बेकायदेशीर बाईक टॅक्सीमार्फत अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई

मुंबई : मुंबई महानगरात ॲपच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे बाईक टॅक्सीद्वारे अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याच्या तक्रारी परिवहन विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. ही प्रवासी वाहतूक परिवहन विभागाची कुठलीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे करून शासनाची व प्रवाशांची फसवणूक करण्यात येत आहे.


मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम ९३ मधील तरतुदीप्रमाणे समुच्चयांनी मोटार वाहन धोरणानुसार ॲप आधारित प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी घेणे बंधनकारक आहे. सध्या अशा कंपन्यांकडून कुठल्याही ‍नियमांचे पालन न करता विना परवानगी प्रवासी वाहतूक सुरू होती.


अशा बेकायदेशीरपणे चालविण्यात येणाऱ्या बाईक टॅक्सी विरोधात मुंबई महानगर प्रदेशातील परिवहन कार्यालय अंतर्गत २० वायुवेग पथकांमार्फत एकाच वेळी मुंबई, ठाणे, वसई, वाशी, पनवेल येथे संयुक्त कारवाई मोहीम राबवली. या मोहिमेमध्ये अवैधरीच्या चालणाऱ्या ९३ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून ८५ वाहने (बाईक टॅक्सी) अटकावून ठेवण्यात आली आहेत. तसेच अवैध ॲग्रीकेटर विरुद्ध फौजदारी गुन्हे नोंदविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे, असे अप्पर परिवहन आयुक्त यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Comments
Add Comment

मागील दोन वर्षापेक्षा धरण क्षेत्रात कमी साठा, पण वर्षभराची तहान भागणार....

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी जो पाणीसाठा आवश्यक असतो, तो साठा १ऑक्टोबर रोजी

कांदिवली आगीत सहा महिलांचा मृत्यू

मुंबई (प्रतिनिधी): कांदिवली येथील केटरिंग किचनला लागलेल्या आगीत गंभीर जखमी झालेल्या सर्व सहा महिलांचा मृत्यू

ओला, उबर चालकांचे आझाद मैदानात आंदोलन

मुंबई : ओला, उबर, रॅपिडो या ॲपआधारित कॅब अथवा बाईक सेवा देणाऱ्या चालकांना योग्य दर मिळावेत यासाठी मागील काही

Mumbai Local Automatic Door video : नव्या लोकलचा मेकओव्हर! लोकलचा पहिला VIDEO व्हायरल, आता स्टेशन येताच आपोआप.... नवी लोकल पाहून व्हाल थक्क

मुंबई : मुंबईकरांची 'लाइफलाइन' म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन कायमच भरलेली असते. मुंबईच्या उपनगरांमध्ये

पुढील तीन ते चार दिवसांत नुकसानग्रस्तांच्या खात्यावर भरपाई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात ६० लाख हेक्टरचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ऑगस्टपर्यंत ने

महापालिका आरोग्य विभागाला माणसांपेक्षा श्वानांची चिंता!

रेबीज नियंत्रणासाठी श्वानांचे लसीकरण, पण चावा घेतलेल्यांना मिळत नाही लस मुंबई ( खास प्रतिनिधी) : मुंबईला सन वर्ष