NCPचे नेते जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात जोरदार शा‍ब्दिक चकमक

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप कत आहेत. मात्र आता ही शा‍ब्दिक चकमक शिवीगाळपर्यंत पोहोचली आहे. विधानभवनाच्या बाहेर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील शिवीगाळचा व्हिडिओ समोर आला आहे.


गेल्या काही दिवसांपासून दोन्ही नेत्यांदरम्यान वातावरण गरम झाले होते. काही दिवसांआधी विधान भवन परिरात जाताना जितेंद्र आव्हाडांनी नाव न घेता गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी सोशल मीडयावर एकमेकांविरोधात मोर्चा खोलला होता.



गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात वाद


मात्र आता हे प्रकरण सोशल मीडियावरून आता समोरासमोर वाद सुरू झाले आहेत. विधान भवनाच्या बाहेर गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात जोरदार वाद रंगला. ही घटना त्या वेळेस रंगली जेव्हा गोपीचंद पडळकर कारमधून उतरले आणि गाडीचा दरवाजा जोराने बंद केले. यावर जितेंद्र आव्हाड यांनी आरोप लावला की दरवाजा मुद्दामहून जोराने बंद केला. यामुळे त्यांना दुखापत झाली असती. यावर दोन्ही नेत्यांमध्ये शिवीगाळ आणि शा‍ब्दिक चकमक सुरू झाली.

Comments
Add Comment

IMD: महाराष्ट्रासाठी 'चक्रीवादळ शक्ती'चा इशारा; ४ ते ७ ऑक्टोबर दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता

पुणे/मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) अरबी समुद्रात विकसित होत असलेल्या 'चक्रीवादळ शक्ती' च्या पार्श्वभूमीवर

दिवाळीसाठी गावाला जाताय, रेल्वे सोडतेय ३० विशेष गाड्या

दिवाळीनिमित्त अतिरिक्त विशेष गाड्या धावणार मुंबई (प्रतिनिधी) : येत्या दिवाळी उत्सवानिमित्त प्रवाशांच्या

अशोक हांडे यांनी महापालिका शाळेतील ती व्यक्त केली खंत...म्हणाले ,तर मोठा कलाकार झालो असतो!

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या संगीत व कला अकादमीचे शिक्षक हे खूप प्रतिभावान आहेत. शैक्षणिक

गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता प्रकल्प: दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानचे काम प्रगतीपथावर

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्‍प (GMLR) अंतर्गत दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा, कोहली-रोहितचे पुनरागमन निश्चित!

मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर्स रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहेत. रोहित

शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?

मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची