अडीच वर्षात तुम्ही काय केलं? शंभूराजे देसाई यांच्यावर आवाज चढवताच गुलाबराव पाटलांनी ठोकली छाती, विधानसभेत जोरदार राडा

शिंदेंच्या शिलेदाराने आदित्य ठाकरेला सुनावले


मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरु आहे. आज (१५ जुलै) विधासभेत मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंसह (Aditya Thackeray) वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांच्यात जोरदार राडा झाला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) शंभूराज देसाई यांच्या मदतीला धावून आले.



मुंबईमधील वांद्रे परिसरात ४२ एकर जमीन डिफेन्स लँड संरक्षण विभागाची मालकी असल्याने ९४८३ झोपड्यांचे पुनर्वसन रखडल आहे. ही ललक्षवेधी वरुण सरदेसाई यांनी मांडली. यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी २०१९ ते २०२२ साली एकदा ही याबाबत तत्कालीन सरकारने बैठक घेतली नसल्याचं सांगितलं. यावरुन वरुण सरदेसाई यांच्यासह आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. मंत्र्यांनी जे पत्रकात आहे, तेच सभागृहात सांगितलं. त्यांना चांगलं ब्रिफिंग मिळालं नसेल, असं वरुण सरदेसाई म्हणाले. तुम्हाला उत्तर ऐकायचं नाहीय का?, असं म्हणत शंभूराज देसाई रागाने खाली बसले. यानंतर मंत्री गुलाबराव पाटील देखील शंभूराज देसाईंच्या बाजूने उभे राहिले. छातीवर हात मारत लाज काढण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलाय? तुम्ही जन्मताच शिकले का? असा सवाल गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला.




शंभूराज देसाई आक्रमक 


तुम्ही २०१९ ते २०२२ पर्यंत काय केले? याबाबत सांगा. एकदाही पत्र दिले नाही. एकदाही पाठपुरावा केला नाही. त्यावेळी सरकार कोणाचे होते? २०२२ साली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ४ वेळा आम्ही पत्र दिली. तुम्ही काय केले? आमची लाज काढू नका. तुम्ही काय केले ते सांगा? असे म्हणत शंभूराज देसाई यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली. मी २०१९ ते २०२२ यावेळेत पाठपुरावा झाला नाही, हे मी म्हटलो.⁠ जर मी कोणाचं नाव घेतलं नाही तर मग एवढी नाकाला मिरची लागायचं कारण काय? असा सवालही शंभूराज देसाईंनी उपस्थित केला.



जन्मताच हुशार होऊन आले का? : गुलाबराव पाटील


त्यानंतर गुलाबराव पाटील म्हणाले, याठिकाणी आदरणीय वरून सरदेसाई यांनी प्रश्न विचारल्यानंतर, माननीय मंत्री महोदयांनी उत्तर दिले, राम कदम यांनी प्रश्न विचारला, आदित्य साहेबानी विचारला आणि हे उत्तर देत होते. उत्तर देत असताना तुमची काय शंका असेल तर प्रश्नाला उत्तर द्यायला मी तयार आहे. एवढी चर्चा चालू आहे, हे काय जन्मताच हुशार होऊन आले का? सरकारला लाज आहे का, हे लोक कोण बोलणारे? तुमच्यापेक्षा जास्त बोलता येत मला... जास्त बोलायचं नाय. असं गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेला सुनावलं.


Comments
Add Comment

Sion Flyover Mumbai : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! सायन उड्डाणपूल १५ ऑगस्टला खुला होण्याची शक्यता

मुंबई : मुंबईकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या शीव (Sion)

Ladki Bahin Yojana : ई-केवायसी होत राहील, पण एकही पात्र लाडकी बहिण ओवाळणीपासून वंचित राहणार नाही

आमचा अजेंडा सत्तेची खुर्ची मिळवणे नाही तर लोकांच्या मनात आपली जागा निर्माण करणे आहे अंधेरीतील लाडक्या बहिणींचा

Ashwini Bhide : इंधन बचतीसाठी महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचा पुढाकार

मुंबई (सचिन धानजी): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि हरित ऊर्जेच्या वापराबाबत

Khar tree collapse : खारमध्ये रिक्षावर झाड कोसळल्याने १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

मुंबई : खार (पश्चिम) येथील लिंकिंग रोडवर राजकुमार ज्वेलर्सजवळ रिक्षावर झाड कोसळल्याने,१४ वर्षीय मुलीचा मृत्यू

NEET UG 2026 : नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला CBI कोठडी, नांदेडमधये पालकांची सीबीआय चौकशी

मुंबई : नीट युजी २०२६ पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला १४ दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावण्यात आली आहे.

Krunal Pandya : हार्दिकच्या लग्नाला कृणाल पांड्या गैरहजर राहणार ? चर्चांमागचं नेमकं कारण काय ?

IPL 2026 : हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. आयपीएल २०२६ संपण्याआधीच हार्दिक पांड्या मॉडेल आणि इन्फ्लुएंसर