उदयनराजे भोसले यांच्या नावाने आमिर खानची फसवणूक

मुंबई: आतापर्यंत मोठमोठ्या सेलिब्रेटींची विविध पद्धतीने फसवणूक झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यातच आता बॉलिवूडचा खान आमिर खानचीही फसवणूक केली जात असल्याची घटना समोर आली आहे.


खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नावाने आमिर खानची फसवणूक केली जात होती. या प्रकरणी अली अमानत शेर या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


या आरोपीने आमिर खानला मी, सातारा येथून उदयनराजे भोसले बोलत आहे. माझे काही लोक तुम्हाला भेटायला येतील. त्यांची मदत करा. असे सांगितले. गेल्या अनेक महिन्यांपासून त्याचे हे प्रकार सुरू होते. जानेवारीपासून तो अशा युक्त्या करून लोकांची फसवणूक करत होता.


दरम्यान, वेळीच सावध झालेल्या आमिर खानने उदयनराजे यांचे निकटवर्तीय पंकज चव्हाण यांच्यांशी संपर्क केला. त्यानंतर हा फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला. फसवणुकीची ही घटना समोर आल्यानंतर आमिरने तातडीने पोलिसांची मदत घेतली.

Comments
Add Comment

Municipal Corporation : पीओपींच्या गणेश मूर्तींबाबत महापालिकेने भूमिका स्प्ष्ट करावी2

स्थायी समितीत सदस्यांनी मागणी विसर्जित गणेश मूर्तींवर प्रक्रिया करण्याच्या प्रकल्प खर्चाला मान्यता मुंबई : 

Ritu Tawade : प्रत्येक मुंबईकरांने एक झाड लावावे

मुंबईच्या महापौरांनी केले आवाहन मुंबई : मुंबई हिरवीगार करण्यासाठी मुंबई महापालिकेने जोरदार मोहीम हाती घेतली

MLA Amit Satam: हत्तीच्या पिंजऱ्याच्या जागेवर बिबट्या, रेड पांडा, हुलॉक गिबन आणि बिंटुरोंग

आमदार अमीत साटम यांचे महापौर रितू तावडे, महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, यांना पत्र* मुंबई : मुंबई भाजप अध्यक्ष

Police Character certificate : फेरीवाल्यांना क्यु आर कोड देताना पोलिस चारित्र्य प्रमाणपत्र तपासा

भाजपचे तिवाना यांची स्थायी समितीच्या बैठकीत हरकतीच्या मुद्दयादवारे मागणी मुंबई : मुंबई महानगरपालिकेमार्फत

ChandraShekar Bawankule : शासकीय जमीन हस्तांतरण, पुनर्विकासाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय Mumbai : शासकीय जमिनींची विक्री, हस्तांतर

Investment of Maharshtra : इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात ४ हजार कोटींची गुंतवणूक

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार; ४ हजार ७५० रोजगार निर्माण होणार मुंबई : भारतीय अर्थव्यवस्थेचे