अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीत २ लाख ५१ हजार ८०४ विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

मुंबई: अकरावी प्रवेशाची प्रक्रिया अद्याप सुरूच आहे. अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीची निवड यादी जाहीर करण्यात आलीये. यात राज्यातील २ लाख ५१ हजार ८०४ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. हे विद्यार्थी १८ ते २१ जुलै या कालावधीत महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेऊ शकतील.


राज्यात ९ हजार ४८३ कनिष्ठ महाविद्यालयांतील २१ लाख ३२ हजार ९६० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. पहिल्या फेरीत ६ लाख ३२ हजार १९४ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला होता.


यातील ४ लाख ५७ हजार ८४१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले होते. त्यापैकी ४ लाख ३२ हजार २८७ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केला होता. त्यानंतर आता दुसऱ्या फेरीत २ लाख ५१ हजार ८०४ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला आहे. त्यात विज्ञान शाखेसाठी १ लाख २९ हजार ३५, वाणिज्य शाखेसाठी ६९ हजार ४४२, कला शाखेसाठी ५३ हजार ३२७ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध झाली आहे.

Comments
Add Comment

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी