नीला अटक

पुणे: पुणे जिल्ह्यातील चिंचवड परिसरात मध्यरात्री घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. मराठा सेवा संघ आणि

८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठुभक्ताची पंढरपूर वारी

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ बेळगाव : पौराणिक कथेप्रमाणे कर्नाटकातही आधुनिक श्रावणबाळ असल्याचं दिसून आलं आहे.

पुणेकरांसाठी पुन्हा त्रासदायक बातमी; भिडे पूल पुन्हा बंद, नववर्षातच खुला होण्याची शक्यता

पुणे : पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासातील एक महत्त्वाचा दुवा असलेला बाबाराव भिडे पूल पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद

पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेवर दि. २५ ते २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर

सोन्याचा हार कचऱ्यात गेला; कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शोधाशोध झाली आणि अखेर...

कल्याण : सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत असून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. अशा काळात सोनं जपून ठेवणं