मुलुंडमध्ये शनिवारी १२ तासांसाठी पाणीपुरवठा बंद

  88

मुंबई : मुलुंड (पश्चिम) वीणा नगर येथील योगी हिल मार्गावरील प्रस्‍तावित विकास नियोजन रस्‍त्‍यावरील ६०० मिलीमीटर व्‍यासाच्‍या जलवाहिनी जोडणीचे काम प्रस्‍तावित आहे. शनिवार १९ जुलै रोजी सकाळी १० ते रात्री १० या बारा तासांच्‍या कालावधीत जलवाहिनी जोडणीचे काम हाती घेतले जाणार आहे. या कामामुळे टी विभागातील मुलुंड (पश्चिम) येथील काही भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

‘टी’ विभागातील पाणीपुरवठा खंडित होणाऱ्या परिसरांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे –

मुलुंड (पश्चिम) येथील मलबार हिल मार्ग, स्‍वप्‍ननगरी, वीणा नगर, मॉडेल टाऊन मार्ग, योगी हिल मार्ग, घाटीपाडा, बी. आर. मार्ग (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ७ ते दुपारी १)

(१९ जुलै रोजी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत पाणीपुरवठा राहणार बंद)

संबंधित परिसरातील नागरिकांनी पाणीपुरवठा बंद असण्याचा अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. पाणीपुरवठा बंद असण्याच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे. तसेच, पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्‍हणून ३ ते ४ दिवस पाणी गाळून व उकळून वापरावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
Comments
Add Comment

जरांगेंच्या आंदोलनाचं काय होणार ? तोडगा निघणार की... ?

मुंबई : ओबीसी कोट्यातून सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी करत मनोज जरांगेंच्या नेतृत्वात त्यांचे

मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान छगन भुजबळ अ‍ॅक्शन मोडवर, ओबीसी नेत्यांसोबत आज घेणार महत्वपूर्ण निर्णय

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारचे

Maratha Reservation : मराठा आरक्षण मुद्यावर मध्यरात्री 'वर्षा' बंगल्यावर खलबत! मुख्यमंत्र्यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत महत्वाची बैठक

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील आजपासून मुंबईच्या आझाद मैदानावर कडक आमरण उपोषणाला बसणार

ग्रामीण भागातील प्रत्येक रस्त्याला विशिष्ट क्रमांक

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वाकांक्षी निर्णय ग्रामीण रस्ते होणार अतिक्रमणमुक्त ! मुंबई :

लालबागच्या राजाचे VIP दर्शन वादाच्या भोवऱ्यात! जनसामान्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप

मुंबई: संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून, राज्यभरातून अनेक लोकं या दिवसात मुंबईत लालबागच्या

आता आणखी किती दिवस?' ऋषभ पंतने सोशल मीडियावर शेअर केली ही पोस्ट

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने आपल्या दुखापतीबद्दल एक मोठी अपडेट दिली आहे.