Maharashtra Assembly Monsoon Session 2025 : आव्हाड-पडळकर कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच बाचाबाची, शेवटी घमासान हाणामारी!

  85

मुंबई : विधिमंडळाच्या सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान एक धक्कादायक घटना घडली. विधानभवनाच्या पायऱ्यांजवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, आता विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी या घटनेबाबत सविस्तर अहवाल मागवला आहे.



नेमकं प्रकरण काय घडलं?


विधानभवनाच्या पायऱ्यांवर दोन्ही नेत्यांचे समर्थक आपापल्या मागण्यांसाठी घोषणाबाजी करत होते. यावेळी आव्हाड आणि पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आणि पाहता पाहता त्याचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांना हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली. या घटनेनंतर सभागृहातही पडसाद उमटले. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत, विधानसभा अध्यक्षांनी तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या अहवालानंतर संबंधित कार्यकर्त्यांवर आणि दोषींवर काय कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी विधान भवनाच्या परिसरात गोपिचंद पडळकर यांना मंगळसूत्र चोर म्हणून डिवचल्यानंतर या वादाला सुरुवात झाली होती. त्यानंतर काल गोपिचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड आमने-सामने आले असता दोन्हीकडून एकमेकांना शिविगाळ करून धमकावण्यात आले होते. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याला जिवे मारण्याची धमकी आल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते विधान भवनाच्या आवारातच एकमेकांना भिडल्याने या वादाने गंभीर वळण घेतलं आहे.

Comments
Add Comment

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्टच्या बस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टळणार मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साकारलेले देखावे

विवाह नोंदणीसाठी आता रविवारीही महापालिकेची सेवा

जोडप्यांना सुट्टीच्या दिवशीही करता येणार नोंदणी विवाह मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत दरवर्षी