अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीत २ लाख ५१ हजार ८०४ विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

मुंबई: अकरावी प्रवेशाची प्रक्रिया अद्याप सुरूच आहे. अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीची निवड यादी जाहीर करण्यात आलीये. यात राज्यातील २ लाख ५१ हजार ८०४ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. हे विद्यार्थी १८ ते २१ जुलै या कालावधीत महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेऊ शकतील.


राज्यात ९ हजार ४८३ कनिष्ठ महाविद्यालयांतील २१ लाख ३२ हजार ९६० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. पहिल्या फेरीत ६ लाख ३२ हजार १९४ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला होता.


यातील ४ लाख ५७ हजार ८४१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले होते. त्यापैकी ४ लाख ३२ हजार २८७ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केला होता. त्यानंतर आता दुसऱ्या फेरीत २ लाख ५१ हजार ८०४ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला आहे. त्यात विज्ञान शाखेसाठी १ लाख २९ हजार ३५, वाणिज्य शाखेसाठी ६९ हजार ४४२, कला शाखेसाठी ५३ हजार ३२७ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध झाली आहे.

Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या