अहमदाबाद विमान अपघातप्रकरणी चौकशी अहवालावर वैमानिकांचा आक्षेप

नवी दिल्ली : अहमदाबाद येथे १२ जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या बोईंग ७८७ अपघातप्रकरणी प्राथमिक तपास झाला आहे. एएआयबीच्या तपासानंतर प्राथमिक अहवाल दिला आहे. बोईंग ७८७ प्रकारच्या व एआय १७१ या क्रमांकाच्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालावर आक्षेप घेत वैमानिकांच्या संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


या अहवालामध्ये एक वैमानिक दुसऱ्याला ‘इंधन पुरवठा का बंद केला?’ असे विचारताना ऐकू येत आहे. त्यावर दुसऱ्या वैमानिकाने ‘मी नाही केले’ असे उत्तर दिले. अशा प्रकारचे संभाषण झाल्याचे समोर आले आहे. हे संभाषण या अपघातासाठी गृहीत धरू नये, असे एअरलाईन पायलट्स असोसिएशन ऑफ इंडियाने (अल्फा) म्हटले आहे. ‘अहवालातील माहिती आणि चौकशीची दिशा ही पायलटच्या चुकीकडे झुकते आहे.



चौकशी समितीमध्ये अनुभवी वैमानिकांचा अभाव


या अपघाताच्या चौकशी प्रक्रियेत आवश्यक आणि अनुभवी व्यक्तींना, विशेषतः विमान चालवणाऱ्या लाईन पायलट्सना सहभागी करण्यात आलेले नाही. विशेषतः लाईन पायलट्स अजूनही चौकशी समितीत सामील नाहीत, असा आरोप अल्फाने केला आहे.



निष्कर्ष काढण्याची घाई करू नये 


अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताचा अहवाल केवळ प्राथमिक स्वरूपाचा असून, अंतिम निष्कर्ष येईपर्यंत निष्कर्ष काढण्याची घाई करू नये, असे आवाहन नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी केले. राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही वैमानिकांमधील संवाद संक्षिप्त असल्याने केवळ बोलण्याच्या आधारावर निष्कर्ष काढता येणार नाही, असे सांगितले.


Comments
Add Comment

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या