ठरलं तर मग! तेलंगणा सीमाभागातील १४ गावं महाराष्ट्रात सामील होणार

महाराष्ट्र व तेलंगणा सीमाभागातील ही गावं चंद्रपूर जिल्ह्यात समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरु


मुंबई: दशकांपासून सुरू असलेला आंतरराज्य सीमा प्रश्न सोडवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्य अधिकाऱ्यांना चंद्रपूरच्या जिवती तहसीलमधील १४ गावाना महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत समाविष्ट करण्यासाठी निर्देश दिले आहेत.



सीमाभागातील वादग्रस्त १४ गावांचा प्रश्न सुटला


महाराष्ट्र व तेलंगणा सीमाभागातील १४ गावांचा प्रश्न सुटला आहे. ही सर्व गावं महाराष्ट्रात सामील करून घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार सीमाभागातील ही गावे चंद्रपूर जिल्ह्यात समाविष्ट करण्याच्या हालचालीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारच्या या मोठ्या निर्णयामुळे संबधित गावातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ही सर्व गावं राजुरा आणि जिवती तालुक्यात सामील होतील. त्यानंतर या गावांना सर्व ग्रामीण योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.


आज विधानभवनात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात या संबंधित बैठक पार पडली. या बैठकीला आमदार देवराज भोंगळेंसह जिवती तालुक्यातील १४ गावातील ग्रामस्थ, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांची उपस्थिती होती. त्यानुसार परमडोली, परमडोली तांडा, कोठा (बुद्रुक आणि खुद्रुक), लेंडीगुडा, मुकादमगुडा, लेंगीजाळा, महाराजगुडा, अंतापूर, इंदिरानगर, शंकरलोधी, पद्मावती, भोलापठार, येसापूर, परसगुडा या या १४ गावांना महाराष्ट्रात स्थान मिळणार आहे.



काय म्हणाले बावनकुळे?


याबाबत बोलताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, ही १४ गावं महाराष्ट्राचीच आहेत. या गावांचा महसुली रेकांर्ड देखील महाराष्ट्राचा आहे, मात्र त्या राज्यात व्यवहार होते. आता गावठाण महाराष्ट्रात ठेवण्याची कारवाई सुरु केली आहे. या गावांतील १०० % नागरिक हे महाराष्ट्रातील मतदार आहेत. काही काळापूर्वी दोन्ही भागांचा व्यवहार हा सारखाच होता, मात्र आता ही गावे राज्यात समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. प्रक्रिया झाल्यानंतर लवकरच याची अधिकृत घोषणा होईल."



उदय सामंत यांची प्रतिक्रिया


उद्योगमंत्री उदय सामंत यांनीदेखील तेलंगणा सीमेवरील १४ गावं महाराष्ट्रात येत असल्याच्या बातमीची पुष्टी केली. ते म्हणाले, "सीमावादामुळे मराठी माणसाच्या जगण्यात अडचणी येऊ नये, हीच सरकारची भूमिका आहे. बेळगावच्या प्रशासनानं जागा दिली तर मराठी अध्यासन विभाग उभा करू, तसे प्रयत्न देखील आम्ही करणार आहोत आणि कर्नाटक सरकारसोबत बोलणार आहोत”.

Comments
Add Comment

Ishwarpur Name : मोठी बातमी, 'इस्लामपूर नव्हे, ईश्वरपूर! अखेर केंद्र सरकारचा नामकरणाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब, पत्र जारी

सांगली : सांगली जिल्ह्यातील (Sangli District) इस्लामपूर (Islampur) शहराच्या नामकरणाच्या प्रस्तावाला अखेर केंद्र सरकारची (Central Government)

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आता दहा पदरी! 'एमएसआरडीसी' लवकरच राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवणार

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाचे आठऐवजी दहा पदरीकरण

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रदूषणात सरासरी ११.१ टक्के वाढ

ठाणे : नागरिकांनी याही वर्षी दिवाळी सण उत्साहाने साजरा केला असून याकाळात फटाके वाजण्याच्या प्रमाणातही वाढ

‘संरक्षण व एरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची आता नवी ओळख’

नागपूर : सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस ही भारतातील अग्रगण्य उत्पादक कंपनी नागपूर येथे विस्तार करीत आहे. या

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! लाडक्या बहिणींची नाराजी दूर, ७० लाख महिलांच्या अपात्रतेची भीती टळली; e-KYCच्या ‘त्या’ निर्णयाला राज्य सरकारची स्थगिती

मुंबई : राज्यातील महिलांमध्ये लोकप्रिय ठरलेली 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) पुन्हा एकदा

लाडक्या बहिणींच्या ‘ई-केवायसी’ला ब्रेक; ऑक्टोबरचा लाभ पुढील आठवड्यात

सोलापूर : विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुतीची राज्यात सत्ता आली. त्या लाडक्या बहिणींची नाराजी आता