लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे वृद्धापकाळाने निधन

लोकमान्य टिळक यांचे पणतू आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. दीपक टिळक यांचे बुधवार १६ जुलै २०२५ रोजी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, नातवंडे आहेत. डॉ. दीपक टिळक यांचे पार्थिव आज सकाळी आठ ते अकरा या वेळेत पुण्यातील टिळकवाडा येथे अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल. अंत्यसंस्कार दुपारी बारा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत होणार आहेत. 


डॉ. दीपक टिळक यांनी टिळक कुटुंबाच्या सामाजिक कार्याचा वारसा समर्थपणे पुढे नेला. ते शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी संस्थेच्या कार्यात मोलाचे योगदान दिले. त्यांचे वडील जयंत टिळक हे गोवा मुक्ती चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र समितीचे नेते होते. 


जपानी भाषेच्या प्रसारासाठी डॉ. दीपक टिळक यांना जपान सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून गौरविण्यात आले होते. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. दीपक टिळक यांनी दीर्घकाळ काम केले.


Comments
Add Comment

Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती बिघडली; खोकल्याचा त्रास, अस्वस्थता; बारामतीहून पुण्याकडे शरद पवारांचा ताफा रुबी हॉल क्लिनिकमध्ये रवाना

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना बारामतीहून

Solapur: मोहिते पाटलांच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या संस्कृती सातपुते विजयी

सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सोलापूर जिल्हा परिषदेतील निकालाचे अपडेट हाती येत असून माळशिरस

ZP and Panchayat Samiti Election Result 2026: कोकणात भाजपच्या विजयाचा 'श्रीगणेशा'

मुंबई: महाराष्ट्रातील बारा जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांसाठी ७ फेब्रुवारी रोजी

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील महायुतीच्या तब्बल 27 जागा बिनविरोध, संपूर्ण यादी...

मुंबई: राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यात कोणाची सत्ता येणार, कोण गुलाल उधळणार, कोण बाजी मारणार

ZP Elections and Panchayat Samiti Election Results 2026: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार, कोण मारणार बाजी?

मुंबई : महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी पार पडलेल्या मतदानाचा निकाल आज जाहीर होणार

Dombivali: मानकोली उड्डाणपूल बनला रेसिंगचा अड्डा, नागरिकांच्या जीवाला धोका

डोंबिवली : डोंबिवलीमधील ठाणे आणि डोंबिवलीला जोडणारा मोठा गाव मानकोली उड्डाणपूल चार चाकी वाहनांच्या रेसिंगच्या