Mumbai Rain: मुंबईत पावसाचा हाहाकार: अंधेरीत गाड्या पाण्याखाली, लोकल-विमानसेवा विस्कळीत!

  105

मुंबई: गेल्या काही तासांपासून मुंबई आणि उपनगरात पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. मंगळवारी सकाळपासून पावसाचा जोर प्रचंड वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सकाळी दहा वाजल्यापासून उपनगरांमध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी तुंबले आहे, ज्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे.



अंधेरी सबवे पाण्याखाली, रेल्वे-विमान वाहतुकीला फटका!


पश्चिम उपनगरात मागील दीड ते दोन तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. सबवेमध्ये तीन ते चार फूट पाणी साचल्याने वाहतुकीसाठी तो बंद करण्यात आला आहे. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून वाहतूक थांबवली आहे. काही ठिकाणी गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.


मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वे वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत, ज्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.


त्याचबरोबर, मुंबईतील हवाई वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाला आहे. मुंबई विमानतळावर विमानांचे उड्डाण आणि लँडिंगमध्ये अडथळे येत असल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे अनेक विमानांना विलंब होत आहे.



रत्नागिरीत संततधार, कशेडी घाटात दरड कोसळली!


दुसरीकडे, रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरू आहे. लांजा तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून, काजळी नदीची पाणीपातळी वाढल्याने अंजणारी येथील प्रसिद्ध दत्त मंदिर पाण्याखाली गेले आहे. रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे दत्त मंदिर परिसरात तीन ते चार फुटांपर्यंत पाणी साचले आहे.


गेल्या दोन दिवसांपासून कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका कशेडी घाटालाही बसला आहे. कशेडी घाटातील बोगद्याजवळ दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी, मुसळधार पावसामुळे प्रशासनाला अडचणी येत आहेत.


पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास मुंबई आणि कोकणात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रवासाला निघण्यापूर्वी वाहतुकीची अद्ययावत माहिती घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment

राज ठाकरेच्या घरच्या गणपतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतले दर्शन, शिवतीर्थवर काय झाली चर्चा?

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी गणरायाचे आगमन झाले असून, सकाळपासून अनेक राजकीय लोकांची वर्दळ

वसई इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला! ७ जणांचा मृत्यू तर ९ जखमी

पालघर: वसई तालुक्यातील नारंगी रोड वरील रमाबाई अपार्टमेंट ही चार मजली इमारत लगतच्या चाळीवर कोसळल्यामुळे आज

मुंबईतील 'हे' १२ पूल गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी धोकादायक! BMC चा निर्वाणीचा इशारा

१२ पुलांवरून श्रीगणेश मिरवणूक नेताना काळजी घेण्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आवाहन मुंबई : बृहन्मुंबई

अखेर मराठा आंदोलनासाठी आझाद मैदानावर परवानगी मिळाली, पण...

आझाद मैदानावर मराठा आंदोलनासाठी मुंबई उच्च न्यायालयाने एका दिवसाची परवानगी दिली मुंबई: मराठा आरक्षणाच्या

जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली शेकडो मराठा मुंबईच्या दिशेने रवाना, कुठून कसे येणार? जाणून घ्या सविस्तर-

मुंबई: गेल्या काही वर्षापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप सुटत नसल्याकारणामुळे, मनोज जरांगे पाटील यांच्या

मुंबईकरांना दिलासा: गणेशोत्सवात 'एलिफस्टन पूल' सुरू राहणार; अनंत चतुर्दशीनंतर होणार पाडकाम

मुंबई: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. प्रभादेवी येथील