Dada Bhuse : शालार्थ प्रणालीत बोगस शिक्षकांची नावे; SIT चौकशी होणार शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचा निर्णय

शाळेत राष्ट्रगीतानंतर राज्यगीत बंधनकारक : शिक्षण मंत्री दादाजी भुसे


मुंबई : राज्यातील अपात्र शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांची नावे शालार्थ प्रणालीत नियमबाह्य समाविष्ट केल्याच्या प्रकरणी एस्आयटीद्वारे (विशेष अन्वेषण पथक) चौकशी केली जाईल. जे दोषी आढळतील, त्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी सोमवारी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तरात केली.



आमदार प्रवीण तायडे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडतांना सांगितले की, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी भरतीत कोट्यवधी रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार होत आहे. काही राजकीय व्यक्ती, माजी राज्यमंत्री यामध्ये सहभागी आहेत. बोगस शिक्षकांना थकित वेतनही देण्यात आले आहे. शाळांना अल्पसंख्याक दर्जा मिळवून देण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी केली जाते. याविषयी शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले की, शिक्षक भरती गुणवत्तापूर्ण व्हावी, ही शासनाची भूमिका आहे. १९ सहस्र उमेदवारांची भरती झाली असून १० सहस्र जागांवर प्रगतीपथावर आहे. अल्पसंख्यांक विकास विभागाद्वारे शाळांना प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही केली जाते. अल्पसंख्यांक दर्जा मिळवून देण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी होत आहे, याविषयी तक्रार प्राप्त नाही.



शाळेत राष्ट्रगीतानंतर राज्यगीत बंधनकारक


राज्यातील सर्व शाळांना मराठी शिकवणे बंधनकारक असून शाळेत राष्ट्रगीतानंतर राज्यगीत लावणे बंधनकारक असेल, असे शिक्षणमंत्री भुसे यांनी यावेळी सांगितले.

Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण