NCPचे नेते जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात जोरदार शा‍ब्दिक चकमक

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप कत आहेत. मात्र आता ही शा‍ब्दिक चकमक शिवीगाळपर्यंत पोहोचली आहे. विधानभवनाच्या बाहेर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील शिवीगाळचा व्हिडिओ समोर आला आहे.


गेल्या काही दिवसांपासून दोन्ही नेत्यांदरम्यान वातावरण गरम झाले होते. काही दिवसांआधी विधान भवन परिरात जाताना जितेंद्र आव्हाडांनी नाव न घेता गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी सोशल मीडयावर एकमेकांविरोधात मोर्चा खोलला होता.



गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात वाद


मात्र आता हे प्रकरण सोशल मीडियावरून आता समोरासमोर वाद सुरू झाले आहेत. विधान भवनाच्या बाहेर गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात जोरदार वाद रंगला. ही घटना त्या वेळेस रंगली जेव्हा गोपीचंद पडळकर कारमधून उतरले आणि गाडीचा दरवाजा जोराने बंद केले. यावर जितेंद्र आव्हाड यांनी आरोप लावला की दरवाजा मुद्दामहून जोराने बंद केला. यामुळे त्यांना दुखापत झाली असती. यावर दोन्ही नेत्यांमध्ये शिवीगाळ आणि शा‍ब्दिक चकमक सुरू झाली.

Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण