मच्छीमार व्यावसायिक १ ऑगस्टपासून खोल समुद्रात जाणार

ससून डॉक, करंजा, मोरा, बंदरात वाढली गर्दी


उरण (प्रतिनिधी) : मासेमारीवर बंदी असल्यामुळे मच्छीमार व्यावसायिक अडचणीत आले होते. आता मात्र लवकरच ही बंदी उठणार असल्यामुळे मच्छीमार बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. १ जूनपासूनच्या मासेमारी बंदीनंतर आता १ ऑगस्टपासून खोल समुद्रातील पावसाळी मासेमारीला सुरुवात होणार आहे. मात्र, १५ दिवसांचा कालावधी शिल्लक असतानाही मच्छीमारांच्या बोटींची दुरुस्ती व तयारीसाठी आतापासूनच लगबग सुरू झाली आहे. यामुळे करंजा, मोरा, ससून डॉक बंदरात मच्छीमारांची गर्दी दिसत आहे.


खोल समुद्रातील मासेमारीसाठी मच्छीमारांना ५० ते ७० वाव खोल समुद्रात जावे लागते. त्यासाठी एका ट्रीपसाठी १० ते १२ दिवस खर्ची घालावे लागतात. मासेमारीच्या एका ट्रीपसाठी दीड ते दोन लाखांपर्यंत खर्च मच्छीमारांना येतो. ५० वाव खोल समुद्रात मच्छीमारी केली जाते. खोल समुद्रातील (डीप फिशिंग) मासेमारीसाठी १५ दिवस आधीपासून तयारी सुरू झाली आहे. बोटींच्या डागडुजी, रंगरंगोटी, जाळींची दुरुस्ती करण्यासाठी मच्छीमारांची लगबग सुरू झाली आहे.


या पार्श्वभूमीवर डिझेलचा कोटा वेळेत मिळावा, अशी मागणी मच्छीमार बांधवांनी शासनाकडे केली आहे. पावसाळी ६१ दिवसांच्या बंदीनंतर १ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या मासेमारीसाठी मच्छीमार आसुसलेले आहेत. यासाठी मच्छीमारांना शासनाकडून मिळणारा डिझेलचा कोटा वेळेतच उपलब्ध होणे आवश्यक आहे, असे सामाजिक कार्यकर्ते सीताराम नाखवा यांनी सांगितले. आतापासूनच बैठका घेऊन निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. शासनाकडून डिझेल कोटाबाबत निर्णय होत नाही. आता वेळेत डिझेल कोटा मिळाला नाही तरी बाहेरून मिळणारे महागडे डिझेल खरेदी करून १ ऑगस्टपासून मासेमारीसाठी निघण्याची तयारीही मच्छीमारांची असल्याची माहिती करंजा मच्छीमार संस्थेचे माजी उपाध्यक्ष रमेश नाखवा यांनी दिली आहे.

Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील