भाडे वाढवून मिळण्यासाठी उबर, ओला चालकांचा संप, प्रवाशांचे हाल

मुंबई : मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसांपासून ओला उबेर चालकांचा संप सुरू आहे. ॲप कंपन्यांकडून शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे प्रतिकिमी भाडे वाढवून मिळावे, अशी या चालकांची मागणी आहे. तसेच रिक्षा आणि टॅक्सीप्रमाणे आमचे दरही निश्चित करावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.त्यासाठी मंगळवार (दि.१५) पासून आझाद मैदानात ओला उबर टॅक्सी चालकांचे आंदोलन सुरु आहे.या संपाचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना बसत आहे.


ओला, उबर, रॅपिडोने आकारलेले मनमानी दर बंद करावेत. त्या ऐवजी सरकारी मीटर दर करावेत अशी मागणी या चालकांची आहे. शिवाय बाईक टॅक्सी कोणत्याही स्वरूपात मुंबई असू नये अशी त्यांची मागणी आहे.रिक्षा व कॅब परमिट वर मर्यादा आणली जावी. रिक्षा टॅक्सी कल्याणकारी मंडळ कार्यान्वित केले जावे. महाराष्ट्र गिग वर्कर्स ऍक्ट लागू करण्याचीही मागणी या संपाच्या माध्यमातून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आझाद मैदानात ओला, उबर आणि रॅपिडो कंपनीच्या शेकडो चालकांनी मंगळवार(दि.१५) पासून संप सुरू केला आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आंदोलक आक्रमक झाल्याचे चित्र आहे.


या आंदोलनातील एक मुख्य मुद्दा म्हणजे ओला, उबर, रॅपिडो यांसारख्या अ‍ॅप-आधारित परिवहन कंपन्यांचे नियमन करण्याची जबाबदारी सरकारने स्वीकारावी, ही मागणी आहे. परिवहन विभागाच्या अलीकडील एका पत्रानुसार, या कंपन्या निलंबनाच्या आदेशांनंतरही बेकायदेशीररीत्या दुचाकी टॅक्सी आणि बस चालवित आहेत. परिवहन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, रॅपिडोची दुचाकी टॅक्सी सेवा थांबवण्यात आली आहे, मात्र अ‍ॅपवरील हालचाली आणि स्क्रीनशॉट दर्शवतात की ही सेवा अजूनही सुरू आहे.


आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की, वारंवार नियमभंग करूनही या अ‍ॅप प्लॅटफॉर्म्सना कोणतीही शिक्षा होत नाही, मग ती सर्ज प्रायसिंग (दरवाढ), कामगारांचे शो


षण किंवा भारतीय परिवहन नियमांचे उल्लंघन असो. आंदोलनकर्त्यांनी यावेळी केंद्रीय परिवहन मंत्रालयावरही टीका केली आहे की, त्यांनी अ‍ॅप प्लॅटफॉर्मना दुहेरी भाडे आकारण्यास परवानगी दिली आहे. हे धोरण बेकायदेशीर सेवा पुरवणाऱ्यांना संरक्षण देणारे आहे आणि प्रवासी व चालक दोघांच्या हिताकडे दुर्लक्ष करणारे आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत