राज्यात वातावरणात अस्थिरता, पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : राज्यात हवामानात यंदा मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत असून पूर्वमोसमीपासून ते सध्याच्या मोसमी पावसापर्यंत वातावरणात अस्थिरता जाणवतं आहे. यामुळे पावसाचा अचूक अंदाज बांधणे हवामान खात्यासाठीही कठीण ठरत आहे. अशा पार्श्वभूमीवर मागील चार दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाने पुन्हा जोर धरला असून मुंबई, ठाणेसह अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.


विशेषतः विदर्भ, नागपूर, नाशिक या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरातून तयार झालेले चक्रीवादळ झारखंड आणि छत्तीसगडमार्गे महाराष्ट्रात पोहोचले असून त्याचा सर्वाधिक फटका विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राला बसला आहे. यासोबतच अरबी समुद्रातून सुमारे ६५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहत असल्यामुळे राज्यात हवामानात झपाट्याने बदल होत आहेत.



हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार


१३ जुलै रोजी : रत्नागिरी, सातारा, नाशिक घाट प्रदेश, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, नगर, पालघर, संभाजीनगर, जालना आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.


१४ जुलै रोजी : तळकोकणासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि घाटमाथा असलेले पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्हे यलो अलर्टच्या प्रभावाखाली राहतील.


राज्यातील पावसाचा जोर येत्या १५ जुलैपर्यंत कायम राहणार असून सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत. त्यानंतर मात्र पावसाचा जोर ओसरणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात राज्यात पावसाचे प्रमाण तुलनेत कमी राहण्याची शक्यता आहे.


तथापि, कोकण आणि मराठवाडा विभागात जोरदार पावसाचा इशारा कायम आहे, तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात सरासरीहून अधिक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हवामान विभागाच्या चार आठवड्यांच्या विस्तृत अंदाजानुसार, जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यातही पावसाचे प्रमाण समाधानकारक राहणार असून ७ ऑगस्टपर्यंत राज्यातील बहुतांश भागांत सामान्य पावसाची स्थिती राहणार आहे.


दरम्यान, २२ जुलैपर्यंत पावसामध्ये खंड येण्याची शक्यता हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. त्यानंतर वातावरण अनुकूल झाल्यास पुन्हा पावसाने हजेरी लावण्याची शक्यता आहे.बदलत्या हवामानानुसार परिस्थितीत बदल होऊ शकतो.

Comments
Add Comment

Mumbai Local News : मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक; 'थर्टी फर्स्ट'साठी मात्र रेल्वेकडून खूशखबर

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय रेल्वेच्या रूळांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी येत्या रविवार, २८

कबुतरांना दाणे घालणं पडलं महागात! बसला हजारोंचा दणका

मुंबई: कबुतरांमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याला धोका असल्याने कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय मुंबई

New Year News Rules : नवं वर्ष, नवे नियम! १ जानेवारीपासून तुमचे आर्थिक गणित बदलणार; २०२६ मध्ये लागू होणारे 'हे' १० मोठे बदल!

मुंबई : वर्ष २०२५ ला निरोप देण्यासाठी आता अवघे ४ दिवस उरले असून, १ जानेवारी २०२६ पासून आपल्या दैनंदिन जीवनातील

कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने शासकीय सदनिकांचे वाटप

मुंबई : राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुंबईतील शासकीय निवासस्थान वाटपावरून येणाऱ्या तक्रारींची

पश्चिम रेल्वेवर शनिवारी ३०० फेऱ्या रद्द

मध्य रेल्वेचा उद्या मेगा ब्लॉक जलद आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हाल मुंबई : मुंबईकरांचे दैनंदिन आयुष्य

पद्म पुरस्कार, भारतरत्न उपाधी नव्हे; ते नावाआधी लावता येणार नाही

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे नागरी