अहमदाबाद विमान अपघातप्रकरणी चौकशी अहवालावर वैमानिकांचा आक्षेप

नवी दिल्ली : अहमदाबाद येथे १२ जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या बोईंग ७८७ अपघातप्रकरणी प्राथमिक तपास झाला आहे. एएआयबीच्या तपासानंतर प्राथमिक अहवाल दिला आहे. बोईंग ७८७ प्रकारच्या व एआय १७१ या क्रमांकाच्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालावर आक्षेप घेत वैमानिकांच्या संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


या अहवालामध्ये एक वैमानिक दुसऱ्याला ‘इंधन पुरवठा का बंद केला?’ असे विचारताना ऐकू येत आहे. त्यावर दुसऱ्या वैमानिकाने ‘मी नाही केले’ असे उत्तर दिले. अशा प्रकारचे संभाषण झाल्याचे समोर आले आहे. हे संभाषण या अपघातासाठी गृहीत धरू नये, असे एअरलाईन पायलट्स असोसिएशन ऑफ इंडियाने (अल्फा) म्हटले आहे. ‘अहवालातील माहिती आणि चौकशीची दिशा ही पायलटच्या चुकीकडे झुकते आहे.



चौकशी समितीमध्ये अनुभवी वैमानिकांचा अभाव


या अपघाताच्या चौकशी प्रक्रियेत आवश्यक आणि अनुभवी व्यक्तींना, विशेषतः विमान चालवणाऱ्या लाईन पायलट्सना सहभागी करण्यात आलेले नाही. विशेषतः लाईन पायलट्स अजूनही चौकशी समितीत सामील नाहीत, असा आरोप अल्फाने केला आहे.



निष्कर्ष काढण्याची घाई करू नये 


अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताचा अहवाल केवळ प्राथमिक स्वरूपाचा असून, अंतिम निष्कर्ष येईपर्यंत निष्कर्ष काढण्याची घाई करू नये, असे आवाहन नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी केले. राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही वैमानिकांमधील संवाद संक्षिप्त असल्याने केवळ बोलण्याच्या आधारावर निष्कर्ष काढता येणार नाही, असे सांगितले.


Comments
Add Comment

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च

Bhopal News: कारमध्ये अडकलेला दीड वर्षांचा चिमुकला,अन् आई वडील शॅापिंगला गेले,पुढे असं घडलं...

भोपाळ :मध्य प्रदेशातील छिंदवाडा शहरात संध्याकाळच्या सुमारास पाया खालची जमीन हलवणारी घटना घडली. पालकांच्या

Crime News: रात्री हलवा खाल्ला अन् सकाळी उठलेच नाही..तिघांचा मृत्यु,घडली विचीत्र घटना..!

चंदीगड : हरियाणातील फरिदाबादच्या सरूरपूर भागात एक भयंकर व पाय खालची जमीन हलवणारी घटना घडली आहे. एका कुटुंबातील

Madhya Pradesh News : मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडला अन्....मध्य प्रदेशात मारहाण, लाठीमार आणि महामार्गावर चक्काजाम

खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एका मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर