भाडे वाढवून मिळण्यासाठी उबर, ओला चालकांचा संप, प्रवाशांचे हाल

मुंबई : मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसांपासून ओला उबेर चालकांचा संप सुरू आहे. ॲप कंपन्यांकडून शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे प्रतिकिमी भाडे वाढवून मिळावे, अशी या चालकांची मागणी आहे. तसेच रिक्षा आणि टॅक्सीप्रमाणे आमचे दरही निश्चित करावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.त्यासाठी मंगळवार (दि.१५) पासून आझाद मैदानात ओला उबर टॅक्सी चालकांचे आंदोलन सुरु आहे.या संपाचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना बसत आहे.


ओला, उबर, रॅपिडोने आकारलेले मनमानी दर बंद करावेत. त्या ऐवजी सरकारी मीटर दर करावेत अशी मागणी या चालकांची आहे. शिवाय बाईक टॅक्सी कोणत्याही स्वरूपात मुंबई असू नये अशी त्यांची मागणी आहे.रिक्षा व कॅब परमिट वर मर्यादा आणली जावी. रिक्षा टॅक्सी कल्याणकारी मंडळ कार्यान्वित केले जावे. महाराष्ट्र गिग वर्कर्स ऍक्ट लागू करण्याचीही मागणी या संपाच्या माध्यमातून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आझाद मैदानात ओला, उबर आणि रॅपिडो कंपनीच्या शेकडो चालकांनी मंगळवार(दि.१५) पासून संप सुरू केला आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आंदोलक आक्रमक झाल्याचे चित्र आहे.


या आंदोलनातील एक मुख्य मुद्दा म्हणजे ओला, उबर, रॅपिडो यांसारख्या अ‍ॅप-आधारित परिवहन कंपन्यांचे नियमन करण्याची जबाबदारी सरकारने स्वीकारावी, ही मागणी आहे. परिवहन विभागाच्या अलीकडील एका पत्रानुसार, या कंपन्या निलंबनाच्या आदेशांनंतरही बेकायदेशीररीत्या दुचाकी टॅक्सी आणि बस चालवित आहेत. परिवहन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, रॅपिडोची दुचाकी टॅक्सी सेवा थांबवण्यात आली आहे, मात्र अ‍ॅपवरील हालचाली आणि स्क्रीनशॉट दर्शवतात की ही सेवा अजूनही सुरू आहे.


आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की, वारंवार नियमभंग करूनही या अ‍ॅप प्लॅटफॉर्म्सना कोणतीही शिक्षा होत नाही, मग ती सर्ज प्रायसिंग (दरवाढ), कामगारांचे शो


षण किंवा भारतीय परिवहन नियमांचे उल्लंघन असो. आंदोलनकर्त्यांनी यावेळी केंद्रीय परिवहन मंत्रालयावरही टीका केली आहे की, त्यांनी अ‍ॅप प्लॅटफॉर्मना दुहेरी भाडे आकारण्यास परवानगी दिली आहे. हे धोरण बेकायदेशीर सेवा पुरवणाऱ्यांना संरक्षण देणारे आहे आणि प्रवासी व चालक दोघांच्या हिताकडे दुर्लक्ष करणारे आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

Mumbai Fire News : जोगेश्वरीतील 'जे. एन. एस. बिझनेस सेंटर'ला भीषण आग; अग्निशमन दलाकडून 'लेव्हल-२' घोषित, पण मोठी दुर्घटना टळली

मुंबई : मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम (Jogeshwari West) परिसरात आज, गुरुवारी सकाळी 'जे. एन. एस. बिझनेस सेंटर' या उंच इमारतीला भीषण

भाऊबीज : भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचा सण

मुंबई: भाऊबीज हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्यातील प्रेम, आपुलकी आणि

मुंबई विमानतळावर कस्टम्सची मोठी कारवाई; सुमारे १९.७८ कोटींचे 'हायड्रोपोनिक वीड' जप्त, तिघांना अटक

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA), मुंबई कस्टम्स झोन-III च्या अधिकाऱ्यांनी २० आणि २१ ऑक्टोबर

कबुतरखान्याचा मुद्दा परत तापणार! जैन मुनींनी दिला उपोषणाचा इशारा, आम्ही गिरगावकर संघटनाही आक्रमक

मुंबई: दादर येथील कबुतरखान्याचा वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मागील अनेक दिवसांपासून दादर येथील कबुतरखाना

Exclusive News: मतदार यादीमुळे विरोधकांना कशा प्रकारे झाली मदत; भाजप करणार पर्दाफाश!

'दिल्ली अजून दूर, मी २०२९ पर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहणार' - देवेंद्र फडणवीस मुंबई: महाराष्ट्राचे

बाप रे ! 'लाडकी बहीण' योजनेचा १२,४३१ पुरुषांनीच घेतला गैरफायदा; सरकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश, कोट्यवधींची लूट!

मुंबई: महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावे, त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारावे आणि कुटुंबातील त्यांचा निर्णय