देवळाली स्थानकावर गाड्यांना थांबा द्या, अन्यथा आंदोलन

  45

राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, सेनेची मागणी; कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजनाचे आश्वासन


दे. कॅम्प :कोरोना काळापूर्वी देवळाली रेल्वे स्थानकावर २२ गाड्या थांबत होत्या, परंतु कोरोनानंतर त्यांची संख्या कमी झाली असून, रेल्वे स्थानकावर फक्त काही ठराविक गाड्या थांबत आहेत. या रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासावर कोट्यावधीचा खर्च झाला आहे.या गाड्या पुन्हा सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासन, रेल्वे राज्यमंत्री आणि रेल्वेच्या मुख्य अधिकाऱ्यांना अनेक वेळा निवेदन देऊनही आजपर्यंत त्यावर विचार झालेला नाही. याबाबत त्वरीत कार्यवाही करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शिवसेना कडून रेल्वे प्रशासनास देण्यात आला.


दरम्यान , कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजनाचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे. या रेल्वे स्थानकावर गाड्या थांबणार नाहीत, तर स्थानकाच्या पुनर्विकासावर पैसे का खर्च केले जात आहेत? तो खर्च फक्त दिखाव्यासाठी आहे का? असा मोठा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने कर्मचारी असून, इतर स्थानकांप्रमाणेच या रेल्वे स्थानकावर सर्व सुविधा उपलब्ध आहेत.


तरीही, जर या स्थानकांवर रेल्वे गाड्या थांबत नसतील, तर रेल्वे प्रशासन इतका खर्च का आणि कशासाठी करत आहे? हा प्रश्न आजपर्यंत अनुत्तरित आहे. येत्या काही दिवसांत जर गाड्या थांबवल्या नाहीत तर आम्ही जनआंदोलन सुरू करू , असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रमुख, सिंधी समाज सेल रतन चावला,शिवसेनेचे अरुण जाधव, पोपटराव जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष ॲड बाळासाहेब आडके, बाळासाहेब गोडसे,,खंडू मेढे उपस्थित होते.

Comments
Add Comment

केळ्यांचा भाव घसरला; उत्पादकांना मोठा आर्थिक फटका

जळगाव: काही दिवसापूर्वी २ हजाराच्या वर गेलेला केळीचा भाव आता १२०० रूपयांपर्यंत घसरल्यामुळे केळी उत्पादकांना

त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांकडून भाविकांना मारहाण

त्रंबकेश्वर : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे बाहेरगावहून येणाऱ्या

मुंबईत मुसळधार पाऊस, मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, पुढील 3 – 4 तास महत्वाचे, सखल भागात पाणी साचलं, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

राज्यात मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना तडका दिला असून पुढील ३ ते ४ तासांत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड,

‘सुखोई’च्या आवाजाने दिडोंरी थरथरली

घरांच्या काचा फुटल्या २५ किमी परिसरात आवाजाचे पडसाद स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण तलाठी, तहसीलदारांकडून

छगन भुजबळांनी दिला ध्वजारोहणाला नकार? हे आहे कारण

नाशिक: १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी झेंडा कोण फडकवणार? यावरून राज्यात वातावरण पेटलेले आहे. नाशिक आणि रायगड या दोन

इगतपुरीच्या रिसोर्टमधील कॉल सेंटरवर CBI चा छापा

अमेरिका, कॅनडासह परदेशी नागरिकांची फसवणूक नाशिक: इगतपुरी येथील रिसोर्टमधून विदेशी नागरिकांना फोन करून