कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, खासदार नारायण राणे यांचा इशारा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : पावसामुळे शहरी व ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे या सर्व रस्त्त्यांची डागडुजी व दुरुस्तीची कामे तत्काळ पूर्ण करा. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका. कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा खासदार नारायण राणे यांनी दिला आहे.


जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आदी उपस्थित होते.


खासदार नारायण राणे यावेळी म्हणाले की, पावसाळ्यामुळे जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खड्डे पडल्याने लोकांना वाहन चालवताना खूप त्रास होतो आहे. अनेक ठिकाणी खड्यांमुळे अपघात होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व रस्त्यांची तत्काळ दुरुस्तीची गरज आहे. दुरुस्तीचे काम मानकानुसार (नॉम्र्स) होईल याची दक्षता घ्या. जिल्ह्यातील अनेक साकव नादुरुस्त झालेले आहेत. हे साकव देखील प्राधान्याने दुरुस्ती करावेत, जेणेकरून नागरिक आणि विद्याध्यांची गैरसोय होणार नाही. साकांबाबत नागरिकांच्या तक्रारी येणार नाहीत, असे काम करा. नवीन साकव बांधत असताना त्याची गुणवत्ता तपासून ते उत्कृष्ट असतील, याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश खा. नारायण राणे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.



मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे तातडीने भरा; 'त्या' ठेकेदाराला नोटीस काढा


गणेशोत्सव सण जवळ आला आहे. महामार्ग व त्यावरील खड्डे तातडीने कसे भरता येतील व महामार्ग सुस्थितीत ठेवता येईल याचे नियोजन करावे. जो ठेकेदार याला जबाबदार आहे, त्याला नोटीस काढा. निकृष्ट दर्जाचे हे काम झाले असून त्यावावत ठेकेदाराला जवाबदार धरा, असे आदेश खासदार नारायण राणे यांनी या बैठकीत दिले. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे अपघातामुळे बळी व जखमीची सख्या वाढत आहे. यावायत खासदार राणे यांनी गंभीर दखल घेतली. त्या ठेकेदाराला तातडीने नोटीस काढा. खड्डे भरून सुस्थितीत मार्ग करा, असे आदेश त्यांनी दिले. या महामार्गावर पडलेल्या खड्डयांकडे महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते. अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून वाहनांना अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या महामार्गावर पाणी साचल्याने खड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे हा महामार्ग धोकादायक बनला आहे.

Comments
Add Comment

Suman Kale Murder Case : पारधी समाजाच्या सुमन काळे हत्या प्रकरणात राज्य शासनाची नव्याने एसआयटी; विशेष तपास पथक गठित

अहिल्यानगर : अहिल्यानगर येथील पारधी समाजातील सुमन काळे यांच्या सन २००७ मधील संशयास्पद पोलिस कोठडीतील मृत्यू

Ashish Shelar : दहिहंडी उत्सवाला युनेस्कोमध्ये घेऊन जाणार, सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री अँड आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्र शासनातर्फे दहिहंडी उत्सवाला युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा यादीत नेण्यासाठी प्रयत्न करीत

Prakash Abitkar : गरीब, गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडातून मदत द्यावी - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

गारगोटी येथे रुबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर उभे करण्याचे नियोजन रुबी हॉल क्लिनिक

106 Maharashtra Martyrs To Be Honored : संयुक्त महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांना नव्या प्रशासकीय इमारतीत मानाचे स्थान मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या

Ganpati Special Trains : चाकरमान्यांचे हाल! ऐन गणपती उत्सवात कोकण-उत्तर महाराष्ट्रातील 3 महत्त्वाच्या गाड्या रद्द

मुंबई : मध्य रेल्वेने मार्गक्षमता, वेळापत्रक आणि परिचालनाचा ताळमेळ साधत दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या विशेष

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाचा