श्रावणात दाढी आणि केस का कापू नयेत?

मुंबई : श्रावण महिना आला की धार्मिक वातावरण निर्माण होतं. अनेकजण या काळात उपवास, व्रत आणि संयमाचं पालन करतात. याच दरम्यान एक परंपरा सातत्याने पाहायला मिळते ती म्हणजे या महिन्यात दाढी करणं आणि केस कापणं टाळणं. धार्मिक दृष्टिकोनातून ही गोष्ट समजण्यासारखी आहेच, मात्र त्यामागे काही वैज्ञानिक कारणंही दडलेली आहेत.

पावसाळ्याच्या या काळात हवामानात आर्द्रता अधिक असते. त्यामुळे हवेत बॅक्टेरिया, विषाणू, आणि फंगल स्पोअर्स मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. अशा परिस्थितीत दाढी करताना किंवा केस कापताना त्वचेला सूक्ष्म जखमा होतात, ज्या सामान्यतः दिसत नाहीत. मात्र या जखमांमधून संसर्ग होण्याची शक्यता वाढते. त्वचेवर फोड, पुरळ, किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचा धोका या काळात अधिक असतो. याशिवाय, पावसाळ्याच्या बदलत्या हवामानाचा परिणाम आपल्या त्वचेवर आणि केसांवरही होतो. दमट हवेमुळे त्वचा अधिक संवेदनशील होते. अशा संवेदनशील काळात केस कापणं किंवा दाढी करणं ही त्वचेसाठी अधिक त्रासदायक ठरू शकतं. त्यातून इम्युन सिस्टीम कमकुवत असताना संसर्गाची शक्यता अधिक वाढते.

एक अजून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, केस आणि दाढी हे नैसर्गिक रक्षण करणारे घटक आहेत. ते थेट वातावरणाचा परिणाम त्वचेवर होऊ देत नाहीत. दाढी असणं हे ओल्या हवामानात चेहऱ्याला थोडं उबदार ठेवण्यास मदत करतं. त्याचप्रमाणे, केस देखील डोक्याला थेट थंडीचा किंवा दमटपणाचा परिणाम होऊ देत नाहीत. म्हणूनच श्रावण महिन्यात दाढी किंवा केस न कापण्याची जुनी परंपरा ही केवळ धार्मिक श्रद्धेपुरती मर्यादित नसून, ती आरोग्यदृष्ट्याही उपयुक्त आहे .
Comments
Add Comment

Holi Safety Tips And Tricks: होळीला बाजारात खरा रंग कसा ओळखायचा?

मुंबई: केमिकल रंगांचा वाढता धोका सगळीकडेच आहे. होळीचा सण म्हणजे आनंदाची उधळण. मात्र बाजारपेठेत सध्या रासायनिक

Valentine's Day Wishes : व्हॅलेंटाइन डे २०२६ निमित्त पाठवा खास मराठी शुभेच्छा संदेश

Happy Valentine's Day 2026 Wishes In Marathi । मुंबई : व्हॅलेंटाइन डे म्हणजे मनातल्या भावना मनमोकळेपणाने व्यक्त करण्याचा दिवस. या दिवशी

यंदाच्या व्हॅलेंटाईन डेला केसांना ब्राऊन रंग देण्यामागील खास कारण जाणून घ्या

यंदाच्या प्रेम व्यक्त करण्याच्या मोसमात सर्वांच्या हृदयाचे ठोके पुन्हा वाढलेले दिसतील. प्रेमाच्या ऋतुमानात

सावधान! व्हॅलेंटाईन डे दिवशी अशाप्रकारे होऊ शकते फसवणूक; सुरक्षित कसे राहायचे?, जाणून घ्या...

मुंबई: व्हॅलेंटाईन डे आता फार दूर नाही. या दिवशी लोक त्यांचे प्रेम व्यक्त करतात आणि त्यांच्या प्रियकरांना

Cancer Fighting Food In Ayurveda: आयुर्वेदातील कोणते पदार्थ कर्करोगावर नियंत्रण ठेवू शकतात, जाणून घ्या

मुंबई: आयुर्वेदानुसार, वात-पित्त-कफ दोषांचे संतुलन राखून कर्करोगासारख्या आजारावर लक्षणीय नियंत्रण मिळवता येते.

तुम्हाला माहित आहे का डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे ?

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चॉकलेट खायला आवडतं. सध्या बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट