"हिंदीत बोलू कि मराठीत?" पंतप्रधान मोदींनी फोन करत उज्ज्वल निकम यांना विचारला प्रश्न, राज्यसभा सदस्यची दिली माहिती

राज्यसभेसाठी नामांकन मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी उज्ज्वल निकम यांचे केले अभिनंदन


नवी दिल्ली: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील चार प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांना राज्यसभा सदस्यासाठी नामांकित केले आहे.  ज्यामध्ये माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, मुंबई हल्ला प्रकरणातील सरकारी वकील उज्ज्वल निकम, शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन मास्टर आणि दिल्लीचे इतिहासकार मीनाक्षी जैन यांचा समावेश आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने शनिवारी रात्री उशिरा जारी केलेल्या अधिसूचनेत याची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेसाठी नामांकित केलेल्या या चारही सदस्यांचे अभिनंदन केले.


उज्ज्वल निकम यांचे कायदेशीर क्षेत्र आणि संविधानाप्रती असलेले समर्पण अनुकरणीय असल्याचे X वर पोस्ट करत सांगितले. उज्ज्वल निकम हे केवळ एक यशस्वी वकील राहिले नाहीत, तर महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये न्याय मिळवून देण्यातही ते अग्रेसर राहिले आहेत.


पंतप्रधान मोदींनी ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्याबद्दल X वर म्हटले की, 'त्यांच्या संपूर्ण कायदेशीर कारकिर्दीत त्यांनी नेहमीच संवैधानिक मूल्ये मजबूत करण्यासाठी आणि सामान्य नागरिकांना नेहमीच आदराने वागवले जावे यासाठी काम केले आहे. भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांना राज्यसभेवर नामांकित केले आहे ही आनंदाची बाब आहे. त्यांच्या संसदीय कार्यकाळासाठी माझ्या शुभेच्छा.'



उज्ज्वल निकम यांना पंतप्रधानांचा फोन


राज्यसभेवर नामांकित झाल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी निकम यांच्याशी फोनवर चर्चाही केली आहे. याबद्दल माहिती देताना ज्येष्ठ वकील म्हणाले की, 'मला नामांकित केल्याबद्दल मी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आभार मानतो. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलो तेव्हा त्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्या नामांकनाबद्दल माहिती देण्यासाठी मला फोन केला.'



निकम यांच्याशी साधला मराठीत संवाद


निकम पुढे म्हणाले, 'पंतप्रधान मोदींनी मला विचारले की त्यांनी हिंदीत बोलावे की मराठीत, यावर आम्ही दोघेही हसायला लागलो. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी माझ्याशी मराठीत संवाद साधला आणि मला सांगितले की राष्ट्रपती मला संवैधानिक जबाबदारी देऊ इच्छितात, त्यानंतर त्यांनी मला राष्ट्रपतींच्या निर्णयाबद्दल सांगितले. मी लगेच हो म्हटले, मी पक्ष नेतृत्वाचे आभार मानतो.'


उज्ज्वल निकम हे एक प्रसिद्ध वकील आहेत आणि त्यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून काम केले होते. भाजपने त्यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार म्हणून उभे केले होते. परंतु काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी निवडणुकीत त्यांचा पराभव केला.



उज्ज्वल निकम कोण आहेत?


महाराष्ट्रातील जळगाव येथे जन्मलेले उज्ज्वल निकम हे देशातील एक प्रसिद्ध वकील मानले जातात. त्यांनी आजवर अनेक हाय प्रोफाइल खटले लढवली आहेत, ज्यात यश मिळवून त्यांनी देशात आपली खास ओळख निर्माण केली आहे. २६/११ च्या मुंबई हल्ल्यात अडकलेल्या दहशतवादी अजमल कसाबला फाशी देण्यात निकम यांनी सरकारी वकील म्हणून सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय, १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातही ते सरकारी वकील राहिले आहेत.


बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीत निर्माता गुलशन कुमार हत्याकांड आणि प्रमोद महाजन हत्याकांड प्रकरणात सरकारी वकील म्हणून काम केलेले निकम हे देशातील सर्वात प्रतिष्ठित वकिलांमध्ये गणले जातात. कायदेशीर क्षेत्रातील योगदानाबद्दल उज्ज्वल निकम यांना २०१६ मध्ये भारत सरकारने चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री देऊन सन्मानित केले आहे.

Comments
Add Comment

US Secretary meets PM Modi : अमेरिकेचे परराष्ट्र सचिव रुबियो यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वतीने व्हाईट हाऊसला भेट देण्याचे निमंत्रण नवी दिल्ली :

Indian Army Cheetah Helicopter : भारतीय लष्कराचे चीता हेलिकॉप्टर डोंगरात कोसळले, ३ अधिकारी किरकोळ जखमी

- अपघाताचे कारण शोधण्यासाठी पुढील चौकशी सुरू लडाख : लडाखच्या दुर्गम आणि उच्च पर्वतीय भागात भारतीय लष्कराच्या

Cockroach Janata Party : ‘कॉक्रोच जनता पार्टी’वर आणखी एक घाव! एक्स-इन्स्टाग्रामनंतर आता वेबसाईटही बंद

मुंबई : गेल्या आठवडाभरापासून सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेत असलेल्या अभिजीत दिपके यांच्या

Karnataka Road Accident : कर्नाटक हादरलं! कलबुर्गीत मृत्यूचा कहर; भरधाव ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील ५ जण ठार

कर्नाटक : कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात काल म्हणजेच शुक्रवार २२ मे रोजी मध्यरात्री भीषण रस्ता अपघात झाला.

Agni-1 Missile : ओडिशात करण्यात आली अग्नी १ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; भारताचा शत्रुराष्ट्रांना स्पष्ट इशारा

ओडिशा : भारताने आपल्या सामरिक क्षमतेत आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. ओडिशातील एकात्मिक चाचणी श्रेणी

Supreme Court : आई वडील IAS असल्यास मुलांना OBC आरक्षणाचा लाभ का ? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

नवी दिल्ली : ओबीसी आरक्षण आणि क्रीमी लेयरची मर्यादा या विषयावर सर्वोच्च न्यायालयात एक सुनावणी सुरू होती. या