Mumbai Rain: मुंबईत पावसाचा हाहाकार: अंधेरीत गाड्या पाण्याखाली, लोकल-विमानसेवा विस्कळीत!

मुंबई: गेल्या काही तासांपासून मुंबई आणि उपनगरात पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. मंगळवारी सकाळपासून पावसाचा जोर प्रचंड वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सकाळी दहा वाजल्यापासून उपनगरांमध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी तुंबले आहे, ज्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे.



अंधेरी सबवे पाण्याखाली, रेल्वे-विमान वाहतुकीला फटका!


पश्चिम उपनगरात मागील दीड ते दोन तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. सबवेमध्ये तीन ते चार फूट पाणी साचल्याने वाहतुकीसाठी तो बंद करण्यात आला आहे. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून वाहतूक थांबवली आहे. काही ठिकाणी गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.


मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वे वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत, ज्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.


त्याचबरोबर, मुंबईतील हवाई वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाला आहे. मुंबई विमानतळावर विमानांचे उड्डाण आणि लँडिंगमध्ये अडथळे येत असल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे अनेक विमानांना विलंब होत आहे.



रत्नागिरीत संततधार, कशेडी घाटात दरड कोसळली!


दुसरीकडे, रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरू आहे. लांजा तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून, काजळी नदीची पाणीपातळी वाढल्याने अंजणारी येथील प्रसिद्ध दत्त मंदिर पाण्याखाली गेले आहे. रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे दत्त मंदिर परिसरात तीन ते चार फुटांपर्यंत पाणी साचले आहे.


गेल्या दोन दिवसांपासून कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका कशेडी घाटालाही बसला आहे. कशेडी घाटातील बोगद्याजवळ दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी, मुसळधार पावसामुळे प्रशासनाला अडचणी येत आहेत.


पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास मुंबई आणि कोकणात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रवासाला निघण्यापूर्वी वाहतुकीची अद्ययावत माहिती घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment

राज्यात आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई  : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंका

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्र मुंबई  : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे.

राष्ट्रीय महामार्गांतील प्रकल्पग्रस्तांसाठी ऐतिहासिक निर्णय

राज्यातील २८ हजार प्रलंबित दावे जलद मार्गी लावण्यासाठी ५७ लवादांची नियुक्ती फडणवीस सरकारचा शेतकरी हिताचा

मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या, मध्य, आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक; वेळ पाहूनच बाहेर पडा

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर

राज्यात ‘वन स्टेट, वन पोर्टल’ संकल्पनेला गती; महा सारथी पोर्टलचे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : राज्यात डिजिटल गव्हर्नन्स अधिक सक्षम व नागरिककेंद्रित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘वन स्टेट, वन