पुणे विद्यापीठात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

पुणे : पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात विद्यार्थ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. अभियांत्रिकीचे अर्थात इंजिनिअरिंगचे विद्यार्थी मोठ्या संख्येने विद्यापीठाच्या मुख्य इमारती समोर बसून आंदोलन करत आहेत. घोषणा देत आहेत. आमची परीक्षा पुन्हा घ्या, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.


नुकताच इंजिनिअरिंग परीक्षेचा निकाल लागला आहे . विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार या निकालात मोठा घोळ आहे . त्यामुळे आमची पुन्हा परीक्षा घ्या अशी मागणी विद्यार्थी करत आहे . यासाठी विद्यापीठासमोर ठिय्या मांडून विद्यार्थी आंदोलन करत आहेत . कुलगुरुंनी येऊन आमची भेट घ्यावी , आमच्या मागण्या मान्य कराव्या अशा घोषणा विद्यार्थी देत आहेत .


कुलगुरुंनी विद्यार्थ्यांना भेटण्यास नकार दिल्याने हे आंदोलन चिघळले . विद्यापीठाच्या गेटवर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता . विद्यार्थ्यांना आतमध्ये प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे विद्यापीठाचे गेट तोडून विद्यार्थी कुलगुरुंच्या कार्यालयाकडे पळत सुटले . यावेळी पोलिसांनी त्यांना अडवले आणि त्यांचा एक गट कुलगुरूंना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात पाठवला .

Comments
Add Comment

लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा–निलंगा

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विमानतळाचे होणार उद्घाटन; नवी मुंबईत वाहतुकीत बदल

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई

शेतकऱ्यांसाठी मंत्री महाजनांचा मोठा निर्णय, सुपूर्द केला वर्षभराचा ‘पगार’

जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी मंत्री गिरीश महाजन यांनी

अमरावती महानगरपालिकेला ई-बस डेपो-व चार्जींग सुविधेसाठी बडनेरा येथील जमीन

अमरावती : अमरावती महापालिकेला केंद्र शासन पुरस्कृत पी.एम.ई बस योजनेतून मिळालेल्या ई-बस डेपो व चार्जींग

दिवाळीच्या सुट्टीत फिरण्याचे नियोजन करताय ? 'या' चार जागांना नक्की भेट द्या

मुंबई : पावसाळ्यातली हिरवळ अनुभवल्यानंतर आता गुलाबी थंडीची चाहुल सर्वांना लागली आहे. त्यामुळे छान थंड हवेच्या

अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांकडून तब्बल ३१,६२८ कोटींची मदत; २५३ तालुक्यांना सरसकट मदत देणार

'खरडून गेलेल्या जमिनीला' मिळणार हेक्टरी ३.४७ लाखांची मदत; शेतकरी, घरे आणि जनावरांसाठी भरीव निधी मुंबई: