"हिंदीत बोलू कि मराठीत?" पंतप्रधान मोदींनी फोन करत उज्ज्वल निकम यांना विचारला प्रश्न, राज्यसभा सदस्यची दिली माहिती

  62

राज्यसभेसाठी नामांकन मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी उज्ज्वल निकम यांचे केले अभिनंदन


नवी दिल्ली: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील चार प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांना राज्यसभा सदस्यासाठी नामांकित केले आहे.  ज्यामध्ये माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, मुंबई हल्ला प्रकरणातील सरकारी वकील उज्ज्वल निकम, शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन मास्टर आणि दिल्लीचे इतिहासकार मीनाक्षी जैन यांचा समावेश आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने शनिवारी रात्री उशिरा जारी केलेल्या अधिसूचनेत याची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेसाठी नामांकित केलेल्या या चारही सदस्यांचे अभिनंदन केले.


उज्ज्वल निकम यांचे कायदेशीर क्षेत्र आणि संविधानाप्रती असलेले समर्पण अनुकरणीय असल्याचे X वर पोस्ट करत सांगितले. उज्ज्वल निकम हे केवळ एक यशस्वी वकील राहिले नाहीत, तर महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये न्याय मिळवून देण्यातही ते अग्रेसर राहिले आहेत.


पंतप्रधान मोदींनी ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्याबद्दल X वर म्हटले की, 'त्यांच्या संपूर्ण कायदेशीर कारकिर्दीत त्यांनी नेहमीच संवैधानिक मूल्ये मजबूत करण्यासाठी आणि सामान्य नागरिकांना नेहमीच आदराने वागवले जावे यासाठी काम केले आहे. भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांना राज्यसभेवर नामांकित केले आहे ही आनंदाची बाब आहे. त्यांच्या संसदीय कार्यकाळासाठी माझ्या शुभेच्छा.'



उज्ज्वल निकम यांना पंतप्रधानांचा फोन


राज्यसभेवर नामांकित झाल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी निकम यांच्याशी फोनवर चर्चाही केली आहे. याबद्दल माहिती देताना ज्येष्ठ वकील म्हणाले की, 'मला नामांकित केल्याबद्दल मी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आभार मानतो. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलो तेव्हा त्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्या नामांकनाबद्दल माहिती देण्यासाठी मला फोन केला.'



निकम यांच्याशी साधला मराठीत संवाद


निकम पुढे म्हणाले, 'पंतप्रधान मोदींनी मला विचारले की त्यांनी हिंदीत बोलावे की मराठीत, यावर आम्ही दोघेही हसायला लागलो. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी माझ्याशी मराठीत संवाद साधला आणि मला सांगितले की राष्ट्रपती मला संवैधानिक जबाबदारी देऊ इच्छितात, त्यानंतर त्यांनी मला राष्ट्रपतींच्या निर्णयाबद्दल सांगितले. मी लगेच हो म्हटले, मी पक्ष नेतृत्वाचे आभार मानतो.'


उज्ज्वल निकम हे एक प्रसिद्ध वकील आहेत आणि त्यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून काम केले होते. भाजपने त्यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार म्हणून उभे केले होते. परंतु काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी निवडणुकीत त्यांचा पराभव केला.



उज्ज्वल निकम कोण आहेत?


महाराष्ट्रातील जळगाव येथे जन्मलेले उज्ज्वल निकम हे देशातील एक प्रसिद्ध वकील मानले जातात. त्यांनी आजवर अनेक हाय प्रोफाइल खटले लढवली आहेत, ज्यात यश मिळवून त्यांनी देशात आपली खास ओळख निर्माण केली आहे. २६/११ च्या मुंबई हल्ल्यात अडकलेल्या दहशतवादी अजमल कसाबला फाशी देण्यात निकम यांनी सरकारी वकील म्हणून सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय, १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातही ते सरकारी वकील राहिले आहेत.


बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीत निर्माता गुलशन कुमार हत्याकांड आणि प्रमोद महाजन हत्याकांड प्रकरणात सरकारी वकील म्हणून काम केलेले निकम हे देशातील सर्वात प्रतिष्ठित वकिलांमध्ये गणले जातात. कायदेशीर क्षेत्रातील योगदानाबद्दल उज्ज्वल निकम यांना २०१६ मध्ये भारत सरकारने चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री देऊन सन्मानित केले आहे.

Comments
Add Comment

संघाची जोधपूरमध्ये ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान बैठक

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय समन्वय बैठक यंदा ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत

हैदराबादमध्ये क्रौर्याचा कळस! पतीने गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका अत्यंत धक्कादायक घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडले आहे. एका पतीने

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या