IndiGo Flight Escapes Crash: पाटणा विमानतळावर इंडिगो विमानाचा अपघात थोडक्यात टळला, नेमके काय झाले होते?

वैमानिकाच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली


पाटणा: पाटणा विमानतळावर एक मोठा विमान अपघात टळला. दिल्लीहून येणाऱ्या इंडिगोच्या विमानाला धावपट्टीवरून खाली उतरावे लागले. वैमानिकाने आपल्या सतर्कतेने विमान नियंत्रणाबाहेर जाण्यापासून वाचवले. त्याने ताबडतोब गो-अराउंड प्रक्रिया अवलंबली आणि विमान पुन्हा यशस्वीरित्या उतरवले.या विमानात एकूण १७३ प्रवासी होते. या घटनेमुळे पाटणा विमानतळाच्या लहान धावपट्टीवरून पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मंगळवारी रात्री ९ वाजता दिल्लीहून येणारे इंडिगो एअरलाइन्सचे विमान ६ई २४८२ लँडिंग दरम्यान धावपट्टीच्या नियुक्त टचडाऊन झोनमधून बाहेर पडले. विमानाच्या मुख्य लँडिंग गियरने धावपट्टीला स्पर्श केला. मात्र विमान निश्चित जागेच्या पलीकडे गेले होते.  पायलटने मूल्यांकन केले तेव्हा त्यांना असे आढळून आले की, इतक्या लहान धावपट्टीवर विमानाचे लँडिंग शक्य नाही. त्यामुळे पायलटने पुन्हा विमान आकाशाकडे झेपवले. काही वेळ चक्कर मारल्यानंतर ते पुन्हा लँडिंग करण्यात आले. यावेळी लँडिंगमध्ये कोणतीही अडचण आली नाही.

लहान धावपट्टीच्या अंतरामुळे होणार होती दूर्घटना


जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळावर रात्री ९ वाजता लँडिंग होणारे विमान ६ई-२४८२ लँडिंग दरम्यान क्रॅश होता होता राहिले.  पाटणाच्या  धावपट्टीच्या लहान अंतरामुळे विमान सुरक्षित लँडिंग झोन ओलांडल्याचे लक्षात आल्याने सतर्क पायलटने लँडिंग न करण्याचा निर्णय घेतला आणि तपासणी सुरू केली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

विमान कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, लँडिंग योग्यरित्या पूर्ण होऊ शकले नाही म्हणून वैमानिकाने मानक सुरक्षा प्रक्रिया पार पाडली. त्याआधी, धावपट्टीजवळ आल्यानंतर काही क्षणांत अचानक पुन्हा हवेत चढल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

वैमानिकाने विमानाला जवळजवळ पाच मिनिटे हवेत ठेवले, दुसऱ्या प्रयत्नात सुरक्षितपणे उतरण्यापूर्वी विमानतळाभोवती चार वेळा प्रदक्षिणा घातल्या. दरम्यान, विमानातील क्रू सदस्यांनी प्रवाशांची भीती कमी केली आणि त्यांना सांगितले की तांत्रिक कारणांमुळे विमान पुन्हा उड्डाण घेण्यात आले आहे आणि लवकरच ते उतरेल.

तज्ञांच्या मते, ‘’जर विमान धावपट्टी संपण्यापूर्वी थांबू शकत नसेल आणि धावपट्टीच्या पलीकडे जात असेल, तसेच जेव्हा विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर आवश्यक ब्रेक लावू शकत नसेल किंवा ते थांबवण्यासाठी थ्रस्ट रिव्हर्सल वापरू शकत नसेल तेव्हा असे घडते.’’

अलायन्स एअरच्या दुर्दैवी अपघाताच्या आठवणी ताज्या


या घटनेने १७ जुलै २००० रोजी झालेल्या अलायन्स एअरच्या दुर्दैवी अपघाताच्या आठवणी ताज्या केल्या, जेव्हा कोलकाताहून दिल्लीला जाणारे विमान तांत्रिक बिघाडामुळे पाटणा विमानतळावर उतरू शकले नाही. विमान गरदानीबाग येथील निवासी निवासी इमारतींवर कोसळले होते, ज्यामध्ये सर्व क्रू मेंबर्स आणि जमिनीवर असलेल्या अनेकांसह ६६ जणांचा मृत्यू झाला होता.

Comments
Add Comment

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च

Bhopal News: कारमध्ये अडकलेला दीड वर्षांचा चिमुकला,अन् आई वडील शॅापिंगला गेले,पुढे असं घडलं...

भोपाळ :मध्य प्रदेशातील छिंदवाडा शहरात संध्याकाळच्या सुमारास पाया खालची जमीन हलवणारी घटना घडली. पालकांच्या

Crime News: रात्री हलवा खाल्ला अन् सकाळी उठलेच नाही..तिघांचा मृत्यु,घडली विचीत्र घटना..!

चंदीगड : हरियाणातील फरिदाबादच्या सरूरपूर भागात एक भयंकर व पाय खालची जमीन हलवणारी घटना घडली आहे. एका कुटुंबातील

Madhya Pradesh News : मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडला अन्....मध्य प्रदेशात मारहाण, लाठीमार आणि महामार्गावर चक्काजाम

खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एका मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर

Sabarimala Temple : सबरीमाला मंदिरात तूप विक्रीत लाखो रुपयांचा महाघोटाळा! केरळ उच्च न्यायालयाचे कठोर पाऊल; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश

तिरुअनंतपुरम : केरळमधील जगप्रसिद्ध सबरीमाला मंदिरात सोन्याच्या दरोड्यानंतर आता 'तूप घोटाळा' समोर आल्याने खळबळ