अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीत २ लाख ५१ हजार ८०४ विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

मुंबई: अकरावी प्रवेशाची प्रक्रिया अद्याप सुरूच आहे. अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीची निवड यादी जाहीर करण्यात आलीये. यात राज्यातील २ लाख ५१ हजार ८०४ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. हे विद्यार्थी १८ ते २१ जुलै या कालावधीत महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेऊ शकतील.


राज्यात ९ हजार ४८३ कनिष्ठ महाविद्यालयांतील २१ लाख ३२ हजार ९६० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. पहिल्या फेरीत ६ लाख ३२ हजार १९४ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला होता.


यातील ४ लाख ५७ हजार ८४१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले होते. त्यापैकी ४ लाख ३२ हजार २८७ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केला होता. त्यानंतर आता दुसऱ्या फेरीत २ लाख ५१ हजार ८०४ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला आहे. त्यात विज्ञान शाखेसाठी १ लाख २९ हजार ३५, वाणिज्य शाखेसाठी ६९ हजार ४४२, कला शाखेसाठी ५३ हजार ३२७ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध झाली आहे.

Comments
Add Comment

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे

माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन; पाच ते १०० कोटींपर्यंत खर्चास मान्यता

मुंबई : राज्यातील माहिती तंत्रज्ञानविषयक धोरण व प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा