नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

नाशिक : खासगी वसतिगृहात नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवार १६ जुलै २०२५ रोजी घडली. आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव ज्ञानेश्वरी संजय क्षीरसागर असे आहे. ती अहिल्यानगर जिल्ह्यातील रहिवासी होती आणि सरकारवाडा परिसरातील तिबेटियन मार्केटजवळील गौरव पार्क इमारतीत असलेल्या मुलींच्या खाजगी वसतिगृहात राहत होती.


दोन महिन्यांपूर्वी ज्ञानेश्वरी नीटच्या तयारीसाठी एका खासगी कोचिंग क्लासला उपस्थित राहण्यासाठी नाशिकला आली होती. ती ११ वीत विज्ञान विषय घेऊन शिकत होती. बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ती दुपट्टा वापरून पंख्याला लटकलेली आढळली. अन्य विद्यार्थिनींनी आणि वसतिगृह मालक यांनी तिला बेशुद्धावस्थेत जिल्हा रुग्णालयात नेले, यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून ज्ञानेश्वरीला मृत घोषित केले. तिच्या आत्महत्येमागील कारण समोर आलेले नाही. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद सरकारवाडा पोलिसांनी केली आहे. आत्महत्या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

Pune – Sugar Factories : पुणे - साखर कारखान्यांकडे ४८९८ कोटी एफआरपी थकीत

पुणे : यंदाचा २०२५ -२६ चा ऊस गाळप हंगाम आता जवळपास संपला असून मोजकेच १० ते १२ कारखाने अद्याप सुरु आहेत. तरीसुध्दा

SBL Energy Blast : कंपनीचे मालक अजूनही ‘आऊट ऑफ रिच’

महिनाभरात तब्बल २६ कामगारांचा तडफडून मृत्यू नागपूर : नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे असलेल्या एसबीएल एनर्जी

चंद्रपूर जिल्ह्यासाठी १ व ३ एप्रिल रोजी येलो तर २ एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट जारी

चंद्रपूर : नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यासाठी दिनांक १ व ३ एप्रिल

Dadar-Bhusaval Express : खान्देशी प्रवाशांसाठी आनंदवार्ता! दादर–भुसावळ एक्स्प्रेस आता कायमस्वरूपी धावणार

मुंबई : जळगावसह खान्देशातील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विशेष

महाराष्ट्र मत्स्य निर्यातीत देशात 'नंबर २'; कोकणच्या कोळंबीचा रुबाब सातासमुद्रापार!

मुंबई : भारताच्या नीलक्रांतीमध्ये महाराष्ट्राने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले असून, मत्स्य

मुंबईसह ठाणे लोकसभेची खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंवर जबाबदारी; शिवसेनेकडून राज्यातील लोकसभा मतदारसंघांच्या संपर्कप्रमुखांची घोषणा

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेने आतापासूनच कंबर कसली आहे. शिवसेना मुख्य नेते व राज्याचे