राज्यात वातावरणात अस्थिरता, पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : राज्यात हवामानात यंदा मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत असून पूर्वमोसमीपासून ते सध्याच्या मोसमी पावसापर्यंत वातावरणात अस्थिरता जाणवतं आहे. यामुळे पावसाचा अचूक अंदाज बांधणे हवामान खात्यासाठीही कठीण ठरत आहे. अशा पार्श्वभूमीवर मागील चार दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाने पुन्हा जोर धरला असून मुंबई, ठाणेसह अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.


विशेषतः विदर्भ, नागपूर, नाशिक या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरातून तयार झालेले चक्रीवादळ झारखंड आणि छत्तीसगडमार्गे महाराष्ट्रात पोहोचले असून त्याचा सर्वाधिक फटका विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राला बसला आहे. यासोबतच अरबी समुद्रातून सुमारे ६५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहत असल्यामुळे राज्यात हवामानात झपाट्याने बदल होत आहेत.



हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार


१३ जुलै रोजी : रत्नागिरी, सातारा, नाशिक घाट प्रदेश, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, नगर, पालघर, संभाजीनगर, जालना आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.


१४ जुलै रोजी : तळकोकणासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि घाटमाथा असलेले पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्हे यलो अलर्टच्या प्रभावाखाली राहतील.


राज्यातील पावसाचा जोर येत्या १५ जुलैपर्यंत कायम राहणार असून सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत. त्यानंतर मात्र पावसाचा जोर ओसरणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात राज्यात पावसाचे प्रमाण तुलनेत कमी राहण्याची शक्यता आहे.


तथापि, कोकण आणि मराठवाडा विभागात जोरदार पावसाचा इशारा कायम आहे, तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात सरासरीहून अधिक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हवामान विभागाच्या चार आठवड्यांच्या विस्तृत अंदाजानुसार, जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यातही पावसाचे प्रमाण समाधानकारक राहणार असून ७ ऑगस्टपर्यंत राज्यातील बहुतांश भागांत सामान्य पावसाची स्थिती राहणार आहे.


दरम्यान, २२ जुलैपर्यंत पावसामध्ये खंड येण्याची शक्यता हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. त्यानंतर वातावरण अनुकूल झाल्यास पुन्हा पावसाने हजेरी लावण्याची शक्यता आहे.बदलत्या हवामानानुसार परिस्थितीत बदल होऊ शकतो.

Comments
Add Comment

डिजिटल व्यवसाय आणि उद्योजकता

करिअर : सुरेश वांदिले डिजिटल व्यवसाय आणि उद्योजकता विषयातील बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (बीबीए-डीबीइ) हा

Bihar Vidhan Sabha Election Result : बिहार विधानसभा मतमोजणीला लवकरच सुरुवात; नवे सरकार आज स्थापन होण्याच्या दिशेने पहिले पाऊल...

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान नुकतेच पार पडले असून, आज, निकालाचा 'महादिवस' आहे. आज या निवडणुकीचे

एक कोटी लाडक्या बहिणींकडून केवायसी पूर्ण

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत

महिलांच्या वाढलेल्या विक्रमी मतदानामुळे एनडीएचे पारडे जड?

निवडणुकीची आज मतमोजणी व निकाल मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून बिहार विधानसभा निवडणुकीची देशभरात चर्चा होती. ही

मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांसह जवानांना पूरपरिस्थितीत बचावाचे प्रशिक्षण, ऍडवॉन्स फ्लड आणि रेस्क्यू प्रशिक्षणाकरता नेमली संस्था

पाण्यात आणि उंचावर अडकलेल्यांना अत्याधुनिक पध्दतीने वाचवण्यासाठी करणार प्रशिक्षित मुंबई (खास प्रतिनिधी):

पवई तलावातील जलपर्णी वाढता वाढता वाढे, कंत्राटदाराला मिळाला १ कोटी रुपयांचा बोनस

मुंबई (सचिन धानजी): मुंबईतील पवई तलावातील पाण्याच्या पृष्ठभागावरील जलपर्णी वनस्पती, तरंगणा-या तसेच जमिनीतून