मुंबईहून ४ तासांत मालवण, ३ तासांत रत्नागिरी

मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने चाकरमान्यांचा होणार सुखद जल प्रवास


मुंबई (प्रतिनिधी) : यंदा २७ ऑगस्ट २०२५ रोजी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार कोकणवासीयांना मोठी भेट देणार असल्याची घोषणा भाजप नेते आणि मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना केली. मंत्री राणे माध्यमांशी बोलताना म्हणाले, 'गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना लवकर सागरी प्रवासाचा पर्याय खुला होणार आहे. मुंबई ते रत्नागिरी तसेच मुंबई ते सिंधुदुर्ग एम टू एम फेरी लवकरच सुरू होणार आहे. यामध्ये एकावेळी ५०० प्रवाशांसह १५० गाड्या वाहून नेण्याची क्षमता असणार आहे. तसेच मुंबई ते विजयदुर्ग प्रवास अवघ्या ४.५ तासांत तर मुंबई ते रत्नागिरी अवघ्या तीन तासांत करता येणार असल्याचेही ते म्हणाले.


गणेशोत्सवासाठी गणपतीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास आणखी सुकर होणार आहे. चाकरमान्यांना कमी वेळेत आपल्या गावी पोहोचवण्यासाठी राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेत गणेशोत्सवात समुद्र मार्गे प्रवास उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता मुंबईतून साडेचार तासांत मालवण, विजयदुर्ग तर अवघ्या तीन तार्सात रत्नागिरी गाठता येणार आहे.


मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी तसेच महामार्गाची अर्धवट कामे याचा विचार करता जलमागनि गणपतीला गावी जाणे सोयीस्कर ठरणार आहे. हायटेक यंत्रणा असलेल्या एम टू एम या बोटीमार्फत आता कोकणात प्रवास करता येणार आहे. मुंबईतील माझगावपासून मालवण, विजयदुर्ग, रत्नागिरीपर्यंत जलवाहतूक सेवा सुरू करण्यात येणार आहे. लवकरच चाकरमान्यांना परवडतील असे दर यासाठी निश्चित केले जाणार आहे.


गेली अनेक वर्षे मुंबई-गोवा महामार्गावरील रखडलेली कामे, खड्ढे आणि गणेशोत्सवातील प्रचंड वाहतूक कोंडी यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गैरसोय होत होती. या पार्श्वभूमीवर, रो-रो सेवेमुळे कोकण प्रवास आता अधिक आरामदायी, वेगवान आणि सोयीचा होणार आहे. रस्ते मार्गावरील वाहतूक कोंडी आणि वेळखाऊ प्रवास टाळून अवघ्या काही तासांत कोकण गाठणे शक्य होणार आहे. मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला असून परवडणाऱ्या दरात हा नवा जलवाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून दिला जात आहे. आता अनेक वर्षांनंतर ही सेवा पुन्हा सुरू होत असल्याने कोकणातील पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.

Comments
Add Comment

छट पूजेसाठी मुंबई महापालिका यंत्रणा सज्ज; मंत्री लोढा यांच्यासह भाजप नेते घेणार तयारीचा आढावा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगर परिसरात मोठ्या संख्येने उत्तर भारतीय लोक राहतात. त्यामुळे येत्या २७ आणि २८ ऑक्टोबरला

वरळी कोळीवाड्याची किनारपट्टी होणार चकाचक, दिवसाला किती खर्च होतो माहीत आहे का?

मुंबई (खास प्रतिनिधी) : वरळी कोळीवाडा समुद्र किनाऱ्याची स्वच्छता राखण्याकरता यापूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या

अक्सा बीचवर १३ वर्षांचा मुलगा बुडाला

मुंबई: दिवाळीच्या दिवशीच मुंबईतील मालाड येथील अक्सा बीचवर एक हृदयद्रावक घटना घडली. मयंक ढोलिया (१३) नावाचा मुलगा

रस्त्यांवर खोदलेले चर बुजवण्यासाठी नव्याने सात कंपन्यांची निवड, दोन वर्षांसाठी तब्बल २५७कोटी रुपये करणार खर्च!

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईतील रस्त्यांखालून तसेच पदपथांखालून विविध सेवा सुविधांचे जाळे पसरले गेलेले असून अनेकदा

महापालिकेच्या केईएम,शीव, नायर रुग्णालयांची भिस्त खासगी सुरक्षेवर, महिन्याला एवढा होतो खर्च...

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिका सुरक्षा रक्षक खात्यातील रिक्तपदे वाढतच चाललेली असून आजही महापालिकेच्या

जोगेश्वरी येथील व्यावसायिक इमारतीला भीषण आग: २७ जणांची सुटका, ९ जण रुग्णालयात दाखल; जखमींची नावे जाहीर

मुंबई: जोगेश्वरी पश्चिम भागातील गांधी शाळेजवळ असलेल्या जेएमएस बिझनेस सेंटर या इमारतीला आज, गुरुवार, २३ ऑक्टोबर