IndiGo Flight Escapes Crash: पाटणा विमानतळावर इंडिगो विमानाचा अपघात थोडक्यात टळला, नेमके काय झाले होते?

वैमानिकाच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली


पाटणा: पाटणा विमानतळावर एक मोठा विमान अपघात टळला. दिल्लीहून येणाऱ्या इंडिगोच्या विमानाला धावपट्टीवरून खाली उतरावे लागले. वैमानिकाने आपल्या सतर्कतेने विमान नियंत्रणाबाहेर जाण्यापासून वाचवले. त्याने ताबडतोब गो-अराउंड प्रक्रिया अवलंबली आणि विमान पुन्हा यशस्वीरित्या उतरवले.या विमानात एकूण १७३ प्रवासी होते. या घटनेमुळे पाटणा विमानतळाच्या लहान धावपट्टीवरून पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मंगळवारी रात्री ९ वाजता दिल्लीहून येणारे इंडिगो एअरलाइन्सचे विमान ६ई २४८२ लँडिंग दरम्यान धावपट्टीच्या नियुक्त टचडाऊन झोनमधून बाहेर पडले. विमानाच्या मुख्य लँडिंग गियरने धावपट्टीला स्पर्श केला. मात्र विमान निश्चित जागेच्या पलीकडे गेले होते.  पायलटने मूल्यांकन केले तेव्हा त्यांना असे आढळून आले की, इतक्या लहान धावपट्टीवर विमानाचे लँडिंग शक्य नाही. त्यामुळे पायलटने पुन्हा विमान आकाशाकडे झेपवले. काही वेळ चक्कर मारल्यानंतर ते पुन्हा लँडिंग करण्यात आले. यावेळी लँडिंगमध्ये कोणतीही अडचण आली नाही.

लहान धावपट्टीच्या अंतरामुळे होणार होती दूर्घटना


जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळावर रात्री ९ वाजता लँडिंग होणारे विमान ६ई-२४८२ लँडिंग दरम्यान क्रॅश होता होता राहिले.  पाटणाच्या  धावपट्टीच्या लहान अंतरामुळे विमान सुरक्षित लँडिंग झोन ओलांडल्याचे लक्षात आल्याने सतर्क पायलटने लँडिंग न करण्याचा निर्णय घेतला आणि तपासणी सुरू केली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

विमान कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, लँडिंग योग्यरित्या पूर्ण होऊ शकले नाही म्हणून वैमानिकाने मानक सुरक्षा प्रक्रिया पार पाडली. त्याआधी, धावपट्टीजवळ आल्यानंतर काही क्षणांत अचानक पुन्हा हवेत चढल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

वैमानिकाने विमानाला जवळजवळ पाच मिनिटे हवेत ठेवले, दुसऱ्या प्रयत्नात सुरक्षितपणे उतरण्यापूर्वी विमानतळाभोवती चार वेळा प्रदक्षिणा घातल्या. दरम्यान, विमानातील क्रू सदस्यांनी प्रवाशांची भीती कमी केली आणि त्यांना सांगितले की तांत्रिक कारणांमुळे विमान पुन्हा उड्डाण घेण्यात आले आहे आणि लवकरच ते उतरेल.

तज्ञांच्या मते, ‘’जर विमान धावपट्टी संपण्यापूर्वी थांबू शकत नसेल आणि धावपट्टीच्या पलीकडे जात असेल, तसेच जेव्हा विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर आवश्यक ब्रेक लावू शकत नसेल किंवा ते थांबवण्यासाठी थ्रस्ट रिव्हर्सल वापरू शकत नसेल तेव्हा असे घडते.’’

अलायन्स एअरच्या दुर्दैवी अपघाताच्या आठवणी ताज्या


या घटनेने १७ जुलै २००० रोजी झालेल्या अलायन्स एअरच्या दुर्दैवी अपघाताच्या आठवणी ताज्या केल्या, जेव्हा कोलकाताहून दिल्लीला जाणारे विमान तांत्रिक बिघाडामुळे पाटणा विमानतळावर उतरू शकले नाही. विमान गरदानीबाग येथील निवासी निवासी इमारतींवर कोसळले होते, ज्यामध्ये सर्व क्रू मेंबर्स आणि जमिनीवर असलेल्या अनेकांसह ६६ जणांचा मृत्यू झाला होता.

Comments
Add Comment

Ancient manuscripts : प्राचीन हस्तलिखिते मिळणार आता एका क्लिकवर

'ज्ञानभारतम्' मोहिमेला प्रारंभ; हस्तलिखितांच्या नोंदीसाठी पुणे-नागपूर मुख्य केंद्र मुंबई : भारताच्या प्राचीन

Ahmedabad Toodler Death : डोशाच विषारी पीठ की जाणीवपूर्व केलेला विषप्रयोग ? पोलिसांचा संशय बळावला

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमधील चांदखेडा येथे झालेल्या दुहेरी मृत्यूने सर्वाना धक्का बसला आहे. एकाच

Subansiri News : महागड्या विजेचा फटका: आसाम आणि मेघालयचा सुबनसिरी प्रकल्पातील अतिरिक्त वीज घेण्यास नकार

नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी जलविद्युत योजना असलेल्या २००० मेगावॅट क्षमतेच्या 'लोअर सुबनसिरी' (Subansiri Lower HEP)

Gujrat News : रात्री डोसा खाल्ला अन् होत्याच नव्हतं झालं...हसतेखेळते कुटुंब उद्ध्वस्त!

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमधील चांदखेडा परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका कुटुंबाने

Vapi Chemical Units : वापी औद्योगिक वसाहतीला युद्धाचा विळखा! कच्चे तेल आणि कच्च्या मालाचे दर भडकल्याने उत्पादन कोलमडले

वापी : पश्चिम आशियात (इराण-अमेरिका-इस्रायल) भडकलेल्या युद्धाच्या ज्वाला केवळ त्या भूप्रदेशापुरत्या मर्यादित न

Shreyansh Patel : बुद्धीबळाच्या पटावर अडीच वर्षांच्या चिमुरड्याची 'शह-मात'! श्रेयांश पटेलने रचला विश्वविक्रम

हैदराबाद : बुद्धीबळ म्हणजे संयम आणि तल्लख बुद्धिमत्तेचा खेळ. जिथे मोठ्यांनाही विचार करावा लागतो, तिथे एका अवघ्या