राज्यात वातावरणात अस्थिरता, पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : राज्यात हवामानात यंदा मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत असून पूर्वमोसमीपासून ते सध्याच्या मोसमी पावसापर्यंत वातावरणात अस्थिरता जाणवतं आहे. यामुळे पावसाचा अचूक अंदाज बांधणे हवामान खात्यासाठीही कठीण ठरत आहे. अशा पार्श्वभूमीवर मागील चार दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाने पुन्हा जोर धरला असून मुंबई, ठाणेसह अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.


विशेषतः विदर्भ, नागपूर, नाशिक या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरातून तयार झालेले चक्रीवादळ झारखंड आणि छत्तीसगडमार्गे महाराष्ट्रात पोहोचले असून त्याचा सर्वाधिक फटका विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राला बसला आहे. यासोबतच अरबी समुद्रातून सुमारे ६५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहत असल्यामुळे राज्यात हवामानात झपाट्याने बदल होत आहेत.



हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार


१३ जुलै रोजी : रत्नागिरी, सातारा, नाशिक घाट प्रदेश, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, नगर, पालघर, संभाजीनगर, जालना आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.


१४ जुलै रोजी : तळकोकणासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि घाटमाथा असलेले पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्हे यलो अलर्टच्या प्रभावाखाली राहतील.


राज्यातील पावसाचा जोर येत्या १५ जुलैपर्यंत कायम राहणार असून सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत. त्यानंतर मात्र पावसाचा जोर ओसरणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात राज्यात पावसाचे प्रमाण तुलनेत कमी राहण्याची शक्यता आहे.


तथापि, कोकण आणि मराठवाडा विभागात जोरदार पावसाचा इशारा कायम आहे, तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात सरासरीहून अधिक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हवामान विभागाच्या चार आठवड्यांच्या विस्तृत अंदाजानुसार, जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यातही पावसाचे प्रमाण समाधानकारक राहणार असून ७ ऑगस्टपर्यंत राज्यातील बहुतांश भागांत सामान्य पावसाची स्थिती राहणार आहे.


दरम्यान, २२ जुलैपर्यंत पावसामध्ये खंड येण्याची शक्यता हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. त्यानंतर वातावरण अनुकूल झाल्यास पुन्हा पावसाने हजेरी लावण्याची शक्यता आहे.बदलत्या हवामानानुसार परिस्थितीत बदल होऊ शकतो.

Comments
Add Comment

गोरेगाव, सांताक्रूझ दरम्यान रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

'इंडिगो'ची सर्व उड्डाणे रद्द; प्रवाशांचे हाल, इतर विमानांचे दर दुप्पट

नवी दिल्ली : इंडिगो कंपनीने अचाकन आपल्या फ्लाईट रद्द केल्याने देशातील विविध महत्त्वाच्या विमानतळाची अवस्था बस

वरळीत शिउबाठाची दादागिरी; भाजपच्या कामगार संघटनेचा फलक लावण्यास विरोध

मुंबई : विधानसभा निवडणुकीत वरळीची जागा कशीबशी जिंकलेल्या शिउबाठाला अद्याप राजकीय स्थितीचे भान आलेले दिसत नाही.

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आरे कॉलनी व दिंडोशी वन क्षेत्रातील रहिवाश्यांना घरे द्या'

मुंबई : आरेमध्ये तसेच दिंडोशी येथील वन क्षेत्रात गेली अनेक वर्ष वास्तव्य रहिवाशी हि देखील माणसे असून ते मुलभूत

फडणवीस सरकारची ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दिशेने वाटचाल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त विशेष संवाद मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र

डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्वीकारला महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी