अहमदाबाद विमान अपघातप्रकरणी चौकशी अहवालावर वैमानिकांचा आक्षेप

नवी दिल्ली : अहमदाबाद येथे १२ जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या बोईंग ७८७ अपघातप्रकरणी प्राथमिक तपास झाला आहे. एएआयबीच्या तपासानंतर प्राथमिक अहवाल दिला आहे. बोईंग ७८७ प्रकारच्या व एआय १७१ या क्रमांकाच्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालावर आक्षेप घेत वैमानिकांच्या संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


या अहवालामध्ये एक वैमानिक दुसऱ्याला ‘इंधन पुरवठा का बंद केला?’ असे विचारताना ऐकू येत आहे. त्यावर दुसऱ्या वैमानिकाने ‘मी नाही केले’ असे उत्तर दिले. अशा प्रकारचे संभाषण झाल्याचे समोर आले आहे. हे संभाषण या अपघातासाठी गृहीत धरू नये, असे एअरलाईन पायलट्स असोसिएशन ऑफ इंडियाने (अल्फा) म्हटले आहे. ‘अहवालातील माहिती आणि चौकशीची दिशा ही पायलटच्या चुकीकडे झुकते आहे.



चौकशी समितीमध्ये अनुभवी वैमानिकांचा अभाव


या अपघाताच्या चौकशी प्रक्रियेत आवश्यक आणि अनुभवी व्यक्तींना, विशेषतः विमान चालवणाऱ्या लाईन पायलट्सना सहभागी करण्यात आलेले नाही. विशेषतः लाईन पायलट्स अजूनही चौकशी समितीत सामील नाहीत, असा आरोप अल्फाने केला आहे.



निष्कर्ष काढण्याची घाई करू नये 


अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताचा अहवाल केवळ प्राथमिक स्वरूपाचा असून, अंतिम निष्कर्ष येईपर्यंत निष्कर्ष काढण्याची घाई करू नये, असे आवाहन नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी केले. राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही वैमानिकांमधील संवाद संक्षिप्त असल्याने केवळ बोलण्याच्या आधारावर निष्कर्ष काढता येणार नाही, असे सांगितले.


Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात