Dada Bhuse : शालार्थ प्रणालीत बोगस शिक्षकांची नावे; SIT चौकशी होणार शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचा निर्णय

शाळेत राष्ट्रगीतानंतर राज्यगीत बंधनकारक : शिक्षण मंत्री दादाजी भुसे


मुंबई : राज्यातील अपात्र शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांची नावे शालार्थ प्रणालीत नियमबाह्य समाविष्ट केल्याच्या प्रकरणी एस्आयटीद्वारे (विशेष अन्वेषण पथक) चौकशी केली जाईल. जे दोषी आढळतील, त्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी सोमवारी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तरात केली.



आमदार प्रवीण तायडे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडतांना सांगितले की, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी भरतीत कोट्यवधी रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार होत आहे. काही राजकीय व्यक्ती, माजी राज्यमंत्री यामध्ये सहभागी आहेत. बोगस शिक्षकांना थकित वेतनही देण्यात आले आहे. शाळांना अल्पसंख्याक दर्जा मिळवून देण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी केली जाते. याविषयी शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले की, शिक्षक भरती गुणवत्तापूर्ण व्हावी, ही शासनाची भूमिका आहे. १९ सहस्र उमेदवारांची भरती झाली असून १० सहस्र जागांवर प्रगतीपथावर आहे. अल्पसंख्यांक विकास विभागाद्वारे शाळांना प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही केली जाते. अल्पसंख्यांक दर्जा मिळवून देण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी होत आहे, याविषयी तक्रार प्राप्त नाही.



शाळेत राष्ट्रगीतानंतर राज्यगीत बंधनकारक


राज्यातील सर्व शाळांना मराठी शिकवणे बंधनकारक असून शाळेत राष्ट्रगीतानंतर राज्यगीत लावणे बंधनकारक असेल, असे शिक्षणमंत्री भुसे यांनी यावेळी सांगितले.

Comments
Add Comment

माजी लोकसभाध्यक्षांना 'ब्रह्मभूषण' पुरस्कार जाहीर

मुंबई : माजी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांना 'ब्रह्मभूषण’ २०२५ पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा

महापरिनिर्वाण दिनी नामांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; सत्ताधाऱ्यांची सकारात्मक प्रतिक्रिया

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर स्थानकाच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा

नियोजित कामं सुरळीत पार पडली तर पुढील महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे आपण लोकार्पण करु- मुख्यमंत्री

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम नियोजित

गोरेगाव-सांताक्रूझ दरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

वांद्रे-वर्सोवा सी लिंकवरील जोड मार्गाच्या कामाला गती

आतापर्यंत २२ टक्के काम पू्र्ण मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य

Mahaparinirvan Din: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले - राज्यपाल आचार्य देवव्रत

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था -- मुख्यमंत्री