Dada Bhuse : शालार्थ प्रणालीत बोगस शिक्षकांची नावे; SIT चौकशी होणार शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचा निर्णय

  101

शाळेत राष्ट्रगीतानंतर राज्यगीत बंधनकारक : शिक्षण मंत्री दादाजी भुसे


मुंबई : राज्यातील अपात्र शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांची नावे शालार्थ प्रणालीत नियमबाह्य समाविष्ट केल्याच्या प्रकरणी एस्आयटीद्वारे (विशेष अन्वेषण पथक) चौकशी केली जाईल. जे दोषी आढळतील, त्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी सोमवारी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तरात केली.



आमदार प्रवीण तायडे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडतांना सांगितले की, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी भरतीत कोट्यवधी रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार होत आहे. काही राजकीय व्यक्ती, माजी राज्यमंत्री यामध्ये सहभागी आहेत. बोगस शिक्षकांना थकित वेतनही देण्यात आले आहे. शाळांना अल्पसंख्याक दर्जा मिळवून देण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी केली जाते. याविषयी शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले की, शिक्षक भरती गुणवत्तापूर्ण व्हावी, ही शासनाची भूमिका आहे. १९ सहस्र उमेदवारांची भरती झाली असून १० सहस्र जागांवर प्रगतीपथावर आहे. अल्पसंख्यांक विकास विभागाद्वारे शाळांना प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही केली जाते. अल्पसंख्यांक दर्जा मिळवून देण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी होत आहे, याविषयी तक्रार प्राप्त नाही.



शाळेत राष्ट्रगीतानंतर राज्यगीत बंधनकारक


राज्यातील सर्व शाळांना मराठी शिकवणे बंधनकारक असून शाळेत राष्ट्रगीतानंतर राज्यगीत लावणे बंधनकारक असेल, असे शिक्षणमंत्री भुसे यांनी यावेळी सांगितले.

Comments
Add Comment

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्टच्या बस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टळणार मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साकारलेले देखावे

विवाह नोंदणीसाठी आता रविवारीही महापालिकेची सेवा

जोडप्यांना सुट्टीच्या दिवशीही करता येणार नोंदणी विवाह मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत दरवर्षी

Mumbai Goa Highwayवरील कशेडी बोगद्याजवळ मोठी दुर्घटना, कोकणात जाणाऱ्या खासगी बसला आग

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची गर्दी आता सुरू झाली आहे. याच दरम्यान, मुंबई गोवा हायवेवर मोठी दुर्घटना