बिहारच्या मतदारयादीत बांगलादेश, म्यानमार, नेपाळच्या नागरिकांची नावं

  65


पाटणा : बिहारच्या विधानसभेचा कार्यकाळ लवकरच पूर्ण होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून निवडणूक आयोगाने बिहारमध्ये मतदारयादीची सखोल तपासणी सुरू केली आहे. या तपासणीत धक्कादायक माहिती हाती आली आहे. बिहारच्या मतदारयादीत बांगलादेश, म्यानमार, नेपाळच्या नागरिकांची नावं आढळली आहेत. ही नावं यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यादीतील या गंभीर चुकांसाठी निवडणूक आयोगाने ३५ बीएलओ आणि २६ सुपरवायझर यांचे वेतन स्थगित केले आहे. या अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत.


निवडणूक अधिकारी बिहारमध्ये घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करत आहेत. ही तपासणी सुरू असतानाच बनावट कागदपत्रांच्या मदतीने अनेक विदेशी नागरिकांनी यादीत नावाचा समावेश करुन घेतल्याचे आढळले आहे. ही माहिती मिळताच निवडणूक आयोगाने मतदारयादीत घुसखोरी करणाऱ्या बांगलादेश, म्यानमार, नेपाळच्या नागरिकांची नावं यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. निवडणूक आयोगाची धडक कारवाई सुरू झाल्यापासून विरोधी पक्षांमध्ये अस्वस्थता दिसत आहे. काँग्रेसचे नेते निवडणूक आयोगाची कारवाई थांबवण्यासाठी कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण न्यायालयीन पातळीवर त्यांना पुरते अपयश आल्याचे दिसत आहे. निवडणूक आयोग ३० सप्टेंबर २०२५ रोजी बिहारच्या मतदारांची सुधारित यादी प्रसिद्ध करणार आहे. ही यादी प्रसिद्ध करण्याआधी बोगस मतदारांची नावं वगळण्याचे काम सुरू आहे.


बिहार विधानसभेचा कार्यकाळ २२ नोव्हेंबर २०२५ रोजी संपणार आहे. याआधी निवडणूक घेऊन निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित आहे. यामुळे बिहारमध्ये मतदार यादीच्या छाननीचे काम प्राधान्याने सुरू करण्यात आले आहे. बिहारमध्ये विधानसभेच्या २४३ जागांसाठी निवडणूक होणार आहे. पण या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच मतदार यादी छाननीच्या प्रक्रियेमुळे विरोधकांमध्ये अस्वस्थता पसरल्याचे दिसत आहे. आसाम, पद्दुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल येथे २०२६ मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. यामुळे बिहार पाठापोठ या राज्यांमध्येही मतदार यादीच्या छाननीचे काम सुरू केले जाणार आहे.


विरोधकांनी ९ जुलै रोजी बिहारमध्ये निवडणूक आयोगाच्या कामाला विरोध म्हणून बंद पुकारला होता. हे आंदोलन झाले तरी निवडणूक आयोगाचे काम थांबलेले दिसत नाही. आयोगाच्या कामामुळे सत्ताधाऱ्यांऐवजी विरोधकांमध्ये चिंतेचे वातावरण दिसत आहे.


Comments
Add Comment

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या

भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध सुरुच

पदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विचारमंथन सुरू नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय

टोल कर्मचाऱ्यांची दादागिरी... ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानाला मारहाण केल्याप्रकरणी NHAI ची मोठी कारवाई

मेरठ: ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी NHAI ने मोठी कारवाई केली असून संबंधित

कर्नाटकचे काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र यांना ईडीकडून अटक

छापेमारीत आढळले १२ कोटी रुपये, ६ कोटींचे सोने गंगटोक : कर्नाटक काँग्रेसचे आमदार के. सी. वीरेंद्र यांना सक्तवसुली