मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी सर्व एसी डबे करणार, रेल्वे प्रवास सुरक्षित आणि सुखकर होणार



मुंबई : उपनगरीय रेल्वेतून दररोज लाखो नागरिक प्रवास करतात. हा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी महाराष्ट्र शासन, रेल्वे मंत्रालय आणि केंद्र सरकार परस्पर समन्वयातून एक मोठी योजना राबवण्याचे नियोजन करत आहे. या अंतर्गत मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी सर्व एसी डबे करण्याचे नियोजन आहे. एसी डबे करण्यासाठी सर्व डब्यांना बंद होणाऱ्या स्वयंचलित दरवाजांची व्यवस्था केली जाईल. यामुळे गर्दीच्या वेळी डब्यातून पडून प्रवाशांचा अपघात होण्याचे संकट टळण्यास मदत होईल. एसी डब्यांमुळे रेल्वे प्रवास सुरक्षित आणि सुखकर होणार आहे; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देत होते. तिकिटात वाढ न करता ही सोय देण्यासाठी काय करता येईल याचाही विचार सुरू असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. रेल्वेमंत्र्यांनी या विषयात सकारात्मक निर्णय घेऊ असे सांगितल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिली.


विरार ते कुलाबा एक सेतू तयार करण्याचे काम सुरू आहे. वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतूमुळे प्रवास दहा मिनिटांत शक्य आहे. विरार अलिबाग कॉरिडॉरसाठी भूसंपादन सुरू आहे. महामुंबईत १४ मेट्रो प्रकल्पांचे काम सुरू आहे. मेट्रो, मोनो, रेल्वे, महामुंबईतील सर्व बस सेवा या सगळ्यांसाठी एकात्मिक तिकिटाच्या व्यवस्थेवर काम सुरू आहे. हे तिकीट व्हॉट्सअॅपवर मिळेल. प्रवाशांना आरामात, सुरक्षित आणि सुखकर प्रवास करता येईल. प्रवासाचा वेग वाढेल. यामुळे वेळ, इंधन आणि इंधनावरील खर्च यात बचत होईल. आधुनिक पायाभूत सुविधांमुळे नागरिकांना फायदा होणार आहे. या व्यवस्थेतूनच पुढे अर्थकारणाला चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी केला.




Comments
Add Comment

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत