Mumbai Rain: मुंबईत पावसाचा हाहाकार: अंधेरीत गाड्या पाण्याखाली, लोकल-विमानसेवा विस्कळीत!

मुंबई: गेल्या काही तासांपासून मुंबई आणि उपनगरात पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. मंगळवारी सकाळपासून पावसाचा जोर प्रचंड वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सकाळी दहा वाजल्यापासून उपनगरांमध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी तुंबले आहे, ज्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे.



अंधेरी सबवे पाण्याखाली, रेल्वे-विमान वाहतुकीला फटका!


पश्चिम उपनगरात मागील दीड ते दोन तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. सबवेमध्ये तीन ते चार फूट पाणी साचल्याने वाहतुकीसाठी तो बंद करण्यात आला आहे. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून वाहतूक थांबवली आहे. काही ठिकाणी गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.


मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वे वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत, ज्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.


त्याचबरोबर, मुंबईतील हवाई वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाला आहे. मुंबई विमानतळावर विमानांचे उड्डाण आणि लँडिंगमध्ये अडथळे येत असल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे अनेक विमानांना विलंब होत आहे.



रत्नागिरीत संततधार, कशेडी घाटात दरड कोसळली!


दुसरीकडे, रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरू आहे. लांजा तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून, काजळी नदीची पाणीपातळी वाढल्याने अंजणारी येथील प्रसिद्ध दत्त मंदिर पाण्याखाली गेले आहे. रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे दत्त मंदिर परिसरात तीन ते चार फुटांपर्यंत पाणी साचले आहे.


गेल्या दोन दिवसांपासून कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका कशेडी घाटालाही बसला आहे. कशेडी घाटातील बोगद्याजवळ दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी, मुसळधार पावसामुळे प्रशासनाला अडचणी येत आहेत.


पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास मुंबई आणि कोकणात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रवासाला निघण्यापूर्वी वाहतुकीची अद्ययावत माहिती घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment

Coastal Road : २४ तास खुला, पण 'सुरक्षित' नाही! वरळी-वांद्रे सी लिंक दरम्यान पथदिवे बंद; मुंबईकर प्रशासनावर नाराज

मुंबई : मुंबईतील कोस्टल रोड (Coastal Road) वाहतुकीसाठी २४ तास खुला (24 Hours Open) झाल्यानंतर त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो मार्गावर प्रवास होणार अधिक आरामदायी, सहा डब्यांच्या मेट्रोची तयारी

मुंबई : मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी! वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो मार्गावर आता प्रवास अधिक आरामदायी

मध्य रेल्वेच्या भांडुप स्थानकात नवा पादचारी पूल ; प्रवाशांची मोठी सोय,

मुंबई : भांडुप रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी एक मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे.

हरमनप्रीतची विनम्रता ; विश्वचषक स्वीकारण्याआधी कोच अमोल आणि जय शाह यांच्या पाया पडली

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर इतिहास रचत पहिल्यांदाच आयसीसी महिला विश्वचषक जिंकला आहे. या ऐतिहासिक

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय ! कणकवली सिंधुदुर्गला मिळणार ८ एक्सप्रेसचा थांबा

मुंबई : कोकणकरांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. कोकणात धावणाऱ्या आठ मेल एक्सप्रेस गाडयांना सिंधुदुर्ग आणि कणकवली

प्रभादेवी पुलामुळे बाधित होणाऱ्या ८३ कुटुंबांना मोक्याच्या ठिकाणी घरे

एमएमआरडीए ९८.५५ कोटी रुपये खर्च करणार मुंबई  : वरळी- शिवडी उन्नत मार्गाअंतर्गंत बांधण्यात येत असलेल्या