Mumbai Rain: मुंबईत पावसाचा हाहाकार: अंधेरीत गाड्या पाण्याखाली, लोकल-विमानसेवा विस्कळीत!

मुंबई: गेल्या काही तासांपासून मुंबई आणि उपनगरात पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. मंगळवारी सकाळपासून पावसाचा जोर प्रचंड वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सकाळी दहा वाजल्यापासून उपनगरांमध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी तुंबले आहे, ज्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे.



अंधेरी सबवे पाण्याखाली, रेल्वे-विमान वाहतुकीला फटका!


पश्चिम उपनगरात मागील दीड ते दोन तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. सबवेमध्ये तीन ते चार फूट पाणी साचल्याने वाहतुकीसाठी तो बंद करण्यात आला आहे. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून वाहतूक थांबवली आहे. काही ठिकाणी गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.


मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वे वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत, ज्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.


त्याचबरोबर, मुंबईतील हवाई वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाला आहे. मुंबई विमानतळावर विमानांचे उड्डाण आणि लँडिंगमध्ये अडथळे येत असल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे अनेक विमानांना विलंब होत आहे.



रत्नागिरीत संततधार, कशेडी घाटात दरड कोसळली!


दुसरीकडे, रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरू आहे. लांजा तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून, काजळी नदीची पाणीपातळी वाढल्याने अंजणारी येथील प्रसिद्ध दत्त मंदिर पाण्याखाली गेले आहे. रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे दत्त मंदिर परिसरात तीन ते चार फुटांपर्यंत पाणी साचले आहे.


गेल्या दोन दिवसांपासून कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका कशेडी घाटालाही बसला आहे. कशेडी घाटातील बोगद्याजवळ दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी, मुसळधार पावसामुळे प्रशासनाला अडचणी येत आहेत.


पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास मुंबई आणि कोकणात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रवासाला निघण्यापूर्वी वाहतुकीची अद्ययावत माहिती घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment

स्मशानभूमींमध्ये लाकडे जाळण्यावर काँग्रेस नगरसेविकेचा आक्षेप; स्थायी समितीच्या सभेत भाजप, शिवसेना आणि उबाठा झाली चिडीचूप

मुंबई: हिंदू संस्कृतीमध्ये मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी शव जाळणे हे महत्वाचे मानले जात आहे. मात्र,

कुपर रुग्णालयाला महापौरांची भेट, रुग्णांसह नातेवाईकांनी केली प्रश्नांची सरबती

मुंबई: मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी विलेपार्ले येथील डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय येथे आकस्मिक भेट देत

राज्यातील ९ लाख ८४ हजार पेक्षा अधिक मुलींना गर्भाशयमुख प्रतिबंधासाठी एचपीव्ही लसीकरण लस

मुंबई: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ८ मार्च रोजी महिला सक्षमीकरण आणि आरोग्य

आस्थापन खर्च कमी करण्यासाठी पदे रिक्त ठेवू नका

स्थायी समिती अध्यक्षांनी दिले पालिका प्रशासनाला निर्देश मुंबई : मुंबई महापालिकेत मागील चार वर्षांमध्ये

महाराष्ट्राचा हरित निर्देशांक सुधारला

मुंबई : औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीचा वेग कायम राखतानाच महाराष्ट्र राज्याने पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रातही

उत्तर-पश्चिम मुंबईत महिला दिनानिमित्त ‘साडी वॉकाथॉन’

मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने उत्तर-पश्चिम मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महिला