नद्या-खाडीत कचरा-मलबा टाकाल तर कठोर कारवाई होणार

  49

मुंबई : माहीमची खाडी, मिठी नदी आणि दहिसरच्या गणपत पाटीलनगर परिसरात कचरा आणि बांधकामाचा मलबा टाकण्याच्या समस्येनं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. विधान परिषदेत यावर गंभीर चर्चा झाली.


मुंबईतील मिठी नदी आणि दहिसरमधील गणपत पाटीलनगर परिसरात बांधकामाचा मलबा आणि कचरा टाकण्याच्या घटना गेल्या काही काळापासून वाढत आहेत. त्यामुळे खारफुटीचं नुकसान होतंय. पर्यावरण आणि स्थानिकांना त्रास होतोय. इतकंच नव्हे तर रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झालाय. या गंभीर समस्येकडे भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आणि शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेत लक्ष वेधलं.


खाड्यांलगतच्या वस्त्यांचा विस्तार आणि मलबा टाकण्याच्या घटनांवर त्यांनी बोट ठेवलं. त्यावर खाड्यांलगतच्या सर्व भागांची पाहणी सुरू असल्याचं उत्तर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय.



मलबा आणि कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात येणार आहे. यात २०११ पर्यंतच्या आणि पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बांधलेल्या घरांना हात लावला जाणार नाही, मात्र बाकी सर्व बांधकामं हटवली जातील, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय. यापूर्वी महसूल आणि पोलीस स्वतंत्रपणे कारवाई करत होते, मात्र आता हे दोन्ही विभाग एकत्रितपणे कडक कारवाई करतील. इतकंच नव्हे तर दंडही आकारला जाईल आणि गुन्हा दाखल करण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.


उल्हास आणि वालधुनी नद्यांमध्येही बेकायदा मलबा टाकण्याच्या घटना समोर आल्यात. तर कचरा टाकण्याऱ्यांवर १० कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. मिठी नदी आणि गणपत पाटील नगरातील प्रश्न सोडवण्यासाठी नवीन धोरण आखण्यात आलंय. पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आलाय.


मुंबईच्या या पर्यावरणीय समस्येवर वेळीच उपाय शोधणं गरजेचं आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आणि कडक कारवाईच्या इशाऱ्यामुळे खारफुटी आणि नद्यांचे संरक्षण होईल, अशी आशा आहे.

Comments
Add Comment

उबाठाचे १० ते १५ माजी नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, महिन्याभरात होणार प्रवेश

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उबाठा सेनेला आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. येत्या

बेस्ट तोट्यात जाण्यास तत्कालीन सत्ताधारी उबाठा शिवसेनाच जबाबदार, काँग्रेसचा घरचा आहेर!

काँग्रेसचे माजी आमदार मधु चव्हाण यांचा आरोप भाडेतत्वावरील खासगी बसेस बंद करा मुंबई : बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात

Dadar Kabutar Khana Controversy: कबुतर खानाच्या राड्यानंतर देवेंद्र फडणविसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले "लोकांचे आरोग्य..."

मुंबई: मुंबईतील दादरमधील कबुतरखाना बंद करण्यावरून जैन समाज आज आक्रमक झाल्याचे दिसून आले. मुंबई उच्च

हत्तीण आणि कबुतरखाना प्रकरणात मनसेचा यू टर्न

मुंबई : न्यायालयाच्या आदेशामुळे मुंबईतले कबुतरखाने बंद करण्याची कारवाई महापालिकेने सुरू केली आहे. तसेच

जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसावर खटला

मुंबई : जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस रेल्वेत गोळीबार आणि हत्या प्रकरणात बडतर्फ कॉन्स्टेबल चेतनसिंह चौधरी

Dadar Kabutar Khana : प्रार्थना संपली... आता प्रतिकार! कबुतरखान्यावर जैन समाज संतप्त, पोलिसांसोबत बाचाबाची

मुंबई : मुंबईतील कबूतरखाना परिसर पुन्हा एकदा तणावाच्या वातावरणात सापडला आहे. जैन समाजाने यापूर्वी जाहीर केलेले