IND Vs ENG: नशिबाने दिली नाही साथ, पराभवानंतर सिराजच्या डोळ्यात तरळले अश्रू

लंडन: लॉर्ड्स कसोटीचा शेवटचा क्षण अतिशय भावूक झाला होता. मोहम्मद सिराजची शेवटची विकेट पडली आणि भारताला या कसोटीत २२ धावांनी पराभव सहन करावा लागला. सिराजने रवींद्र जडेजासोबत खेळपट्टीवर टिकून राहण्याचा प्रयत्न केले मात्र नशिबाने त्याला साथ दिली नाही. धीम्या वेगाने येत असलेला बॉल त्याच्या बॅटला लागून स्टम्पवर आदळला आणि तो तेथेच बसून रडू लागला.


भारताची धावसंख्या ८ बाद ११२ असताना नितीश कुमार रेड्डीची विकेट लंचआधी पडली. त्यानंतर असे वाटत होते की सामना येथेच संपला. मात्र जडेजाने हार मानली नव्हती. तो ६१ धावांवर नाबाद राहिला. त्याने जसप्रीत बुमराह आणि सिराजसोबत मिळून लढाई लढण्याचा प्रयत्न केला.


बुमराहसोबत जडेजाने ३५ धावांची भागीदारी केली. त्यामुळे सामना तिसऱ्या सत्रापर्यंत खेचता आला. बुमराहने ५४ बॉलमध्ये ५ धावा केल्या. यानंतर सिराजने खेळपट्टीवर टिकून राहत सामना रोमहर्षक बनवला. भारताला शेवटच्या सत्रात ३० धावांची गरज होती.


 


सिराजच्या डोळ्यात तरळले अश्रू


यातच शोएब बशीर गोलंदाजीसाठी आला. ७५व्या षटकांत सिराजने पहिला बॉल रोखला. मात्र दुसरा बॉल त्याला बॅटला लागून हळूनच स्टम्पवर गेला. भारताच्या पराभवानंतर हॅरी ब्रूक, ज्यो रूट आणि बेन स्टोक्स सांत्वना देण्यासाठी आले.

Comments
Add Comment

शुभमन गिलच्या तब्येतीमध्ये सुधारणा, मात्र दुसरा कसोटी सामना खेळणार का?

कोलकाता: कोलकातामधील ईडन गार्डन्सवर झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय

गुवाहाटीत पहिल्यांदाच होणार कसोटी सामना! दक्षिण आफ्रिकेच्या पराभवासाठी काय असणार भारताची रणनीती ?

गुहावटी: भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्कारावी लागली. फिरकीपटूंसाठी फायदेशीर

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे