चाकरमान्यांना बाप्पा पावला

भाविकांसाठी रेल्वेच्या दोन विशेष गाड्या 


पालघर : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी रेल्वेने दोन विशेष गाड्या सुरू करण्याचे नियोजन केले आहे. पालघर जिल्ह्यातील वसई, पालघर आणि डहाणू रेल्वे स्थानकावर या गाड्यांना थांबा राहणार आहे. त्यामुळे कोकणात प्रवास करणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा
मिळणार आहे.


कोकणातील गणेश भक्तांच्या सोयीसाठी दोन विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. विश्वामित्री-रत्नागिरी एक्स्प्रेस (गाडी क्रमांक ०९११०/०९१०९) ही गाडी पालघर जिल्ह्यातील डहाणू, पालघर आणि वसई येथे थांबणार आहे. ही गाडी ऑगस्ट महिन्यात २३, २७ आणि ३० ऑगस्ट रोजी, तसेच सप्टेंबर महिन्यात ३ आणि ६ सप्टेंबर रोजी रत्नागिरीकडे जाईल. पालघरमध्ये दुपारी २.२० वाजता ही गाडी थांबेल आणि रात्री रत्नागिरीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी २४ ऑगस्ट, २८ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट, ४ सप्टेंबर आणि ७ सप्टेंबर रोजी धावेल. रत्नागिरीहून रात्री सुटून पालघरमध्ये सकाळी ११.४८ वाजता पोहोचेल.


तसेच वडोदरा-रत्नागिरी एक्स्प्रेस (गाडी क्रमांक ०९११४/०९११३) ही दुसरी विशेष गाडी २६ ऑगस्ट आणि २ सप्टेंबर रोजी रत्नागिरी जाण्यासाठी निघेल. ही गाडी पालघरमध्ये दुपारी ३.३० वाजता थांबेल. परतीच्या प्रवासात ही गाडी २७ ऑगस्ट आणि ३ सप्टेंबर रोजी रत्नागिरीहून सुटून पालघरमध्ये सकाळी ११.४८ वाजता पोहोचेल.

Comments
Add Comment

ई-गव्हर्नन्स मूल्यमापनात वसई–विरार पालिकेचा ‘नववा क्रमांक’ कायम

पालघर :  राज्यातील महानगरपालिकांच्या ई-गव्हर्नन्स कामकाजाच्या मूल्यमापनात वसई–विरार महानगरपालिकाने यंदाही

Virar: दारूच्या नशेत सापासोबत मस्ती बेतली जीवावर; विरारमध्ये तरुणाचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू

विरार: दारूच्या नशेत विषारी जातीच्या सापाला पकडणे आणि अति उत्साहाच्या भरात सापसोबतच मस्ती करणे विरार येथील एका

वसई-दिवा मार्गावर मेगाब्लॉक, शनिवारी आणि रविवारी प्रवाशांचे हाल

वसई : दिवा-वसई रोड मार्गावरील खारबाव (Kharbav) स्थानकात नवीन अप आणि डाऊन मालवाहू मार्गिकांच्या कामासाठी शनिवार आणि

धक्राकादायक! १५ वर्षाच्या भाच्याकडून आत्याचा खून

वसई : वसई परिसरामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रागाच्या भरात एका १५ वर्षीय मुलाने आपल्या आत्याचा खून

सत्तेचे गणित बिघडले; बेरजेचे गणित जमले

गणेश पाटील, विरार : वसई-विरारमध्ये एकापेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याची राजकीय शक्ती नसलेल्या भाजपने यावेळी

पाण्याच्या टाकीत मानवी हाडांचा सापळा

वसईच्या माणिकपूर गावातील घटना वसई : वसईच्या माणिकपूर येथील एका चाळीच्या रिकाम्या पाण्याच्या टाकीत पुरुषाच्या