सोन्याच्या तस्करीप्रकरणी अभिनेत्रीला एक वर्षाची शिक्षा


बंगळुरू : सोन्याच्या तस्करीत थेट सहभागी असल्याप्रकरणी कानडी अभिनेत्री रान्या रावला दोषी ठरवण्यात आले आहे. रान्याला एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली आहे. हा आदेश परकीय चलन संवर्धन आणि तस्करी प्रतिबंधक कायदा (COFEPOSA) सल्लागार मंडळाने दिला आहे. रान्या रावसह इतर दोन आरोपींनाही एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली आहे. शिक्षा भोगत असतानाच्या काळात तिन्ही आरोपींना जामिनासाठी अर्ज करता येणार नाही, असेही निकालात नमूद आहे. यामुळे तिन्ही आरोपींना एक वर्ष तुरुंगवास भोगावा लागणार आहे.


रान्याने माणिक्य या चित्रपटात सुदीपसोबत साकारलेली भूमिका गाजली होती. अनेक दाक्षिणात्य चित्रपटांतून रान्याने काम केले होते. पण सोन्याच्या तस्करीत पकडली गेल्यामुळे रान्याचे करिअर संकटात सापडले आहे. रान्या रावला याच वर्षी ३ मार्च रोजी बंगळुरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर १४.८ किलो सोन्यासह महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) अटक केली होती. रान्या वारंवार परदेशी जात येत होती. यामुळे तिच्या परदेश दौऱ्यांवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. अखेर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) सापळा रचून रान्याला अटक केली. रान्याला जेव्हा अटक झाली तेव्हा ती दुबईहून एमिरेट्सच्या विमानाने बंगळुरूला आली होती.


रान्याने कपड्यांमधून सोनं लपवलं होतं. पण तपासणीत रान्याकडे असलेलं तस्करीचं सोनं पकडलं गेलं. रान्याचे वडील रामचंद्र राव हे एक वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. यामुळे रान्या प्रत्येकवेळी परदेशातून आल्यावर वडिलांचे नाव सांगून तपासणी हुशारीने टाळत होती. पण महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) केलेल्या कारवाईमुळे रान्याचे बिंग फुटले. ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) रान्या रावविरुद्ध ईसीआयआर दाखल केला होता. रान्या विरोधात ईडीने ४ जुलै २०२५ रोजी कारवाई केली होती. बंगळुरूतील व्हिक्टोरिया लेआउटमधील एक घर, अर्कावती लेआउटमधील एक भूखंड, तुमकुरमधील एक औद्योगिक जमीन आणि अनेकल तालुक्यातील शेती जमीन जप्त करुन ईडीने कारवाई केली. जप्त केलेल्या मालमत्तेची एकूण किंमत ३४.१२ कोटी रुपये आहे.



Comments
Add Comment

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय