असल्फा देवराळ परिसरात पाण्याची समस्या जटिल

मुंबई : असल्फा परिसरात दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हा संपूर्ण भाग देवराळ परिसरातून पाण्याची समस्या नेहमीच उद्भवत असते. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन माजी नगरसेवक किरण लांडगे, विजयेन्द्र शिंदे व ईश्वर तायडे यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगर जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांच्या दालनात बैठक पार पडली.


यावेळी साने गुरुजी नगर, लालबत्ती, हनुमान टेकडी, नारायण नगर, मराठवाडा चाळ, दत्त मंदिर परिसर, ओम साई धाम सोसायटी, वीर बजरंग क्रीडा मंडळ, भिम नगर, छत्रपती शिवाजी नगर, नवलादेवी मित्र मंडळ या भागातील पाणी प्रश्नाबाबत असलेल्या वेगवेगळ्या अडचणी सोडवण्याबाबत निवेदन देण्यात आले. त्यात प्रामुख्याने पाण्याचा प्रेशर वाढविणे, अधिक क्षमतेचा पाणीपुरवठा पंप बसविणे, पाण्याची टाकी स्वच्छ करणे, टाकीची संरक्षण भिंत बांधणे, तसेच नवीन पाण्याची लाइन टाकणे इत्यादी कामांचा समावेश करण्यात आला आहे.




हा सर्व परिसर डोंगराळ भाग असून पाण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. या करिता मोर्चा, आंदोलने या माध्यमातून अनेक वेळा लढा दिला असून जनतेच्या हक्काचे पाणी त्यांना मिळून देणारच
- किरण लांडगे, ( माजी नगरसेवक )


Comments
Add Comment

Anant Ambani : हिप्पोंना मारु नका, वनतारामध्ये पाठवा; अनंत अंबानी यांची कोलंबिया सरकारला विनंती

मुंबई : उद्योगपती अनंत अंबानी यांचे प्राणीप्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात

Mumbai News : मुंबईत पाण्याचा निचरा करण्यासाठी ५४७ पंपांची आणि फिरते डीवॉटरिंग पंप असणाऱ्या १० वाहनांची व्यवस्था

मुंबईत यंदा पाणी साचण्याची फक्त ८० ठिकाणे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची

BMC News : 'मध्य वैतरणा प्रकल्प राबवताना तुमचे पर्यावरण प्रेम कुठे होते?'

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने गारगाई पाणी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी स्थायी समिती व महापालिका

single-window clearance : लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा

मुंबई : राज्यातील लाईव्ह मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लाईव्ह

Godavari to Narmada : असा होणार गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचा समारोप समारंभ

मुंबई : जलव्यवस्थापन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या

Seeds Act : राज्याचा स्वतंत्र बियाणे कायदा करणार

मुंबई : शेतकऱ्यांना स्वतःचे बियाणे साठवणे, वापरणे, देवाणघेवाण करणे आणि (ब्रँडेड नाव न वापरता) विक्री करण्यास