मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी सर्व एसी डबे करणार, रेल्वे प्रवास सुरक्षित आणि सुखकर होणार



मुंबई : उपनगरीय रेल्वेतून दररोज लाखो नागरिक प्रवास करतात. हा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी महाराष्ट्र शासन, रेल्वे मंत्रालय आणि केंद्र सरकार परस्पर समन्वयातून एक मोठी योजना राबवण्याचे नियोजन करत आहे. या अंतर्गत मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी सर्व एसी डबे करण्याचे नियोजन आहे. एसी डबे करण्यासाठी सर्व डब्यांना बंद होणाऱ्या स्वयंचलित दरवाजांची व्यवस्था केली जाईल. यामुळे गर्दीच्या वेळी डब्यातून पडून प्रवाशांचा अपघात होण्याचे संकट टळण्यास मदत होईल. एसी डब्यांमुळे रेल्वे प्रवास सुरक्षित आणि सुखकर होणार आहे; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देत होते. तिकिटात वाढ न करता ही सोय देण्यासाठी काय करता येईल याचाही विचार सुरू असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. रेल्वेमंत्र्यांनी या विषयात सकारात्मक निर्णय घेऊ असे सांगितल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिली.


विरार ते कुलाबा एक सेतू तयार करण्याचे काम सुरू आहे. वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतूमुळे प्रवास दहा मिनिटांत शक्य आहे. विरार अलिबाग कॉरिडॉरसाठी भूसंपादन सुरू आहे. महामुंबईत १४ मेट्रो प्रकल्पांचे काम सुरू आहे. मेट्रो, मोनो, रेल्वे, महामुंबईतील सर्व बस सेवा या सगळ्यांसाठी एकात्मिक तिकिटाच्या व्यवस्थेवर काम सुरू आहे. हे तिकीट व्हॉट्सअॅपवर मिळेल. प्रवाशांना आरामात, सुरक्षित आणि सुखकर प्रवास करता येईल. प्रवासाचा वेग वाढेल. यामुळे वेळ, इंधन आणि इंधनावरील खर्च यात बचत होईल. आधुनिक पायाभूत सुविधांमुळे नागरिकांना फायदा होणार आहे. या व्यवस्थेतूनच पुढे अर्थकारणाला चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी केला.




Comments
Add Comment

BMC Election : दोन दिवसांत सुमारे ७ हजार उमदेवारी अर्जांची विक्री, दोन उमेदवारांनी भरले अर्ज

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने बुधवारी २४ डिसेंबर २०२५

Eknath Shinde : एकनाथ शिंदे-गणेश नाईक यांच्यात मनोमिलन? - मंत्रालयात बंद दाराआड चर्चा

नवी मुंबई पालिकेसह ठाण्यातील जागावाटपाचा तीढा सुटणार मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाणे आणि नवी मुंबईतील

Chandrashekhar Bawankule : ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणूक फंडा - चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : "ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणुकीचा फंडा असून, जनतेला याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी मुंबई

Devendra Fadanvis : राज्य मंत्रिमंडळाचा मोठा धडाका! नगराध्यक्षांची ताकद वाढली; आता मिळणार थेट...वाचा सविस्तर

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या

या वर्षीचा ख्रिसमस ठरतोय खास का ? जाणून घेऊया कारण

अंकांचा अनोखा योग जुळून आला आहे .तारीख बघा २५ /१२/२५ आहे ना आश्चर्यकारक डिसेंबर महिना सुरु झाला की सर्वांना आतुरता