श्रावणात दाढी आणि केस का कापू नयेत?

मुंबई : श्रावण महिना आला की धार्मिक वातावरण निर्माण होतं. अनेकजण या काळात उपवास, व्रत आणि संयमाचं पालन करतात. याच दरम्यान एक परंपरा सातत्याने पाहायला मिळते ती म्हणजे या महिन्यात दाढी करणं आणि केस कापणं टाळणं. धार्मिक दृष्टिकोनातून ही गोष्ट समजण्यासारखी आहेच, मात्र त्यामागे काही वैज्ञानिक कारणंही दडलेली आहेत.

पावसाळ्याच्या या काळात हवामानात आर्द्रता अधिक असते. त्यामुळे हवेत बॅक्टेरिया, विषाणू, आणि फंगल स्पोअर्स मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. अशा परिस्थितीत दाढी करताना किंवा केस कापताना त्वचेला सूक्ष्म जखमा होतात, ज्या सामान्यतः दिसत नाहीत. मात्र या जखमांमधून संसर्ग होण्याची शक्यता वाढते. त्वचेवर फोड, पुरळ, किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचा धोका या काळात अधिक असतो. याशिवाय, पावसाळ्याच्या बदलत्या हवामानाचा परिणाम आपल्या त्वचेवर आणि केसांवरही होतो. दमट हवेमुळे त्वचा अधिक संवेदनशील होते. अशा संवेदनशील काळात केस कापणं किंवा दाढी करणं ही त्वचेसाठी अधिक त्रासदायक ठरू शकतं. त्यातून इम्युन सिस्टीम कमकुवत असताना संसर्गाची शक्यता अधिक वाढते.

एक अजून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, केस आणि दाढी हे नैसर्गिक रक्षण करणारे घटक आहेत. ते थेट वातावरणाचा परिणाम त्वचेवर होऊ देत नाहीत. दाढी असणं हे ओल्या हवामानात चेहऱ्याला थोडं उबदार ठेवण्यास मदत करतं. त्याचप्रमाणे, केस देखील डोक्याला थेट थंडीचा किंवा दमटपणाचा परिणाम होऊ देत नाहीत. म्हणूनच श्रावण महिन्यात दाढी किंवा केस न कापण्याची जुनी परंपरा ही केवळ धार्मिक श्रद्धेपुरती मर्यादित नसून, ती आरोग्यदृष्ट्याही उपयुक्त आहे .
Comments
Add Comment

काळी अंडी की सफेद अंडी... शरीरासाठी जास्त फायदेशीर कोणतं अंड ? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : आजकाल लोक आपल्या प्रकृतीबद्दल जास्त सर्तक झालेत. सोप्या शब्दात सांगायच झाल्यास कधी काय खायचं व खायचं

Prada : बाप रे! ५ रुपयाची सेफ्टी पिन तब्बल 'इतक्या' हजारांची, प्राडाच्या या 'लक्झरी' आयटमने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ; नेमकी काय आहे चर्चा?

आपल्या दैनंदिन जीवनात अनेक लहान-मोठ्या वस्तूंचे अतुलनीय महत्त्व असते. स्वयंपाकघरातील भांड्यांपासून ते अगदी

ऐन थंडीत फटाफट पैसे कमावण्याची सुवर्णसंधी! हमखास चालतील असे बिझनेस 

राज्यात सर्वत्र गुलाबी थंडीचे चाहूल लागली आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्येही थंडीच्या दिवसात लागणारे स्वेटर,

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

चेहऱ्याची त्वचा नितळ ठेवण्यासाठी फॉलो करा या टिप्स!

आपल्या शरीरात जेव्हा एखादा बदल होतो, तेव्हा त्याचा परिणाम लगेच आपल्या चेहऱ्यावर दिसतो. जसे की, आपण अतिउष्ण

The Ganeshutsav Podcast : 'The Ganeshutsav Podcast' (TGP) चा डंका! चिराग चंद्रकांत खिलारे यांनी जगातील पहिले 'हिंदू उत्सव' पॉडकास्ट सुरू करून मूर्तिकारांना दिले व्यासपीठ

मुंबई : भारतातील समृद्ध उत्सव संस्कृतीला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी १७ जुलै २०२४ रोजी 'TGP (The Ganeshutsav Podcast)' या विशेष