बिहारच्या मतदारयादीत बांगलादेश, म्यानमार, नेपाळच्या नागरिकांची नावं


पाटणा : बिहारच्या विधानसभेचा कार्यकाळ लवकरच पूर्ण होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून निवडणूक आयोगाने बिहारमध्ये मतदारयादीची सखोल तपासणी सुरू केली आहे. या तपासणीत धक्कादायक माहिती हाती आली आहे. बिहारच्या मतदारयादीत बांगलादेश, म्यानमार, नेपाळच्या नागरिकांची नावं आढळली आहेत. ही नावं यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यादीतील या गंभीर चुकांसाठी निवडणूक आयोगाने ३५ बीएलओ आणि २६ सुपरवायझर यांचे वेतन स्थगित केले आहे. या अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत.


निवडणूक अधिकारी बिहारमध्ये घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करत आहेत. ही तपासणी सुरू असतानाच बनावट कागदपत्रांच्या मदतीने अनेक विदेशी नागरिकांनी यादीत नावाचा समावेश करुन घेतल्याचे आढळले आहे. ही माहिती मिळताच निवडणूक आयोगाने मतदारयादीत घुसखोरी करणाऱ्या बांगलादेश, म्यानमार, नेपाळच्या नागरिकांची नावं यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. निवडणूक आयोगाची धडक कारवाई सुरू झाल्यापासून विरोधी पक्षांमध्ये अस्वस्थता दिसत आहे. काँग्रेसचे नेते निवडणूक आयोगाची कारवाई थांबवण्यासाठी कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण न्यायालयीन पातळीवर त्यांना पुरते अपयश आल्याचे दिसत आहे. निवडणूक आयोग ३० सप्टेंबर २०२५ रोजी बिहारच्या मतदारांची सुधारित यादी प्रसिद्ध करणार आहे. ही यादी प्रसिद्ध करण्याआधी बोगस मतदारांची नावं वगळण्याचे काम सुरू आहे.


बिहार विधानसभेचा कार्यकाळ २२ नोव्हेंबर २०२५ रोजी संपणार आहे. याआधी निवडणूक घेऊन निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित आहे. यामुळे बिहारमध्ये मतदार यादीच्या छाननीचे काम प्राधान्याने सुरू करण्यात आले आहे. बिहारमध्ये विधानसभेच्या २४३ जागांसाठी निवडणूक होणार आहे. पण या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच मतदार यादी छाननीच्या प्रक्रियेमुळे विरोधकांमध्ये अस्वस्थता पसरल्याचे दिसत आहे. आसाम, पद्दुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल येथे २०२६ मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. यामुळे बिहार पाठापोठ या राज्यांमध्येही मतदार यादीच्या छाननीचे काम सुरू केले जाणार आहे.


विरोधकांनी ९ जुलै रोजी बिहारमध्ये निवडणूक आयोगाच्या कामाला विरोध म्हणून बंद पुकारला होता. हे आंदोलन झाले तरी निवडणूक आयोगाचे काम थांबलेले दिसत नाही. आयोगाच्या कामामुळे सत्ताधाऱ्यांऐवजी विरोधकांमध्ये चिंतेचे वातावरण दिसत आहे.


Comments
Add Comment

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च