सोन्याच्या तस्करीप्रकरणी अभिनेत्रीला एक वर्षाची शिक्षा


बंगळुरू : सोन्याच्या तस्करीत थेट सहभागी असल्याप्रकरणी कानडी अभिनेत्री रान्या रावला दोषी ठरवण्यात आले आहे. रान्याला एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली आहे. हा आदेश परकीय चलन संवर्धन आणि तस्करी प्रतिबंधक कायदा (COFEPOSA) सल्लागार मंडळाने दिला आहे. रान्या रावसह इतर दोन आरोपींनाही एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली आहे. शिक्षा भोगत असतानाच्या काळात तिन्ही आरोपींना जामिनासाठी अर्ज करता येणार नाही, असेही निकालात नमूद आहे. यामुळे तिन्ही आरोपींना एक वर्ष तुरुंगवास भोगावा लागणार आहे.


रान्याने माणिक्य या चित्रपटात सुदीपसोबत साकारलेली भूमिका गाजली होती. अनेक दाक्षिणात्य चित्रपटांतून रान्याने काम केले होते. पण सोन्याच्या तस्करीत पकडली गेल्यामुळे रान्याचे करिअर संकटात सापडले आहे. रान्या रावला याच वर्षी ३ मार्च रोजी बंगळुरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर १४.८ किलो सोन्यासह महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) अटक केली होती. रान्या वारंवार परदेशी जात येत होती. यामुळे तिच्या परदेश दौऱ्यांवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. अखेर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) सापळा रचून रान्याला अटक केली. रान्याला जेव्हा अटक झाली तेव्हा ती दुबईहून एमिरेट्सच्या विमानाने बंगळुरूला आली होती.


रान्याने कपड्यांमधून सोनं लपवलं होतं. पण तपासणीत रान्याकडे असलेलं तस्करीचं सोनं पकडलं गेलं. रान्याचे वडील रामचंद्र राव हे एक वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. यामुळे रान्या प्रत्येकवेळी परदेशातून आल्यावर वडिलांचे नाव सांगून तपासणी हुशारीने टाळत होती. पण महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) केलेल्या कारवाईमुळे रान्याचे बिंग फुटले. ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) रान्या रावविरुद्ध ईसीआयआर दाखल केला होता. रान्या विरोधात ईडीने ४ जुलै २०२५ रोजी कारवाई केली होती. बंगळुरूतील व्हिक्टोरिया लेआउटमधील एक घर, अर्कावती लेआउटमधील एक भूखंड, तुमकुरमधील एक औद्योगिक जमीन आणि अनेकल तालुक्यातील शेती जमीन जप्त करुन ईडीने कारवाई केली. जप्त केलेल्या मालमत्तेची एकूण किंमत ३४.१२ कोटी रुपये आहे.



Comments
Add Comment

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या गड किल्ल्यांवर जाण्यास बंदी; वन विभागाचा आदेश जारी

पुणे : अनेकजण नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री गडकिल्ल्यावर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर

मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून सरकारचे खास पाऊल

मुंबई: आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक

एसटी बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम — प्रवाशांच्या सुरक्षित, आरोग्यदायी प्रवासासाठी एसटी महामंडळाचा पुढाकार

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर, बसस्थानक परिसरात तसेच प्रशासकीय

आगामी अर्थसंकल्पापूर्वी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली 'विकसित भारत २०४७' बैठक संपन्न

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्थतज्ज्ञ व रणनीतीकार, निती आयोगाचे सदस्य,

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच