ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच होणार भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना

लंडन : ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना होणार आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स या स्पर्धेत दोन्ही संघ एकमेकांसमोर येणार आहे.दोन्ही संघांमधील सामना २० जुलै रोजी होणार आहे. जिथे भारत आणि पाकिस्तानचे दिग्गज खेळाडू एकमेकांसमोर येतील.


वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स ही स्पर्धा आजपासून म्हणजेच १८ जुलै रोजी सुरू होणार असून जिथे पहिला सामना इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मोठा सामना इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे होणार आहे. दोन्ही संघ २० जुलै रोजी एजबॅस्टन क्रिकेट ग्राउंडवर एकमेकांसमोर येतील. युवराज सिंग, हरभजन सिंग, सुरेश रैना आणि इरफान पठाण सारखे दिग्गज खेळाडू इंडियन चॅम्पियन्स संघात खेळताना दिसतील. शाहिद आफ्रिदी, शोएब मलिक आणि वहाब रियाझ सारखे दिग्गज खेळाडू पाकिस्तान संघात दिसू शकतात.


वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स स्पर्धेचा हा दुसरा हंगाम आहे. या दरम्यान इंग्लंड चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स यांच्यात सामना होईल.या स्पर्धेत एकूण ६ संघ असतील, त्यापैकी टॉप-४ संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. या स्पर्धेचा पहिला हंगाम भारतीय संघाने जिंकला होता. भारतीय संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला.


भारतीय चॅम्पियन्स संघ २० जुलै रोजी पाकिस्तानविरुद्ध मोहिमेची सुरुवात करेल. त्यानंतर २२ जुलै रोजी त्यांचा सामना दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्सशी होईल.


यानंतर, भारतीय संघ २६ जुलै रोजी ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्सशी सामना करेल. भारतीय संघ २७ जुलै रोजी इंग्लंड चॅम्पियन्स आणि २९ जुलै रोजी वेस्ट इंडिज चॅम्पियन्सशी सामना करेल.

Comments
Add Comment

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत

U19 Asia Cup Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रेसह प्रशिक्षकांवरही कारवाई होणार; पाकविरुद्ध फायनलमध्ये दारुण पराभव होताच BCCI अ‍ॅक्शन मोडवर!

मुंबई : पाकिस्तानविरुद्ध अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक