IND Vs ENG: नशिबाने दिली नाही साथ, पराभवानंतर सिराजच्या डोळ्यात तरळले अश्रू

लंडन: लॉर्ड्स कसोटीचा शेवटचा क्षण अतिशय भावूक झाला होता. मोहम्मद सिराजची शेवटची विकेट पडली आणि भारताला या कसोटीत २२ धावांनी पराभव सहन करावा लागला. सिराजने रवींद्र जडेजासोबत खेळपट्टीवर टिकून राहण्याचा प्रयत्न केले मात्र नशिबाने त्याला साथ दिली नाही. धीम्या वेगाने येत असलेला बॉल त्याच्या बॅटला लागून स्टम्पवर आदळला आणि तो तेथेच बसून रडू लागला.


भारताची धावसंख्या ८ बाद ११२ असताना नितीश कुमार रेड्डीची विकेट लंचआधी पडली. त्यानंतर असे वाटत होते की सामना येथेच संपला. मात्र जडेजाने हार मानली नव्हती. तो ६१ धावांवर नाबाद राहिला. त्याने जसप्रीत बुमराह आणि सिराजसोबत मिळून लढाई लढण्याचा प्रयत्न केला.


बुमराहसोबत जडेजाने ३५ धावांची भागीदारी केली. त्यामुळे सामना तिसऱ्या सत्रापर्यंत खेचता आला. बुमराहने ५४ बॉलमध्ये ५ धावा केल्या. यानंतर सिराजने खेळपट्टीवर टिकून राहत सामना रोमहर्षक बनवला. भारताला शेवटच्या सत्रात ३० धावांची गरज होती.


 


सिराजच्या डोळ्यात तरळले अश्रू


यातच शोएब बशीर गोलंदाजीसाठी आला. ७५व्या षटकांत सिराजने पहिला बॉल रोखला. मात्र दुसरा बॉल त्याला बॅटला लागून हळूनच स्टम्पवर गेला. भारताच्या पराभवानंतर हॅरी ब्रूक, ज्यो रूट आणि बेन स्टोक्स सांत्वना देण्यासाठी आले.

Comments
Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण