भाडे वाढवून मिळण्यासाठी उबर, ओला चालकांचा संप, प्रवाशांचे हाल

मुंबई : मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसांपासून ओला उबेर चालकांचा संप सुरू आहे. ॲप कंपन्यांकडून शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे प्रतिकिमी भाडे वाढवून मिळावे, अशी या चालकांची मागणी आहे. तसेच रिक्षा आणि टॅक्सीप्रमाणे आमचे दरही निश्चित करावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.त्यासाठी मंगळवार (दि.१५) पासून आझाद मैदानात ओला उबर टॅक्सी चालकांचे आंदोलन सुरु आहे.या संपाचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना बसत आहे.


ओला, उबर, रॅपिडोने आकारलेले मनमानी दर बंद करावेत. त्या ऐवजी सरकारी मीटर दर करावेत अशी मागणी या चालकांची आहे. शिवाय बाईक टॅक्सी कोणत्याही स्वरूपात मुंबई असू नये अशी त्यांची मागणी आहे.रिक्षा व कॅब परमिट वर मर्यादा आणली जावी. रिक्षा टॅक्सी कल्याणकारी मंडळ कार्यान्वित केले जावे. महाराष्ट्र गिग वर्कर्स ऍक्ट लागू करण्याचीही मागणी या संपाच्या माध्यमातून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आझाद मैदानात ओला, उबर आणि रॅपिडो कंपनीच्या शेकडो चालकांनी मंगळवार(दि.१५) पासून संप सुरू केला आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आंदोलक आक्रमक झाल्याचे चित्र आहे.


या आंदोलनातील एक मुख्य मुद्दा म्हणजे ओला, उबर, रॅपिडो यांसारख्या अ‍ॅप-आधारित परिवहन कंपन्यांचे नियमन करण्याची जबाबदारी सरकारने स्वीकारावी, ही मागणी आहे. परिवहन विभागाच्या अलीकडील एका पत्रानुसार, या कंपन्या निलंबनाच्या आदेशांनंतरही बेकायदेशीररीत्या दुचाकी टॅक्सी आणि बस चालवित आहेत. परिवहन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, रॅपिडोची दुचाकी टॅक्सी सेवा थांबवण्यात आली आहे, मात्र अ‍ॅपवरील हालचाली आणि स्क्रीनशॉट दर्शवतात की ही सेवा अजूनही सुरू आहे.


आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की, वारंवार नियमभंग करूनही या अ‍ॅप प्लॅटफॉर्म्सना कोणतीही शिक्षा होत नाही, मग ती सर्ज प्रायसिंग (दरवाढ), कामगारांचे शो


षण किंवा भारतीय परिवहन नियमांचे उल्लंघन असो. आंदोलनकर्त्यांनी यावेळी केंद्रीय परिवहन मंत्रालयावरही टीका केली आहे की, त्यांनी अ‍ॅप प्लॅटफॉर्मना दुहेरी भाडे आकारण्यास परवानगी दिली आहे. हे धोरण बेकायदेशीर सेवा पुरवणाऱ्यांना संरक्षण देणारे आहे आणि प्रवासी व चालक दोघांच्या हिताकडे दुर्लक्ष करणारे आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

MHADA Lottery: मुंबईसह ठाण्यात बंपर लॉटरी, पाच हजार घरांची लॉटरी कोणत्या प्राईम लोकेशनवर?

मुंबई: मुंबई-ठाणे या शहरात हक्काचे घर घेणे सामान्यांच्या आवाक्या बाहेर आहे मात्र याच शहरात तुमचं घर होणारं.

Mumbai Metro: मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट; आता मेट्रोमध्ये मोबाईल पूर्णपणे बंद राहणार

मुंबई : मेट्रोने दररोज प्रवास करणाऱ्यांसाठी एक आश्चर्यजणक बातमी समोर आलेली आहे. आता मेट्रोतून प्रवास करताना

उन्हाळी सुट्ट्यांसाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांची घोषणा

मुंबई : उन्हाळ्यातील सुट्ट्या आणि लग्नसराईमुळे वाढलेल्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने

Navi Mumbai: शिक्षिकेचं भयंकर कृत्य; दोन विद्यार्थ्यांनी संपवलं आयुष्य

नवी मुंबई: नवी मुंबईतील घणसोली परिसरात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. येथील एका नामांकित शाळेतील

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची घेतली सांत्वनपर भेट

मुंबई : उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज देवगिरी शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

माजी उपमहापौर अलका केरकर यांचे निधन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या माजी उपमहापौर आणि वॉर्ड क्रमांक ९८ च्या भाजपच्या विद्यमान नगरसेविका अलका