देवळाली स्थानकावर गाड्यांना थांबा द्या, अन्यथा आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, सेनेची मागणी; कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजनाचे आश्वासन


दे. कॅम्प :कोरोना काळापूर्वी देवळाली रेल्वे स्थानकावर २२ गाड्या थांबत होत्या, परंतु कोरोनानंतर त्यांची संख्या कमी झाली असून, रेल्वे स्थानकावर फक्त काही ठराविक गाड्या थांबत आहेत. या रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासावर कोट्यावधीचा खर्च झाला आहे.या गाड्या पुन्हा सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासन, रेल्वे राज्यमंत्री आणि रेल्वेच्या मुख्य अधिकाऱ्यांना अनेक वेळा निवेदन देऊनही आजपर्यंत त्यावर विचार झालेला नाही. याबाबत त्वरीत कार्यवाही करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शिवसेना कडून रेल्वे प्रशासनास देण्यात आला.


दरम्यान , कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजनाचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे. या रेल्वे स्थानकावर गाड्या थांबणार नाहीत, तर स्थानकाच्या पुनर्विकासावर पैसे का खर्च केले जात आहेत? तो खर्च फक्त दिखाव्यासाठी आहे का? असा मोठा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने कर्मचारी असून, इतर स्थानकांप्रमाणेच या रेल्वे स्थानकावर सर्व सुविधा उपलब्ध आहेत.


तरीही, जर या स्थानकांवर रेल्वे गाड्या थांबत नसतील, तर रेल्वे प्रशासन इतका खर्च का आणि कशासाठी करत आहे? हा प्रश्न आजपर्यंत अनुत्तरित आहे. येत्या काही दिवसांत जर गाड्या थांबवल्या नाहीत तर आम्ही जनआंदोलन सुरू करू , असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रमुख, सिंधी समाज सेल रतन चावला,शिवसेनेचे अरुण जाधव, पोपटराव जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष ॲड बाळासाहेब आडके, बाळासाहेब गोडसे,,खंडू मेढे उपस्थित होते.

Comments
Add Comment

मुंबई, पुण्यानंतर आता नाशिककरही सततच्या वाहतूक कोंडीमुळे होणार हैराण; तब्बल वर्षभर सोसावी लागणार वाहतूक कोंडी

नाशिक : मुंबई पुण्याप्रमाणेच आता नाशिककरांनाही रोजच्या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागणार आहे. एक - दोन महीने

Nashik 400 Crore Cash Robbery : नाशिकमधील ४०० कोटींच्या कथित रोख लुटीने खळबळ, धक्कादायक खुलासा; ‘लूट झालीच नाही’

नाशिक : नाशिकमध्ये २००० रुपयांच्या नोटांनी भरलेला ट्रक लुटल्याच्या कथित घटनेने राज्यात एकच खळबळ उडवून दिली आहे.

Devendra Fadnavis: “दोन भाऊ येऊन गेले, पण त्यांना श्रीरामाची आठवणही झाली नाही”

नाशिक : निवडणुकीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाशिकच्या सभेतून उद्धव आणि राज यांच्यावर

Nashik News: कडाक्याच्या थंडीने घेतला पहिला बळी, निफाडमध्ये 22 वर्षीय तरुणाचा मृत्यु

नाशिक:निफाड तालुक्यात कडाक्याच्या थंडीने पहिला बळी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. देवगाव (ता. निफाड)

Nashik Accident : भरधाव वाहनाची मागून दुचकीला जोरदार धडक! नवरा बायकोचा जागीच मृत्यु; थरारक अपघात

नाशिक : महाराष्ट्रामध्ये वाहनांच्या अपघातांची मालीका सुरुच.. काल मंगळवारी साक्री-शिर्डी राष्टिय महामार्गावर

नाशिकच्या दोन माजी महापौरांचा शिवसेनेत प्रवेश

नाशिक : नाशिक महानगरपालिकेचे माजी महापौर दशरथ पाटील आणि अशोक मुर्तडक यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या