IND vs ENG: बुमराह चौथ्या कसोटीत खेळणार की नाही? समोर आली ही अपडेट

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना २३ जुलैपासून मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात रंगत आहे. या सामन्यात स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळणार की नाही याबाबत भारतीय संघाचे सह प्रशिक्षख रयान टेन डोशेट यांनी मोठे विधान केले आहे. भारतीय संघ पाच सामन्यांच्या मालिकेत सध्या १-२ अशा पिछाडीवर आहे. अशातच टीम मॅनेजमेंटला वाटते की बुमराहने या महत्त्वाच्या सामन्यात खेळावे.


रयान टेन डोशेटने बॅकेनहम येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की जसप्रीत बुमराहबाबत आम्ही अंतिम निर्णय मँचेस्टरमध्ये घेऊ. मालिका सध्या निर्णायक वळणार आहे. यामुळे आम्ही त्याला खेळवण्याच्या विचारात आहोत. मात्र मोठे चित्र बघणेही गरजेचे आहे. मँचेस्टरमध्ये जिंकण्याची सगळ्यात मोठी शक्यता काय आहे. यानंतर ओव्हल कसोटीत आमची रणनीती काय असेल. यावर लक्ष द्यावे लागेल.


भारतीय संघाने लॉर्ड्स कसोटी सामन्यानंतर बॅकेनहेमच्या काऊंटी ग्राऊंडवर सराव सत्रात भाग घेतला. यानंतर संघ मँचेस्टरच्या दिशेने रवाना झाला. जसप्रीत बुमराहने लीड्स कसोटीत पहिल्या डावात ५ विकेट मिळवल्या होत्या. यानंतर त्याला एजबेस्टन सामन्यात आराम देण्यात आला होता. त्यानंतर तिसऱ्या कसोटीत बुमराहने पुन्हा चांगली कामगिरी केली आणि पहिल्या डावात पाच विकेट मिळवल्या. बुमराहने सध्याच्या कसोटी मालिकेत आतापर्यंत चार डावात २८.०९च्या सरासरीने १२ विकेट घेतल्या आहेत.


Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत