कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, खासदार नारायण राणे यांचा इशारा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : पावसामुळे शहरी व ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे या सर्व रस्त्त्यांची डागडुजी व दुरुस्तीची कामे तत्काळ पूर्ण करा. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका. कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा खासदार नारायण राणे यांनी दिला आहे.


जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आदी उपस्थित होते.


खासदार नारायण राणे यावेळी म्हणाले की, पावसाळ्यामुळे जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खड्डे पडल्याने लोकांना वाहन चालवताना खूप त्रास होतो आहे. अनेक ठिकाणी खड्यांमुळे अपघात होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व रस्त्यांची तत्काळ दुरुस्तीची गरज आहे. दुरुस्तीचे काम मानकानुसार (नॉम्र्स) होईल याची दक्षता घ्या. जिल्ह्यातील अनेक साकव नादुरुस्त झालेले आहेत. हे साकव देखील प्राधान्याने दुरुस्ती करावेत, जेणेकरून नागरिक आणि विद्याध्यांची गैरसोय होणार नाही. साकांबाबत नागरिकांच्या तक्रारी येणार नाहीत, असे काम करा. नवीन साकव बांधत असताना त्याची गुणवत्ता तपासून ते उत्कृष्ट असतील, याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश खा. नारायण राणे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.



मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे तातडीने भरा; 'त्या' ठेकेदाराला नोटीस काढा


गणेशोत्सव सण जवळ आला आहे. महामार्ग व त्यावरील खड्डे तातडीने कसे भरता येतील व महामार्ग सुस्थितीत ठेवता येईल याचे नियोजन करावे. जो ठेकेदार याला जबाबदार आहे, त्याला नोटीस काढा. निकृष्ट दर्जाचे हे काम झाले असून त्यावावत ठेकेदाराला जवाबदार धरा, असे आदेश खासदार नारायण राणे यांनी या बैठकीत दिले. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे अपघातामुळे बळी व जखमीची सख्या वाढत आहे. यावायत खासदार राणे यांनी गंभीर दखल घेतली. त्या ठेकेदाराला तातडीने नोटीस काढा. खड्डे भरून सुस्थितीत मार्ग करा, असे आदेश त्यांनी दिले. या महामार्गावर पडलेल्या खड्डयांकडे महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते. अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून वाहनांना अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या महामार्गावर पाणी साचल्याने खड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे हा महामार्ग धोकादायक बनला आहे.

Comments
Add Comment

Agriculture Minister Dattatray Bharne : शेतकरी कर्जमाफी योजनेची १० दिवसांत अंमलबजावणी - कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

- ५६ लाख शेतकऱ्यांना लाभ, राज्याच्या तिजोरीवर ३६ हजार कोटी रुपयांचा भार पडणार मुंबई : सततचा अवकाळी पाऊस, दुष्काळ,

Pune-Miraj Railway 21 Days Block : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! पुणे-मिरज मार्गावर २१ दिवसांचा मेगा ब्लॉक; अनेक गाड्या रद्द

- जाणून घ्या वेळापत्रकातले मोठे बदल पुणे : पुणे-मिरज रेल्वे मार्गावरील दुहेरीकरणाचे काम आणि नीरा यार्डच्या

Jalgaon Accident : जळगावात भीषण अपघात! देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला धडक; दोन महिलांचा मृत्यू

जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात रविवारी एक भीषण अपघात झाला. देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या

Satara Suicide : WhatsApp स्टेटसमुळे वाचले महिला पोलिसाचे प्राण; नेमकं काय घडलं?

Rajendra Jain : मंत्री भुजबळांचे आशीर्वाद घेत राजेंद्र जैन यांच्याकडून राज्यसभेसाठी अर्ज दाखल

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार  (Sunetra Pawar) यांनी विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर राज्यसभेच्या

KIDNAPPING : विवाहित महिलेशी संभाषणाच्या संशयातून तरुणाचे अपहरण; पोलिसांनी फिल्मी स्टाईलने केली सुटका

BARAMATI: बारामती तालुक्यातील सुपा परिसरातून एका तरुणाचे अपहरण झाल्याची खळबळजनक घटना शनिवारी रात्री उघडकीस आली.