एआय तंत्रज्ञानाचा वापर करत ऊस उत्पादन वाढवावे

  52

श्रीराम शेटे; कादवा सहकारी साखर कारखान्याचे रोलर पूजन


दिंडोरी :साखर उद्योग मोठ्या अडचणीतून मार्गक्रमण करत असून दरवर्षी गाळप कमी होत हंगाम दिवस कमी होत आहे त्याचा फटका साखर कारखान्यांना बसत
आहे.जास्तीत जास्त गाळप होण्यासाठी सर्वांनी ऊस लागवड करावी तसेच ए आय तंत्रज्ञानाचा वापर करत एकरी उत्पादन वाढवावे असे आवाहन कादवा चे चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले.


कादवा सहकारी साखर कारखान्याचे रोलर पूजन संचालक रावसाहेब पाटील यांचे हस्ते झाले त्यावेळी श्रीराम शेटे बोलत होते. यावेळी बाजार समिती सभापती प्रशांत कड, संचालक गंगाधर निखाडे, साहेबराव पाटील, रामभाऊ ढगे, अनिल दादा देशमुख,व्हा. चेअरमन शिवाजी बस्ते, बाळकृष्ण जाधव उपस्थित होते.
पुढे शेटे यांनी सांगितले की, कमी दिवसात जास्तीत जास्त गाळप करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी गेट केन चा ऊस आणावाच लागणार आहे तरी संस्था हितासाठी सर्वांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करत उसपुरवठा कादवा कारखान्यालाच करावा असे आवाहन केले.


कार्यक्रमास दिनकरराव जाधव, शहाजीराव सोमवंशी, विश्वनाथ देशमुख, बापुराव पडोळ, सुखदेव जाधव, सुभाषराव शिंदे, अमोल भालेराव, मधुकर गटकळ, सुनिल केदार, राजेंद्र गांगुर्डे, नामदेव घडवजे, रामदास पिंगळ, बाकेराव जाधव, अशोक भालेराव, रंगनाथ बर्डे, सदाशिव खांदवे, अंबादास पाटील कामगार संचालक भगवान जाधव, युनियन सरचिटणीस अजित दवंगे, वसंत कावळे, दत्तू गटकळ,दिलीप शिंदे, गुलाब तात्या जाधव, बबन देशमुख, ललित जाधव, मच्छिन्द्र पवार, रघुनाथ जाधव, दत्तात्रेय जाधव, प्रकाश पिंगळं, , नामदेव घडवजे,रघुनाथ दिघे,बबन देशमुख,संताजी जाधव,भारत खांदवे आदीसह सभासद,ऊस उत्पादक, अधिकारी, कामगार उपस्थित होते. प्रास्तविक कार्यकारी संचालक विजय खालकर यांनी केले.

Comments
Add Comment

केळ्यांचा भाव घसरला; उत्पादकांना मोठा आर्थिक फटका

जळगाव: काही दिवसापूर्वी २ हजाराच्या वर गेलेला केळीचा भाव आता १२०० रूपयांपर्यंत घसरल्यामुळे केळी उत्पादकांना

त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांकडून भाविकांना मारहाण

त्रंबकेश्वर : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे बाहेरगावहून येणाऱ्या

मुंबईत मुसळधार पाऊस, मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, पुढील 3 – 4 तास महत्वाचे, सखल भागात पाणी साचलं, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

राज्यात मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना तडका दिला असून पुढील ३ ते ४ तासांत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड,

‘सुखोई’च्या आवाजाने दिडोंरी थरथरली

घरांच्या काचा फुटल्या २५ किमी परिसरात आवाजाचे पडसाद स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण तलाठी, तहसीलदारांकडून

छगन भुजबळांनी दिला ध्वजारोहणाला नकार? हे आहे कारण

नाशिक: १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी झेंडा कोण फडकवणार? यावरून राज्यात वातावरण पेटलेले आहे. नाशिक आणि रायगड या दोन

इगतपुरीच्या रिसोर्टमधील कॉल सेंटरवर CBI चा छापा

अमेरिका, कॅनडासह परदेशी नागरिकांची फसवणूक नाशिक: इगतपुरी येथील रिसोर्टमधून विदेशी नागरिकांना फोन करून