प्रवेश प्रक्रियेमध्ये दुहेरी लाभ घेणाऱ्या आयटीआय विद्यार्थ्यांवर कडक कारवाई: मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे निर्देश

  64

मुंबई: आयटीआय प्रवेश प्रक्रियेमध्ये दुहेरी लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले. विधान परिषदेत २६० च्या प्रस्तावावर उत्तर देताना कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले की, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये आय टी आय प्रवेश घेताना अनुसूचित जाती आणि अल्पसंख्याक दोन्ही सवलतींचा गैरफायदा घेतलेल्या विद्यार्थ्यांवर शासनाद्वारे कारवाई करण्यात येणार आहे. खोट्या मार्गाने मिळवलेले फायदे थांबवून प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत स्पष्ट केले होते की, अनुसूचित जातींच्या आरक्षणाचा लाभ केवळ हिंदू, बौद्ध आणि शीख समाजातील नागरिकांनाच मर्यादित आहे. इतर धर्मांतील काहींनी जर अशी जात प्रमाणपत्रे वापरून हा लाभ घेतला असेल, तर त्यांच्या प्रमाणपत्रांची वैधता रद्द करण्यात येईल, त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. ITI मध्ये बनावट प्रमाणपत्रांवर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांविरोधात होणारी कारवाईही महत्त्वाची ठरणार आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आयटीआय अद्ययावत करण्यासाठी पी पी पी मॉडेल अमलात आणण्याचा क्रांतिकारी निर्णय आमच्या विभागाने घेतला. याद्वारे आयटीआयमध्ये पायाभूत सुधारणा, नवीन सुविधा, तंत्रज्ञान आणि विकासासाठी आवश्यक पाठबळ पुरवले जाईल. इतकेच नाही तर विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, नवीन अभ्यासक्रम, रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी सहकार्य उपलब्ध होईल. आयटीआयमधील कोर्सेसला डिप्लोमा दर्जाची मान्यता मिळावी यासाठी देखील आम्ही प्रयत्नशील आहोत,असेही मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?’

अकोला : काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या

Megablock: मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान आज मेगा ब्लॉक

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक

मरेपर्यंत अशा लोकांना समाजात मिळत नाही मान, होतो सतत अपमान

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी आपल्या 'चाणक्य नीती'मध्ये जीवनातील अनेक पैलूंबद्दल मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन

प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार मुंबई :

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण