चाकरमान्यांना बाप्पा पावला

भाविकांसाठी रेल्वेच्या दोन विशेष गाड्या 


पालघर : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी रेल्वेने दोन विशेष गाड्या सुरू करण्याचे नियोजन केले आहे. पालघर जिल्ह्यातील वसई, पालघर आणि डहाणू रेल्वे स्थानकावर या गाड्यांना थांबा राहणार आहे. त्यामुळे कोकणात प्रवास करणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा
मिळणार आहे.


कोकणातील गणेश भक्तांच्या सोयीसाठी दोन विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. विश्वामित्री-रत्नागिरी एक्स्प्रेस (गाडी क्रमांक ०९११०/०९१०९) ही गाडी पालघर जिल्ह्यातील डहाणू, पालघर आणि वसई येथे थांबणार आहे. ही गाडी ऑगस्ट महिन्यात २३, २७ आणि ३० ऑगस्ट रोजी, तसेच सप्टेंबर महिन्यात ३ आणि ६ सप्टेंबर रोजी रत्नागिरीकडे जाईल. पालघरमध्ये दुपारी २.२० वाजता ही गाडी थांबेल आणि रात्री रत्नागिरीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी २४ ऑगस्ट, २८ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट, ४ सप्टेंबर आणि ७ सप्टेंबर रोजी धावेल. रत्नागिरीहून रात्री सुटून पालघरमध्ये सकाळी ११.४८ वाजता पोहोचेल.


तसेच वडोदरा-रत्नागिरी एक्स्प्रेस (गाडी क्रमांक ०९११४/०९११३) ही दुसरी विशेष गाडी २६ ऑगस्ट आणि २ सप्टेंबर रोजी रत्नागिरी जाण्यासाठी निघेल. ही गाडी पालघरमध्ये दुपारी ३.३० वाजता थांबेल. परतीच्या प्रवासात ही गाडी २७ ऑगस्ट आणि ३ सप्टेंबर रोजी रत्नागिरीहून सुटून पालघरमध्ये सकाळी ११.४८ वाजता पोहोचेल.

Comments
Add Comment

नालासोपाऱ्यात ५० लाखांचा मेफेड्रोन जप्त

वसई : नालासोपाऱ्यामध्ये अमली पदार्थ तस्करीसाठी आलेल्या तीन जणांना गुन्हे प्रकटीकरण शाखा २ ने अटक केली आहे.

वसई स्काय वॉकचा काही भाग कोसळला

वसई : वसई - विरार महानगरपालिका हद्दीत सध्या धोकादायक बांधकामे,उद्यान, नाल्यावरील स्लॅब कोसळण्याचा घटना सतत घडत

पालघरच्या किनाऱ्यावर ३ संशयास्पद कंटेनर आढळले! सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा

पालघर: जिल्ह्यातील किनारपट्टी भागात तीन संशयास्पद कंटेनर वाहून आल्याची बातमी समोर येत आहे. महामंडळाचे अधिकारी

Ganeshotsav 2025 : घोणसईत गणपतीबरोबर देशभक्ती! 'ऑपरेशन सिंदूर' देखावा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

गणेशोत्सवात देशभक्तीचा संगम – हर्षल पाटील यांचा देखावा ठरत आहे आकर्षणाचा केंद्रबिंदू पालघर : गणेशोत्सव २०२५

विरार इमारत दुर्घटनेत या १७ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये एक वर्षाच्या चिमुरडीचाही समावेश

विरार : विरार पूर्व येथील चामुंडानगरमधील रमाबाई अपार्टमेंट कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू

विरारमधील जुनी इमारत कोसळली, वाढदिवसाच्या कार्यक्रमावर काळजात धस्स करणारी घटना

विरार: गणेशोत्सवाचा आनंद सर्वत्र साजरा होत असताना, मुंबईजवळील विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विरार